शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
2
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
3
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
4
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
5
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
6
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
7
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
8
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
9
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
10
“शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवले जातायत, शक्तिपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी”: नितेश राणे
11
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 
12
गिअरवाली बाईक, ती ही इलेक्ट्रीक...! काय मॅटर हाय...; २५ पैशांचा खर्च फक्त...
13
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
14
बंदुकीचा धाक दाखवून उचलून नेलं, लग्नही केलं... पाकिस्तानात १५ वर्षीय हिंदू मुलीचे झाले हाल
15
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
16
केरळमध्ये अडकलेल्या F-35 लढाऊ विमानाची दुरुस्ती अशक्य, तुकडे करुन ब्रिटनला घेऊन जाणार
17
एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान
18
बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
19
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
20
'माऊस जगलर' वापरून एकाचवेळी ५ कंपन्यात नोकरी; वर्षात ७ कोटींची कमाई; कसा झाला भांडाफोड?

ग्रा.पं. सदस्यांच्या ४७४ जागा रिक्त

By admin | Updated: May 3, 2016 01:45 IST

आगष्ट अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व रिक्त असलेल्या ग्रा.पं. सदस्यांच्या जागेसाठी पोटनिवडणुकीचा

दिलीप दहेलकर ल्ल गडचिरोलीआगष्ट अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व रिक्त असलेल्या ग्रा.पं. सदस्यांच्या जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाने जारी केला होता. १७ एप्रिल रोजी ग्रा.पं.च्या निवडणुका पार पडल्या. मात्र नागरिकांकडून नामांकनच दाखल करण्यात न आल्याने जिल्ह्यातील तब्बल १४८ ग्रामपंचायतीमधील तब्बल ४७४ सदस्यांच्या जागा रिक्त राहिल्या आहेत. परिणामी प्रशासनाला आणखी या ग्रा.पं.मध्ये निवडणुका घेण्याची कार्यवाही करावी लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने आॅगस्ट २०१६ अखेर मुदत संपणाऱ्या भामरागड तालुक्यातील मिरगुडवंचा, एटापल्ली तालुक्यातील गर्देवाडा, चामोर्शी तालुक्यातील घोट व गडचिरोली तालुक्यातील पारडी कुपी या चार ग्रामपंचायतीच्या एकूण ४२ जागांसाठी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यापैकी मिरगुडवंचा ग्रा.पं.मध्ये अविरोध निवड झाली तर घोट व पारडी कुपी ग्रा.पं.ची निवडणूक १७ एप्रिल रोजी पार पडली. मात्र एटापल्ली तालुक्यातील गर्देवाडा ग्रा.पं.च्या सदस्यांच्या नऊ जागांसाठी एकही नामांकन अर्ज दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे येथील नऊ जागा रिक्त आहेत. जिल्हा प्रशासनाने बाराही तालुक्यातील १६३ ग्रामपंचायतीमध्ये रिक्त झालेल्या ५१० जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम घोषीत केला. यापैकी १६ ग्रा.पं. मध्ये ४३ उमेदवार अविरोध निवडून आले. मात्र नामांकन दाखल न झाल्याने तब्बल १४७ ग्रामपंचायतीमधील सदस्यांच्या एकूण ४६५ जागा रिक्त राहिल्या आहेत. प्रशासनाने सदस्यांच्या जागा रिक्त असलेल्या भामरागड तालुक्यातील १७, एटापल्ली तालुक्यातील १९, अहेरी तालुक्यातील १७, चामोर्शी १७, गडचिरोली ५, धानोरा ३७, कुरखेडा ६, कोरची १६, देसाईगंज १, आरमोरी २, मुलचेरा ९ व सिरोंचा तालुक्यातील १७ अशा एकूण १६३ ग्रामपंचायतीमध्ये १७ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया घेण्यासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. या सर्व ग्रा.पं.मधून ५१० जागा निवडून द्यावयाच्या होत्या. यापैकी वायगाव ग्रा.पं.ची पोटनिवडणूक पार पडली व इतर ग्रामपंचायतीमधून ४३ उमेदवार अविरोध निवडून आले. मात्र नामांकनच दाखल न झाल्याने एकूण १४७ ग्रा.पं.मधील ४६५ जागा अद्यापही रिक्त राहिल्या आहेत.जात वैधता प्रमाणपत्राचाही अभाव४ग्रामपंचायत निवडणुकीत नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र भामरागड, एटापल्ली, अहेरी, धानोरा, कोरची, मुलचेरा, सिरोंचा या तालुक्याच्या दुर्गम भागातील अनेक नागरिक अद्यापही अशिक्षित आहेत. परिणामी ते जात वैधता प्रमाणपत्र काढत नाही. यामुळे त्यांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्यापासून वंचित राहावे लागते. जात वैधता प्रमाणपत्राअभावी नामांकन दाखल होत नसल्याने ग्रामपंचायतीच्या अनेक जागा दरवर्षी रिक्त राहतात.नक्षली दहशतीचा परिणाम ४राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जातो. मात्र नक्षल प्रभावित दुर्गम भागातील नागरिकांमध्ये नक्षल्यांची दहशत कायम असल्याने अनेक नागरिक ग्रा.पं. निवडणुकीत नामांकन दाखल करण्यासाठी पुढे येत नाही. त्यामुळे प्रशासनाला नामांकन प्राप्त न झालेल्या ग्रा.पं.च्या निवडणुका रद्द कराव्या लागतात. त्यानंतर पुन्हा राज्य निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर जिल्हा प्रशासन रिक्त राहिलेल्या ग्रा.पं.च्या जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करते. नक्षली दहशतीमुळे जिल्ह्यात वर्षभर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम राबविला जातो.