शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्यायावर राज्यपालांना साकडे

By admin | Updated: June 8, 2017 01:45 IST

आदिवासी समाजावर होत असलेल्या अन्यायासंदर्भात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने

२७ विषयांवर चर्चा : अ. भा. आदिवासी विकास परिषदेचा पुढाकार लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : आदिवासी समाजावर होत असलेल्या अन्यायासंदर्भात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने राजभवन मुंबई येथे ५ जून रोजी राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांच्या नेतृत्वात राज्यातील सर्व आदिवासी भागातील कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळासोबत राज्यपालांनी यावेळी चर्चा केली. यात गडचिरोली जिल्ह्यातून प्रा.डॉ.विनायक तुमराम तर गोंदिया जिल्ह्यातून डॉ.एन.डी. किरसान यांनी प्रतिनिधीत्व केले. आदिवासी समाजावर होत असलेल्या अन्याय-अत्याचाराची आणि शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक घुसखोरी, शोषण याची जाणीव राज्यपालांना करून देऊन धनगर आरक्षण हे आदिवासी समाजावर अन्याय करणारे कसे आहे, ते आदिवासी नसून त्यांचा समावेश आदिवासी जमातीत करू नये आणि आदिवासी गोरगरिब नागरिकांवर अन्याय करू नये या मागणीवर जोर देण्यात आला. याशिवाय आदिवासी मुलांच्या वसतिगृहाची संख्या वाढवावी, पंडित दिनदयाळ योजना तत्काळ बंद करावी, आश्रमशाळांमधील समस्या, आदिवासी बांधवांच्या जमिनीची समस्या, पेसा कायद्यानुसार नोकर भरती करून आदिवासी बांधवांना न्याय मिळावा आदी मागण्यांसह आदिवासींच्या विविध समस्यांसंदर्भात चर्चा करून निवेदन देण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, माजी आमदार शिवराम झोले, माजी आमदार पांडुरंग बाबा गांगड, लकीभाऊ जाधव, राम चव्हाण, रामनाथ भोजने, आर यु केराम, केशव तिराणिक चंद्रपूर, जाणू हिरवे व राज्यातील इतर पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिष्टमंडळाने गडचिरोली जिल्हयातील कर्मचाऱ्यांची कमतरता, प्रशासनाची उदासीनता, भामरागड, सुरजागड येथील लॉयड्स प्रकल्पाला असलेला स्थानिकांचा विरोध, ग्रामसभांना विश्वासात न घेतल्यामुळे उद्भवणारे प्रश्न आदींबाबत कारवाई करण्याची मागणी राज्यपालांकडे करण्यात आली. त्यावर राज्यपालांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.