शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
2
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
3
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
4
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
5
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
6
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
7
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
8
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
9
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
10
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
11
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
12
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
13
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
14
तेजस्वी पिछाडीवर, तिकडे तेज प्रताप यादवांची काय अवस्था...; 'हम तो डुबेंगे सनम...' खरे ठरतेय? 
15
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
16
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
17
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
18
Health And Ritual: दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी ही पूर्वापार परंपरा; मेंदू होतो सुपरफास्ट!
19
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
20
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त धान्य दुकानदारांविरोधात शासनाचे दबावतंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 22:53 IST

राज्यभरातील रास्तभाव दुकानदारांनी १ एप्रिलपासून संप करण्याचा इशारा दिल्यानंतर शासनाने दुकानदारांविरोधात जीवनावश्यक वस्तू अधिनियमान्वये कारवाई करण्याबाबतचे पत्र काढले आहे.

ठळक मुद्दे१ एप्रिलपासून आंदोलन : संघटनेचा पत्रकार परिषदेत आरोप

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : राज्यभरातील रास्तभाव दुकानदारांनी १ एप्रिलपासून संप करण्याचा इशारा दिल्यानंतर शासनाने दुकानदारांविरोधात जीवनावश्यक वस्तू अधिनियमान्वये कारवाई करण्याबाबतचे पत्र काढले आहे. मात्र या पत्राला न घाबरता स्वस्त धान्य दुकानदार १ एप्रिलपासून आंदोलन करतील, अशी माहिती राशन, केरोसीन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैैलाश शर्मा यांनी दिली आहे.स्वस्त धान्य दुकानदारांना मानधन देण्यात यावे या मुख्य मागणीसाठी १९ मार्च रोजी मुंबई येथे आंदोलन करण्यात आले होते. पुरवठा मंत्र्यांनी मागण्या अमान्य केल्याने १ एप्रिलपासून आंदोलनाचा इशारा दिला. आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पुरवठा विभागाचे प्रधान सचिव यांनी २२ मार्च रोजी पत्र काढले असून या पत्रानुसार एप्रिल महिन्याचे धान्य ३१ मार्चपूर्वीच दुकानदारांना वितरित करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. अन्नधान्याची उचल न केल्यास त्याचबरोबर दुकान बंद ठेवल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ व राष्टÑीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ मधील तरतुदींचा भंग केल्याचे समजण्यात येईल व त्यांच्यावर दुकानाचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असे पत्रात म्हटले आहे. मात्र मार्च महिन्याचे धान्य अजुनपर्यंत काही दुकानदारांना उपलब्ध झाले नाही. अशा परिस्थितीत एप्रिल महिन्याचे धान्य कसे काय स्वीकारणार. त्याचबरोबर मार्च महिन्याचे वाटप झाले नसताना अखेरचे शिल्लक दाखवायची कशी हा प्रश्न आहे. शासन केवळ स्वस्त धान्य दुकानदारांचा संप मोडीत काढण्याच्या उद्देशाने प्रयत्न करीत आहे. मात्र स्वस्त धान्य दुकानदार आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यानुसार आंदोलन केले जाईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली.पत्रकार परिषदेला कैलाश शर्मा यांच्यासह संघटनेचे जिल्हा सचिव अनिल भांडेकर, तालुकाध्यक्ष रमेश सोरदे, रामदास कुथे, दादाजी माकडे, भाष्कर वाघाडे, गोपाल मंडल, किशोर परसवानी, वासुदेव दुपारे, तोताजी आभारे उपस्थित होते.