शहरं
Join us  
Trending Stories
1
"तो गौरीला म्हणायचा की, स्वतः मरेन आणि तुलाही यात अडकवेल"; गौरी यांच्या मामाचे अनंत गर्जेबद्दल स्फोटक दावे, दोघांमध्ये काय घडलं?
2
'न बोलण्यासारखं काही घडलेलं नाही'; CM फडणवीसांकडून महायुतीतील दुराव्याच्या चर्चांना पूर्णविराम
3
ठाकरे बंधू एकत्र, उत्साह वाढला; पण अचानक ‘राज’ आज्ञा अन् मनसे इच्छुकांचा पुन्हा भ्रमनिरास
4
५० लाखांचे घर घ्यायचे की १ कोटीचे? '५-२०-३-४०' हा एक फॉर्म्युला देईल अचूक उत्तर!
5
IND vs SA 2nd Test : मुथुसामीची 'आउट ऑफ सिलॅबस सेंच्युरी'! पहिल्या डावात द.आफ्रिकेची मोठी धावसंख्या
6
शेअर बाजारात पैशांचा पाऊस! टॉप १० पैकी ७ कंपन्यांना १.२८ लाख कोटींचा फायदा; सर्वाधिक कमाई कोणाची?
7
VIDEO : "मजाक बना रखा है टेस्ट क्रिकेट को..." अंपायरनं घड्याळ दाखवलं; मग कुलदीपवर भडकला पंत
8
बापरे! आईच्या दुधात आढळलं युरेनियम, ६ जिल्ह्यांत ४० केस; नवजात बाळांना कॅन्सरचा मोठा धोका
9
पोलीस कॉन्स्टेबल होता ७ कोटींच्या लुटीच्या टोळीचा ट्रेनर; ३ महिन्यांचे नियोजन अन् RBI अधिकारी बनून केली लूट
10
बिहार निवडणूक निकाल २०२५ वर प्रशांत किशोर पुन्हा बोलले; म्हणाले, “महिलांना १० हजार...”
11
Senuran Muthusamy Maiden Test Century : मुथुसामीचा मोठा पराक्रम! ऐतिहासिक कसोटीत ठोकली पहिली सेंच्युरी
12
तुमच्या PAN कार्डवर कुणी कर्ज तर घेतले नाही ना? टीव्ही अभिनेत्यासोबत झाली मोठी फसवणूक; इथे तपासा
13
मार्गशीर्ष विनायक चतुर्थी २०२५: वरदान देईल गणपती, अर्पण करा ५ गोष्टी; कसा कराल व्रत विधी?
14
निवडणूक आयोगाचा चमत्कार; SIR अभियानाच्या एका फोन कॉलने जुळली ३७ वर्षांपूर्वी तुटलेली नाती
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना हवे तसे यश, कामे होतील; उसनवारी परत मिळेल, कोणाला कठीण काळ?
16
१६ वर्षांची साथ एका क्षणात सुटली... तेजस क्रॅशमधील विंग कमांडरच्या मृत्यूने पत्नीला मोठा धक्का
17
"मी घाबरून ३१व्या मजल्यावरील खिडकीतून..."; पत्नी गौरी पालवेंनी आयुष्य संपवले, गंभीर आरोपांवर अनंत गर्जे काय म्हणाले?
18
Sushma Andhare : "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
19
टीम इंडियाचा स्टार खेळाडू पुन्हा मैदानात ! तब्बल १ वर्षानंतर खेळताना दिसणार क्रिकेट सामना
20
शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंची BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, संतापून म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

श्रमिकांची एकजूट तोडण्याचे सरकारचे डावपेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:09 IST

कर्मचाऱ्यांच्या बाबतीत या सरकारचे धोरण उदारपणाचे नाही. श्रमिकांची एकजूट तोडण्याचे डावपेच सरकार आखत आहे. विविधतेतील एकता कायम टिकविण्यासोबतच कर्मचाºयांचे हित जोपासण्यासाठी....

ठळक मुद्देजि.प.महासंघाचा आरोप : त्रैमासिक सभेत ठरविली कर्मचाºयांच्या पुढील आंदोलनाची दिशा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कर्मचाऱ्यांच्या बाबतीत या सरकारचे धोरण उदारपणाचे नाही. श्रमिकांची एकजूट तोडण्याचे डावपेच सरकार आखत आहे. विविधतेतील एकता कायम टिकविण्यासोबतच कर्मचाºयांचे हित जोपासण्यासाठी महाराष्टÑ राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ टप्प्याटप्प्याने आंदोलन करणार आहे, अशी माहिती महासंघाचे राज्य सरचिटणीस अशोक थूल व इतर पदाधिकाºयांनी दिली.राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाºयांच्या २१ संघटनांचे प्रतिनिधीत्व करणाºया जि.प. कर्मचारी महासंघाची राज्यस्तरिय त्रैमासिक सभा शनिवारी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात पार पडली. या सभेला २२ जिल्ह्यातील १४ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सभेनंतर झालेल्या पत्रपरिषदेत थूल यांच्यासह महासंघाचे राज्य अध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, उपाध्यक्ष नंदकिशोर ठाकूर, राज्य ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ ढाकणे, परिचर संघटनेच्या वंदना मेश्राम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी सदर पदाधिकाºयांनी सांगितले, १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या कर्मचाºयांना पेन्शन नाकारली जात आहे. त्यात कर्मचाºयांच्या पगारातून १० टक्के रक्कम कपात केली जात आहे. सरकारने पीएफचा बदलविलेला कायदा रद्द करून कर्मचाºयांच्या पगारातून कपात केलेली १० टक्के रक्कम त्यांच्या भविष्य निर्वाह निधीत स्थानांतरित करावी. सध्या ४० टक्के कर्मचारी कंत्राटी आहेत. त्यांनी संघटित होऊ नये म्हणून दहशत निर्माण केली जात आहे. त्यांच्या हक्कावर ही गदा असून त्यांच्या पेन्शनसाठी, राज्यात सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी टप्प्याटप्प्याने संघर्ष केला जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.परिचरांना १२०० रु. पगारआरोग्य विभागाच्या अखत्यारित काम करणाऱ्या परिचरांना २०१० पासून अवघा १२०० रुपये पगार दिला जातो. नागपूर हायकोर्टाने त्यांना १० हजार रुपये मासिक पगार व वर्ग ४ चा दर्जा देण्याचे निर्देश दिले. पण त्याविरूद्ध सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपिल केले. हे सरकार केवळ उद्योगपतींचे हित जोपासत असल्याचा आरोपही त्यांनी केला.