शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
4
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
5
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
6
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
7
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
8
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
9
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
10
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
11
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
12
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
13
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
14
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
15
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
16
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
17
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
18
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
19
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
20
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर नाही

By admin | Updated: September 16, 2015 01:58 IST

केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची प्रचंड गळचेपी होत आहे. गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती.....

रायुकाँचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा : सलील देशमुख यांचा घणाघाती आरोपगडचिरोली : केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची प्रचंड गळचेपी होत आहे. गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असताना कुठेही शेत जमिनीचे सर्वेक्षण होताना दिसून येत नाही. शेतकऱ्याच्या शेत मालाला योग्य भाव नाही. अतिवृष्टीबाबत शासनाकडून आर्थिक मदत नाही, तसेच चर्चाही नाही, एकूणच सरकारच्या वाटचालीवरून भाजप प्रणीत सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मुळीच गंभीर नाही, असा घणाघाती आरोप रायुकाँचे प्रदेश उपाध्यक्ष व विदर्भ प्रभारी सलील देशमुख यांनी केला.राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा गडचिरोलीच्या वतीने मंगळवारी पक्षाच्या कार्यालयात रायुकाँचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून देशमुख बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राकाँचे जिल्हाध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार होते. प्रमुख अतिथी म्हणून आशिष नाईक, जि. प. अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, राकाँचे कार्याध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, हेमंत जंबेवार, युनुस शेख, अजय कुंभारे, श्रीनिवास गोडसेलवार, रिंकू पापडकर, नितीन खोबरागडे, युकाँचे सिरोंचा तालुकाध्यक्ष सतिश भोगे आदी उपस्थित होते. खोटे आश्वासन देऊन भाजपच्या नेत्यांनी केंद्र व राज्यात सत्ता मिळवली. सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक झाली, हे आता नागरिकांच्या लक्षात येत आहे. राकाँच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात भाजप सरकारच्या विरोधात जनजागृती करावी, तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर जनआंदोलन छेडावे, तसेच पक्ष संघटन मजबूत करावे, असे आवाहन सलील देशमुख यांनी यावेळी केले. याप्रसंगी सुरेश पोरेड्डीवार, भाग्यश्री आत्राम यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक श्रीनिवास गोडसेलवार, संचालन रिंकू पापडकर यांनी केले तर आभार अजय कुंभारे यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)