शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

ओबीसींच्या प्रश्नांवर राज्यपाल, मुख्यमंत्र्यांची सकारात्मक भूमिका

By admin | Updated: January 21, 2016 00:11 IST

भाजप प्रणीत राज्य सरकारकडून सध्या गडचिरोली जिल्ह्यात वेगवेगळ्या यंत्रणांकडून दोन सर्वेक्षण करण्यात येत आहे.

अशोक नेते यांची माहिती : जिल्ह्यात दोन सर्वेक्षण सुरूगडचिरोली : भाजप प्रणीत राज्य सरकारकडून सध्या गडचिरोली जिल्ह्यात वेगवेगळ्या यंत्रणांकडून दोन सर्वेक्षण करण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यातील ओबीसी व अनुसूचित जमाती लोकसंख्येची गावे नेमकी किती, लोकसंख्या किती या बाबींची वस्तूस्थिती समोर येणार आहे. त्यानंतरच पेसा अधिसूचनेमुळे निर्माण झालेली परिस्थिती दूर होण्यास मदत होईल व ओबीसींचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील. या प्रश्नांवर राज्यपाल, मुख्यमंत्री व सरकार यांची अतिशय सकारात्मक भूमिका आहे, अशी माहिती गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.खा. अशोक नेते म्हणाले की, आपण २००६ पासून ओबीसींच्या कमी झालेल्या आरक्षणाच्या मुद्यावर सतत राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत आहो, याशिवाय खासदार झाल्यानंतर लोकसभेतही शून्य प्रहरात अनेकवेळा या प्रश्नावर आपण चर्चा घडविली आहे. सर्वाधिक पाठपुरावा आपण या प्रश्नांवर केला आहे. पेसा अधिसूचना काँग्रेस सरकारच्या काळात लागू करण्यात आली. यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींवर खरोखरच अन्याय झाला आहे, आपल्याला याची जाणीव आहे. सरकारलासुद्धा याची जाणीव असून भारतीय जनता पक्षाचे सरकार याबाबत अतिशय संवेदनशीलपणे काम करीत आहे. मुख्यमंत्र्यांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान बैठक घेऊन पेसा लागू असलेल्या १३५३ गावांचे फेर सर्वेक्षण करण्याच्या सूचना गडचिरोली जिल्हा प्रशासनाला दिलेल्या आहेत. यादृष्टीने प्रशासन कामाला लागलेले आहे. पेसा अधिसूचना आदिवासींची ५१ टक्के लोकसंख्या असलेल्या गावाला लागू आहे. परंतु जिल्ह्यात यापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावातही ती लागू झाली आहे. तर आदिवासींची लोकसंख्या जास्त असणारी अनेक गावे वगळलीही गेली आहे. त्यामुळे संपूर्ण वस्तूस्थिती जाणण्याच्या दृष्टीने हे सर्वेक्षण महत्त्वाचे आहे. तसेच आदिवासी विकास विभागाने पुणे येथील टाटा इन्स्टिट्यूट या संस्थेमार्फतही स्वतंत्र सर्वेक्षण याच कामासाठी सुरू केले आहे. जातनिहाय जनगणना जाहीर करण्यात यावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली असून राज्याच्या पेसा लागू झालेल्या १२ जिल्ह्यात ही जनगणना होईल, अशी माहिती खासदार नेते यांनी दिली.राज्यपालांची चारवेळा तर मुख्यमंत्र्यांची दहा वेळा आमदार व खासदार तसेच ओबीसी नेत्यांच्या संयुक्त शिष्टमंडळाला घेऊन जाऊन भेट घेतली. काँग्रेस सरकारच्या काळात झालेले हे काम या सरकारच्या काळात व्यवस्थित मार्गी लावण्यासाठी कालावधी लागेल, असेही ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, जि. प. सदस्य प्रशांत वाघरे, रामेश्वर सेलुकर, गजानन येनगंधलवार, प्रकाश गेडाम, डॉ. भारत खटी, माजी जि. प. अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, विलास भांडेकर, अनिल पोहणकर उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)काँग्रेस उपनेत्यांचे विधान लोकशाहीविरोधीगडचिरोली येथे १८ जानेवारी रोजी काढण्यात आलेल्या मोर्चात काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते यांनी लोकांना निवडणुकीवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन केले. हे संसदीय लोकशाहीवर विश्वास नसल्याचे द्योतक आहे. विधानसभेच्या सदस्य असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारचे विधान करणे ही गंभीर बाब आहे. त्यांच्या या विधानाचा आपण निषेध करीत आहो, असे खासदार नेते म्हणाले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवरून केवळ राजकारण करण्याची भूमिका आपण कधीही घेतली नाही. मात्र काँग्रेसचे हे उपनेते समोर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका असल्याने मतांच्या राजकारणावर डोळा ठेवून या आंदोलनात सहभागी झाले. त्यांचा पक्ष सत्तेवर असताना हा सारा प्रकार घडला, त्यावेळी ते का बोलले नाही, याचे उत्तर त्यांनी जनतेला दिले पाहिजे, असे आवाहनही खा. अशोक नेते यांनी त्यांना केले आहे.