शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर नाही

By admin | Updated: September 16, 2015 01:58 IST

केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची प्रचंड गळचेपी होत आहे. गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती.....

रायुकाँचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा : सलील देशमुख यांचा घणाघाती आरोपगडचिरोली : केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची प्रचंड गळचेपी होत आहे. गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असताना कुठेही शेत जमिनीचे सर्वेक्षण होताना दिसून येत नाही. शेतकऱ्याच्या शेत मालाला योग्य भाव नाही. अतिवृष्टीबाबत शासनाकडून आर्थिक मदत नाही, तसेच चर्चाही नाही, एकूणच सरकारच्या वाटचालीवरून भाजप प्रणीत सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मुळीच गंभीर नाही, असा घणाघाती आरोप रायुकाँचे प्रदेश उपाध्यक्ष व विदर्भ प्रभारी सलील देशमुख यांनी केला.राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा गडचिरोलीच्या वतीने मंगळवारी पक्षाच्या कार्यालयात रायुकाँचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून देशमुख बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राकाँचे जिल्हाध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार होते. प्रमुख अतिथी म्हणून आशिष नाईक, जि. प. अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, राकाँचे कार्याध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, हेमंत जंबेवार, युनुस शेख, अजय कुंभारे, श्रीनिवास गोडसेलवार, रिंकू पापडकर, नितीन खोबरागडे, युकाँचे सिरोंचा तालुकाध्यक्ष सतिश भोगे आदी उपस्थित होते. खोटे आश्वासन देऊन भाजपच्या नेत्यांनी केंद्र व राज्यात सत्ता मिळवली. सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक झाली, हे आता नागरिकांच्या लक्षात येत आहे. राकाँच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात भाजप सरकारच्या विरोधात जनजागृती करावी, तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर जनआंदोलन छेडावे, तसेच पक्ष संघटन मजबूत करावे, असे आवाहन सलील देशमुख यांनी यावेळी केले. याप्रसंगी सुरेश पोरेड्डीवार, भाग्यश्री आत्राम यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक श्रीनिवास गोडसेलवार, संचालन रिंकू पापडकर यांनी केले तर आभार अजय कुंभारे यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)