शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर नाही

By admin | Updated: September 16, 2015 01:58 IST

केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची प्रचंड गळचेपी होत आहे. गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती.....

रायुकाँचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा : सलील देशमुख यांचा घणाघाती आरोपगडचिरोली : केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची प्रचंड गळचेपी होत आहे. गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असताना कुठेही शेत जमिनीचे सर्वेक्षण होताना दिसून येत नाही. शेतकऱ्याच्या शेत मालाला योग्य भाव नाही. अतिवृष्टीबाबत शासनाकडून आर्थिक मदत नाही, तसेच चर्चाही नाही, एकूणच सरकारच्या वाटचालीवरून भाजप प्रणीत सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मुळीच गंभीर नाही, असा घणाघाती आरोप रायुकाँचे प्रदेश उपाध्यक्ष व विदर्भ प्रभारी सलील देशमुख यांनी केला.राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा गडचिरोलीच्या वतीने मंगळवारी पक्षाच्या कार्यालयात रायुकाँचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून देशमुख बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राकाँचे जिल्हाध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार होते. प्रमुख अतिथी म्हणून आशिष नाईक, जि. प. अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, राकाँचे कार्याध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, हेमंत जंबेवार, युनुस शेख, अजय कुंभारे, श्रीनिवास गोडसेलवार, रिंकू पापडकर, नितीन खोबरागडे, युकाँचे सिरोंचा तालुकाध्यक्ष सतिश भोगे आदी उपस्थित होते. खोटे आश्वासन देऊन भाजपच्या नेत्यांनी केंद्र व राज्यात सत्ता मिळवली. सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक झाली, हे आता नागरिकांच्या लक्षात येत आहे. राकाँच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात भाजप सरकारच्या विरोधात जनजागृती करावी, तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर जनआंदोलन छेडावे, तसेच पक्ष संघटन मजबूत करावे, असे आवाहन सलील देशमुख यांनी यावेळी केले. याप्रसंगी सुरेश पोरेड्डीवार, भाग्यश्री आत्राम यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक श्रीनिवास गोडसेलवार, संचालन रिंकू पापडकर यांनी केले तर आभार अजय कुंभारे यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)