शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

सरकारची पीक विमा योजना फसवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 01:46 IST

जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे गतवर्षी विविध रोग, कीड व पावसाच्या अनियमितपणामुळे अर्धे पीक नष्ट झाले. शासनाला अहवालही प्राप्त झाला. मात्र संबंधित खासगी विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही.

ठळक मुद्देमहेश कोपुलवार यांचा आरोप : किसान सभेचा २० ला आक्रोश मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे गतवर्षी विविध रोग, कीड व पावसाच्या अनियमितपणामुळे अर्धे पीक नष्ट झाले. शासनाला अहवालही प्राप्त झाला. मात्र संबंधित खासगी विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे विद्यमान सरकारची पीक विमा योजना फसवी आहे, असा आरोप किसान सभेचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेश कोपुलवार यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.विद्यमान सरकारमधील सत्ताधारी नेत्यांनी अनेक घोषणा केल्या. मात्र एकही घोषणा पूर्णत्त्वास आणली नाही. दीडपट हमीभाव, रोजगार व इतर सर्व घोषणा फोल ठरल्या, असे डॉ. कोपुलवार म्हणाले.महाराष्ट्र राज्य किसान सभा व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने २० आॅगस्ट रोजी राज्याचे वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर येथील कार्यालयावर शेतकरी, शेतमजूर व जबरानजोतधारकांचा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहितीही डॉ. कोपुलवार यांनी यावेळी दिली.किसान सभेच्या वतीने देसाईगंज येथील सिंधी भवनात १८ व १९ आॅगस्टला राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेला भाकपाचे राज्यसचिव तुकाराम भस्मे, किसान सभेचे राज्य सचिव नामदेव गावडे, शिवकुमार गणवीर, नामदेव कन्नाके, जि. प. सदस्य लालसू नागोटी, अर्थ व कृषी अभ्यासक प्रा. डॉ. श्रीनिवास खांदेवाले, अतुलकुमार अंजान उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. पत्रकार परिषदेला किसान महासभेचे जिल्हा सचिव देवराव चवळे, अ‍ॅड. जगदीश मेश्राम, हिरालाल येरमे, पुरूषोत्तम बांबोळे, हंसदास मेश्राम, प्रवीण मेश्राम हजर होते.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमा