शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

सरकारची पीक विमा योजना फसवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 01:46 IST

जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे गतवर्षी विविध रोग, कीड व पावसाच्या अनियमितपणामुळे अर्धे पीक नष्ट झाले. शासनाला अहवालही प्राप्त झाला. मात्र संबंधित खासगी विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही.

ठळक मुद्देमहेश कोपुलवार यांचा आरोप : किसान सभेचा २० ला आक्रोश मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे गतवर्षी विविध रोग, कीड व पावसाच्या अनियमितपणामुळे अर्धे पीक नष्ट झाले. शासनाला अहवालही प्राप्त झाला. मात्र संबंधित खासगी विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे विद्यमान सरकारची पीक विमा योजना फसवी आहे, असा आरोप किसान सभेचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेश कोपुलवार यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.विद्यमान सरकारमधील सत्ताधारी नेत्यांनी अनेक घोषणा केल्या. मात्र एकही घोषणा पूर्णत्त्वास आणली नाही. दीडपट हमीभाव, रोजगार व इतर सर्व घोषणा फोल ठरल्या, असे डॉ. कोपुलवार म्हणाले.महाराष्ट्र राज्य किसान सभा व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने २० आॅगस्ट रोजी राज्याचे वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर येथील कार्यालयावर शेतकरी, शेतमजूर व जबरानजोतधारकांचा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहितीही डॉ. कोपुलवार यांनी यावेळी दिली.किसान सभेच्या वतीने देसाईगंज येथील सिंधी भवनात १८ व १९ आॅगस्टला राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेला भाकपाचे राज्यसचिव तुकाराम भस्मे, किसान सभेचे राज्य सचिव नामदेव गावडे, शिवकुमार गणवीर, नामदेव कन्नाके, जि. प. सदस्य लालसू नागोटी, अर्थ व कृषी अभ्यासक प्रा. डॉ. श्रीनिवास खांदेवाले, अतुलकुमार अंजान उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. पत्रकार परिषदेला किसान महासभेचे जिल्हा सचिव देवराव चवळे, अ‍ॅड. जगदीश मेश्राम, हिरालाल येरमे, पुरूषोत्तम बांबोळे, हंसदास मेश्राम, प्रवीण मेश्राम हजर होते.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमा