शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

सरकारची पीक विमा योजना फसवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 01:46 IST

जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे गतवर्षी विविध रोग, कीड व पावसाच्या अनियमितपणामुळे अर्धे पीक नष्ट झाले. शासनाला अहवालही प्राप्त झाला. मात्र संबंधित खासगी विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही.

ठळक मुद्देमहेश कोपुलवार यांचा आरोप : किसान सभेचा २० ला आक्रोश मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे गतवर्षी विविध रोग, कीड व पावसाच्या अनियमितपणामुळे अर्धे पीक नष्ट झाले. शासनाला अहवालही प्राप्त झाला. मात्र संबंधित खासगी विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे विद्यमान सरकारची पीक विमा योजना फसवी आहे, असा आरोप किसान सभेचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेश कोपुलवार यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.विद्यमान सरकारमधील सत्ताधारी नेत्यांनी अनेक घोषणा केल्या. मात्र एकही घोषणा पूर्णत्त्वास आणली नाही. दीडपट हमीभाव, रोजगार व इतर सर्व घोषणा फोल ठरल्या, असे डॉ. कोपुलवार म्हणाले.महाराष्ट्र राज्य किसान सभा व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने २० आॅगस्ट रोजी राज्याचे वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर येथील कार्यालयावर शेतकरी, शेतमजूर व जबरानजोतधारकांचा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहितीही डॉ. कोपुलवार यांनी यावेळी दिली.किसान सभेच्या वतीने देसाईगंज येथील सिंधी भवनात १८ व १९ आॅगस्टला राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेला भाकपाचे राज्यसचिव तुकाराम भस्मे, किसान सभेचे राज्य सचिव नामदेव गावडे, शिवकुमार गणवीर, नामदेव कन्नाके, जि. प. सदस्य लालसू नागोटी, अर्थ व कृषी अभ्यासक प्रा. डॉ. श्रीनिवास खांदेवाले, अतुलकुमार अंजान उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. पत्रकार परिषदेला किसान महासभेचे जिल्हा सचिव देवराव चवळे, अ‍ॅड. जगदीश मेश्राम, हिरालाल येरमे, पुरूषोत्तम बांबोळे, हंसदास मेश्राम, प्रवीण मेश्राम हजर होते.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमा