शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

ग्रा.पं. नामांकन आॅनलाईन प्रक्रियेतून सूट द्या

By admin | Updated: March 14, 2015 00:20 IST

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात संवेदनशिल भागातील ग्रामपंचायत निवडणुकीकरिता मागील तीन ते चार वर्षांपासून उमेदवारी अर्जच दाखल होत नाही.

दिलीप दहेलकर गडचिरोलीनक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात संवेदनशिल भागातील ग्रामपंचायत निवडणुकीकरिता मागील तीन ते चार वर्षांपासून उमेदवारी अर्जच दाखल होत नाही. त्यात आता राज्य निवडणूक आयोगाने आॅनलाईन नामांकन पत्र दाखल करून घेण्याचे निर्देश निवडणूक विभागाला दिले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत आॅनलाईन नामांकन अर्ज प्रक्रियेतून गडचिरोली जिल्ह्याला सूट देण्यात यावी, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला असल्याची माहिती मिळाली आहे.गडचिरोली जिल्ह्यात आगामी एप्रिल महिन्यात सार्वत्रिक ३४० व ८३ ग्रा.पं.च्या पोटनिवडणुका घेण्यासंदर्भात प्रशासनाचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे गेलेला आहे. मुदत भरणाऱ्या या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया यावेळी राज्यातील इतर भागाप्रमाणेच गडचिरोली जिल्ह्यातही आॅनलाईन करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिलेले आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात ७२० गावांमध्ये नेटवर्क नाही. शिवाय नक्षलग्रस्त व संवेदनशिल गावात माओवाद्यांच्या दहशतीमुळे नामांकन पत्र भरण्यासाठी अनेकदा नागरिक पुढे येत नाही. प्रशासनाला नागरिकांना सर्व बाबी समजावून देऊन त्यांच्या बैठका घेऊन ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. अशा परिस्थिती आॅनलाईन नामांकन प्रक्रिया गाव तसेच तालुकास्तरावर राबविल्यास उमेदवारी अर्ज येण्यास अडचणी येऊ शकतात. ही बाब प्रशासनाला अवगत आहे. त्यामुळे या प्रक्रियेतून सूट दिली जावी, असा प्रस्ताव जिल्हा निवडणूक विभागाने राज्य निवडणूक आयोगाकडे ठेवला आहे. एप्रिलमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी तहसील कार्यालयात इंटरनेट कनेक्टिव्हीटी पाहून आॅनलाईन नामांकन भरून घ्यायचे की, पूर्वीची पध्दत अमलात आणायची याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी यांनी लोकमतला दिली आहे.जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली, कोरची या अतिदुर्गम तालुकास्थळी इंटरनेट कनेक्टिव्हीटी राहत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत आॅनलाईन नामांकन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेपासून सूट देण्यात यावी, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे.