शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

काँग्रेसतर्फे शासनाचा निषेध

By admin | Updated: May 30, 2016 01:26 IST

भाजपाच्या नेतृत्वातील केंद्र शासनाला २६ मे रोजी दोन वर्ष पूर्ण झाली. निवडणुकीच्या कालावधीत भाजपाने दिलेली आश्वासने पाळली नाहीत.

गांधी चौकात निदर्शने : केंद्र शासनाच्या धोरणांवर केली टीकागडचिरोली : भाजपाच्या नेतृत्वातील केंद्र शासनाला २६ मे रोजी दोन वर्ष पूर्ण झाली. निवडणुकीच्या कालावधीत भाजपाने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. जनतेसमोर अनेक समस्या आहेत. मात्र याकडे केंद्र शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत काँग्रेसतर्फे केंद्र शासनाच्या जनविरोधी धोरणाचा २९ मे रोजी इंदिरा गांधी चौकात निदर्शने देऊन निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेवराव उसेंडी, युवक काँग्रेसचे पंकज गुड्डेवार, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, तालुकाध्यक्ष शंकरराव सालोटकर, अ‍ॅड. राम मेश्राम, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, शहराध्यक्ष सतीश विधाते, पं. स. सदस्या अमिता मडावी, गडचिरोली विधानसभा अध्यक्ष अमोल भडांगे, एनएसयूआयचे अध्यक्ष नितेश राठोड, रजनीकांत मोटघरे, शेखर आखाडे, जीवन कुत्तरमारे, महासचिव प्रभाकर वासेकर, ओबीसी सेलचे अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, रोजगार व स्वयंरोजगार सेलचे अध्यक्ष काशिनाथ भडके, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष लतीफ रिझवी, सोशल मीडिया सेलचे नंदू वाईलकर, डी. डी. सोनटक्के, नेताजी गावतुरे, बापुजी लेनगुरे, पी. टी. मसराम, वसीम पठाण, राजू आखाडे, गौरव आलाम, प्रतिभा जुमनाके, केवळराम नंदेश्वर, जितेंद्र भांडेकर, विवेक घोंगडे, राकेश गणवीर, बालू मडावी, एजाज शेख, अभिजीत धाईत, हेमंत मोहितकर, सचिन सोटक्के, अजर कुकुडकर, सिद्धार्थ बांबोळे, अजित खोब्रागडे, सचिन राठोड, अजय कुमरे, म्हशाखेत्री, चैतन्य अर्जुनवार, अजिंक्य टेकाम, मामिडवार, नचिकेत जंबेवार, जयंत मोरे, गुंजन थुलकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.निवडणुकीच्या कालावधीत भाजपाच्या नेत्यांना जनतेला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. देशातील शेतकरी, ग्राहक, नागरिक, कामगार, कर्मचारी, दलित, अल्पसंख्यांक, आदिवासी, महिला, युवक हे सर्व समाजातील घटक केंद्र शासनाच्या मागील दोन वर्षांच्या कारभारामुळे नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या दुसऱ्या वर्धापनाचा प्रतिकात्मक निषेध केला व दुसरी पुण्यतिथी करून अच्छे दिनच्या फोटोला हार घालून निदर्शने केली. केंद्र शासनावर जनतेने विश्वास ठेवत हाती सत्ता सोपविली. यादरम्यान केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने देऊन सरकारचा निषेध केला. (नगर प्रतिनिधी)