शहरं
Join us  
Trending Stories
1
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
2
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
3
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
4
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
5
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्य तयार
6
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
7
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
8
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
9
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
10
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
11
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
12
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
13
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
14
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
15
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
16
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
17
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
18
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
19
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
20
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी

जिल्ह्यात धान्य पोहोचलेच नाही

By admin | Updated: July 16, 2016 01:35 IST

एटापल्लीसह जिल्ह्याच्या दुर्गम तालुक्यात स्वस्त धान्य दुकानांना अद्यापही धान्य पुरवठा झालेले नाही.

रेशन दुकाने बंद : एटापल्लीसह अनेक तालुक्यांमधील गरीब नागरिक धान्यापासून वंचित गडचिरोली : एटापल्लीसह जिल्ह्याच्या दुर्गम तालुक्यात स्वस्त धान्य दुकानांना अद्यापही धान्य पुरवठा झालेले नाही. एटापल्ली तालुक्यात ११२ शासनमान्य स्वस्त धान्य दुकाने आहेत. त्यापैकी केवळ ३३ दुकानात नवसंजीवनी योजनेंतर्गत रेशनचे धान्य पोहोचले आहे. उर्वरित ७९ दुकानांपैकी फक्त चार दुकानात माहे जुलै महिन्याचे धान्य पोहोचविण्यात आले आहे. तब्बल ७५ दुकानांना १५ जुलैपर्यंत धान्य पोहोचलेले नसल्याने हे सर्व रेशन धान्य दुकान कुलूपबंद स्थितीत असल्याचा धक्कादायक प्रकार लोकमतने शुक्रवारी जिल्हाभर रेशन धान्य दुकानांवर स्टिंग आॅपरेशन केल्यावर उघडकीस आला. अशीच परिस्थिती कुरखेडासह इतर तालुक्यातही असल्याचे दिसून आले. धान्य पुरवठाच झाले नसल्याने दुकान चालकांनी दुकानांना कुलूप मारून ठेवले आहे. एटापल्ली तालुक्याच्या जीवनगट्टा, गुरूपल्ली येथील चार रेशन धान्य दुकानांना शुक्रवारी दुपारी ११.३० ते १२.३० या वेळेत लोकमत प्रतिनिधीने भेट दिली. हे चारही दुकान कुलूप बंद असल्याचे दिसले. यापैकी जीवनगट्टा येथील पी. वाय. कोरेत यांच्या दुकानाला फलक सुध्दा नव्हता. दुकानाची शासकीय वेळ ठरलेली आहे, असे असले तरी एकही दुकान दुर्गम भागात वेळेचे पालन करीत नाही. पैसे असेल तेव्हा माल उचलतो व आपल्या सोयीनुसार तो वाटप करतो, असा प्रकार असल्याचे नागरिकांकडून माहिती घेतल्यावर दिसून आले. चार-पाच दिवसात माल वाटप केला जातो. याच काळात दुकान उघडी ठेवली जातात. सर्व दुकानदारांची साखळी पध्दत या तालुक्यात आहे. एटापल्ली येथील गीता दासरवार यांनी ग्राहक केव्हाही आले तरी आम्ही वेळ पाहत नाही. त्यांना धान्य देतो, असे सांगितले. रेशन कार्ड धारकांना नियमित माल मिळतो. परंतु तारीख ठरलेली नसते. एखादी तारीख निश्चित करून त्या तारखेलाच मालाचे वितरण व्हायला हवे, अशी मागणी लोकमत प्रतिनिधीकडे नागरिकांनी केली. तालुक्यातील रेशन धान्य दुकानदारांना उपप्रादेशिक कार्यालय अहेरी यांच्या वाहनाने माल पोहोचून दिल्या जातो. दोन दिवसांपासून वाहनचालकांचा संप असल्याने रेशन पोहोचले नाही, अशी माहिती एटापल्ली तहसील कार्यालयाचे पुरवठा निरिक्षक आनंद पडोळे यांनी दिली.