शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शासनामुळे देशात अशांततेचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 23:53 IST

विद्यमान शासनाने जातीयवाद वाढवून देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ही बाब येथील जनतेच्या लक्षात आली आहे. त्यामुळे देशात व राज्यात सत्ता परिवर्तन अटळ आहे. अशी प्रतिक्रिया भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष तथा माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केली.

ठळक मुद्देचंद्रकांत हंडोरे यांची प्रतिक्रिया : भाजपप्रणीत सरकारने जनतेची दिशाभूल केली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विद्यमान शासनाने जातीयवाद वाढवून देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ही बाब येथील जनतेच्या लक्षात आली आहे. त्यामुळे देशात व राज्यात सत्ता परिवर्तन अटळ आहे. अशी प्रतिक्रिया भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष तथा माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केली.गडचिरोली येथे बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला चंद्रकांत हंडोरे गडचिरोलीत आले असता पत्रकारांशी वार्तालाप करीत होते. २०१४ च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने अवास्तविक आश्वासने दिली. ही आश्वासने पूर्ण करणे मोदी सरकारला शक्य झाला नाही. सत्तेसाठी शासनाने जनतेची फसवणूक केली आहे. ही बाब आता जनतेच्या लक्षात यायला लागली आहे. याचा परिणाम छत्तीसगड, राजस्थान व मध्यप्रदेशातील निवडणुकीत दिसून आला आहे. याचाच प्रत्यय येत्या लोकसभा निवडणूकीत येणार आहे. विद्यमान शासनाने जातीजातींमध्ये तेढ निर्माण करून देशातील शांतता धोक्यात आणली आहे. राज्यघटना बदलविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी शासनाने निश्चीत आराखडा तयार करावा. भीमशक्ती संघटना सामाजिक संघटना असून नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच अन्याय, अत्याचारविरोधात लढत आहे. अशी माहिती दिली. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर, भीमशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. यशवंत मेश्राम, जिल्हाध्यक्ष कैवरदास रायपुरे, नामदेव पिंपळे, पंकज मेश्राम, अविनाश भगत, विजय मेश्राम, राजेश देशभ्रतार, श्याम खंडारे, विनय बांबोळे, प्रकाश देशपांडे आदी उपस्थित होते.