शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

गोरजाई डोहावरील पाणी योजना वाऱ्यावर

By admin | Updated: April 15, 2017 01:37 IST

आरमोरी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वैरागड येथे ३० वर्षापूर्वीच्याच जुन्या पाणीपुरवठा

ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष : वैरागडातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमच वैरागड : आरमोरी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वैरागड येथे ३० वर्षापूर्वीच्याच जुन्या पाणीपुरवठा योजनेवर गावातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. सदर योजना अपुरी असल्याने एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच गावात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन दिवसाआड नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात असून काही वॉर्डातील नळधारकांना पिण्याचे पाणीदेखील मिळणे कठीण झाले आहे. वैरागड येथे उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने गोरजाई डोहावर नवीन पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार करून नव्या पाणी योजनेचा प्रारूप आराखडा तयार केला. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत वैरागड येथे वाढीव नळ पाणीपुरवठा योजनेचे काम मंजूर करण्याबाबत वैरागड ग्राम पंचायतीला पत्र प्राप्त झाले होते. मात्र पाणी योजना पुढे सरकली नाही. पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी गोरजाई डोहाच्या काठावर जागा नियोजित करण्यात आली. मात्र अद्यापही भूमिपूजनाचा मुहूर्त गवसला नाही. जुन्या पाणीपुरवठा योजनेची पाण्याची टाकी ७५ हजार लीटर क्षमतेची होती. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागे पूरक पाण्याची टाकी बांधण्यात आली. दोन-तीन वर्षांपूर्वी भोयर यांच्या घराजवळ ग्राम पंचायतीच्या मालकीच्या जागेत १५० हजार लीटर क्षमतेची पाणी टाकी बांधण्यात आली. मात्र वैरागड येथे जुनीच नळ पाणीपुरवठा योजना असल्याने गावात काही वॉर्डात बारमाही पाणी संकट निर्माण झाले आहे. यावर्षात नदीकाठावरील शेतकऱ्यांनी उन्हाळी धानपिकाची लागवड केली. दरम्यान नदीपात्रात खड्डे करून पिकाला पाणीपुरवठा करीत असल्याने नदीपात्रातील जलसाठा आटला. त्यामुळे येथील पाणीपुरवठा योजनेची विहीर पूर्णत: भरण्यास दोन दिवसाचा कालावधी लागत आहे. दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असून ज्यांच्याकडे टिल्लूपंप आहे. त्यांना अधिक पाणी मिळते. मात्र इतर लोकांना पुरेसे पाणी मिळत नाही. या गंभीर पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे स्थानिक ग्राम पंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गावातील नागरिक नाराज आहेत. (वार्ताहर) आमदारांनी लक्ष देण्याची गरज वैरागड हे गडचिरोली जिल्ह्यातील मोठे गाव आहे. गावाची लोकसंख्या मागील काही वर्षात वाढली आहे. गावालगतच्या नदीवर गोरजाई डोह असून यावर आधारित नवी पाणीपुरवठा योजना निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आ. क्रिष्णा गजबे यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. काय म्हणतात, ग्रामसेवक! वैरागड गावात गेल्या काही दिवसांपासून बहुतांश वॉर्डात अपुरा पाणीपुरवठा होत असून पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत आहे. यासंदर्भात प्रस्तूत प्रतिनिधीने वैरागड ग्राम पंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पाणीटंचाईबाबत कोणतीही उपाययोजना केली नाही, असे सांगितले.