शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

गोरजाई डोहावरील पाणी योजना वाऱ्यावर

By admin | Updated: April 15, 2017 01:37 IST

आरमोरी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वैरागड येथे ३० वर्षापूर्वीच्याच जुन्या पाणीपुरवठा

ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष : वैरागडातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमच वैरागड : आरमोरी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वैरागड येथे ३० वर्षापूर्वीच्याच जुन्या पाणीपुरवठा योजनेवर गावातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. सदर योजना अपुरी असल्याने एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच गावात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन दिवसाआड नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात असून काही वॉर्डातील नळधारकांना पिण्याचे पाणीदेखील मिळणे कठीण झाले आहे. वैरागड येथे उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने गोरजाई डोहावर नवीन पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार करून नव्या पाणी योजनेचा प्रारूप आराखडा तयार केला. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत वैरागड येथे वाढीव नळ पाणीपुरवठा योजनेचे काम मंजूर करण्याबाबत वैरागड ग्राम पंचायतीला पत्र प्राप्त झाले होते. मात्र पाणी योजना पुढे सरकली नाही. पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी गोरजाई डोहाच्या काठावर जागा नियोजित करण्यात आली. मात्र अद्यापही भूमिपूजनाचा मुहूर्त गवसला नाही. जुन्या पाणीपुरवठा योजनेची पाण्याची टाकी ७५ हजार लीटर क्षमतेची होती. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागे पूरक पाण्याची टाकी बांधण्यात आली. दोन-तीन वर्षांपूर्वी भोयर यांच्या घराजवळ ग्राम पंचायतीच्या मालकीच्या जागेत १५० हजार लीटर क्षमतेची पाणी टाकी बांधण्यात आली. मात्र वैरागड येथे जुनीच नळ पाणीपुरवठा योजना असल्याने गावात काही वॉर्डात बारमाही पाणी संकट निर्माण झाले आहे. यावर्षात नदीकाठावरील शेतकऱ्यांनी उन्हाळी धानपिकाची लागवड केली. दरम्यान नदीपात्रात खड्डे करून पिकाला पाणीपुरवठा करीत असल्याने नदीपात्रातील जलसाठा आटला. त्यामुळे येथील पाणीपुरवठा योजनेची विहीर पूर्णत: भरण्यास दोन दिवसाचा कालावधी लागत आहे. दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असून ज्यांच्याकडे टिल्लूपंप आहे. त्यांना अधिक पाणी मिळते. मात्र इतर लोकांना पुरेसे पाणी मिळत नाही. या गंभीर पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे स्थानिक ग्राम पंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गावातील नागरिक नाराज आहेत. (वार्ताहर) आमदारांनी लक्ष देण्याची गरज वैरागड हे गडचिरोली जिल्ह्यातील मोठे गाव आहे. गावाची लोकसंख्या मागील काही वर्षात वाढली आहे. गावालगतच्या नदीवर गोरजाई डोह असून यावर आधारित नवी पाणीपुरवठा योजना निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आ. क्रिष्णा गजबे यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. काय म्हणतात, ग्रामसेवक! वैरागड गावात गेल्या काही दिवसांपासून बहुतांश वॉर्डात अपुरा पाणीपुरवठा होत असून पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत आहे. यासंदर्भात प्रस्तूत प्रतिनिधीने वैरागड ग्राम पंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पाणीटंचाईबाबत कोणतीही उपाययोजना केली नाही, असे सांगितले.