शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा. पं. निवडणुकीतून अंगठे बहाद्दर हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:30 IST

सिराेंचा : जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी सुरू आहे. त्यामुळे गावातील वातावरण तापले आहे. निर्वाचित सदस्यांमधूनच सरपंचाची निवड ...

सिराेंचा : जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी सुरू आहे. त्यामुळे गावातील वातावरण तापले आहे. निर्वाचित सदस्यांमधूनच सरपंचाची निवड करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, उमेदवाराकरिता सातवी पासची अट घातल्याने अनेक अंगठेबहाद्दर हद्दपार झाले आहेत. या माध्यमातून नवीन पिढीला ग्रामपंचायतीच्या राजकारणात येण्याची संधी मिळाली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य होण्यासाठी सातवी उत्तीर्ण असणे आवश्यक असल्याची अट निवडणूक आयोगाने घातली. त्यामुळे अंगठेबहाद्दर लाेकांना निवडणुकीत उमेदवार म्हणून लढता येणार नाही. १ जानेवारी १९९५ नंतर जन्मलेल्या उमेदवारांचे शिक्षण सातवीपर्यंत नसेल तर त्यांना निवडणूक लढता येणार नाही. जिल्ह्यात दाेन टप्प्यांत ग्रामपंचायत निवडणुका हाेणार आहेत. यासाठी नामनिर्देशन पत्राची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे उमेदवारांना विविध प्रमाणपत्र व इतर दस्तावेज काढण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.

तीन वर्षांपूर्वी राज्य सरकारने थेट जनतेच्या माध्यमातून सरपंच निवड करण्याबाबत निर्णय घेतला हाेता; परंतु सत्तांतर झाल्यावर थेट सरपंच थेट निवडणूक रद्द करण्यात आली. निवडून आलेल्या सदस्यातून सरपंचपदाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे कोणत्या प्रवर्गातील सरपंच निवड आहे. हे निश्चित नाही. उमेदवारसह पॅनेलप्रमुख अडचणीत आहेत. दुसरीकडे निवडणूक आयोगाने १ जानेवारी १९९५ नंतर जन्मलेल्यांना सदस्य सरपंच पदासाठी सातवी पासची अट कायम ठेवली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीतून अंगठाबहाद्दूर हद्दपार होणार आहेत.

बाॅक्स ..

शिक्षित उमेदवारांमुळे विकासाला मिळू शकते चालना

पूर्वी ग्रामपंचायत प्रशासनात निवडून आलेल्यांमध्ये अशिक्षित महिला, पुरुष सदस्यांचाच भरणा असायचा. त्यामुळे ग्रामपंचायतीचे एकूणच कामकाज अशाप्रकारे चालते याविषयी त्यांना ज्ञान नसायचे. गावाच्या विकासासाठी पत्रव्यवहार करताना शिक्षित गावपुढाऱ्याला घेऊन काम करावे लागत असे. सरपंच, अधिकारी, कर्मचारी व गावपुढारी महत्त्वाचे निर्णय घेत होते; परंतु आता शिक्षित उमेदवारांना प्राधान्य दिले जात असल्याने गावाचा विकास हाेण्यास मदत हाेणार आहे. विशेष म्हणजे, ग्रा. पं. निवडणुकीला राजकीयदृष्ट्या वेगळे महत्त्व गावपातळीवर आहे. आपल्या गटाकडे सत्ता असावी या भावनेतून प्रत्येक गट प्रयत्न करून निवडणुकीत मताधिक्य मिळविण्याचा प्रयत्न करताे.