शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
3
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
4
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
5
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
6
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
7
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
8
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
9
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
10
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
11
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
12
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
13
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
14
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
15
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
16
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
17
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
18
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
20
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण

गोपाळ समाज उपेक्षितच

By admin | Updated: June 25, 2017 01:26 IST

भारतातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत सोयीसुविधा मिळण्याचा अधिकार व हक्क आहे.

जात प्रमाणपत्र मिळेना : शासकीय योजना पोहोचल्या नाही लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : भारतातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत सोयीसुविधा मिळण्याचा अधिकार व हक्क आहे. शिवाय शासकीय योजनेचा लाभ घेऊन आर्थिक स्तर उंचाविण्याची संविधानात तरतूद आहे. मात्र अशिक्षितपणामुळे आरमोरी नगर पंचायत क्षेत्रात येणाऱ्या व आरमोरीपासून चार किमी अंतरावर असलेला गोपाळ समाज विकासापासून वंचित आहे. सदर गोपाळ समाजाच्या वस्तीत मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असून येथील नागरिक जात प्रमाणपत्रापासून वंचित असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. आरमोरीपासून चार किमी अंतरावर असलेल्या गोपाळ समाजाच्या वस्तीत जवळपास २५ कुटूंब असून येथील लोकसंख्या १०० आहे. येथील काही नागरिक नगर पंचायतीचे मतदार असून येथील लोकांकडे केवळ मतदान ओळखपत्र आहे. या पलिकडे इतर कोणतेही महत्त्वपूर्ण कागदपत्रे त्यांच्याकडे नाहीत. गावागावात फिरून गारूडीचा खेळ करण्यासोबत मोलमजुरी करून उपजिविका येथील नागरिक भागवित आहेत. सदर वस्तीत पक्के रस्ते, नाल्यांचा अभाव आहे. शासनाने वैयक्तिक लाभाच्या विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. मात्र येथील एकाही नागरिकाला संजय गांधी व इतर वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ मिळत नाही. आरमोरी ग्राम पंचायत असताना इंदिरा गांधी आवास योजनेतून या वस्तीतील काही मोजक्या कुटुंबांना घरकूल मिळाले. मात्र नगर पंचायत झाल्यापासून येथे घरकूल मिळाले नाही. ५० वर्षांपासून या वस्तीत गोपाळ समाज बांधवांचे वास्तव्य असतानासुद्धा येथील नागरिक विविध मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधी विकास होत असल्याचा कांगावा करीत असले तरी गोपाळ समाजाच्या वस्तीकडे बघितले असता, विकासाची प्रक्रिया तळागाळापर्यंत पोहोचली नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते. आजवर जिल्ह्यातील एकही लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी या गोपाळ वस्तीला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेण्याचे सौदार्य दाखविले नाही. गडचिरोली मार्गावरील गाढवी नदीजवळ ही वस्ती असली तरी प्रशासनाचे या वस्तीच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. रवी दिलीप नेवारे हा मुलगा गतवर्षी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला. मात्र जात प्रमाणपत्र नसल्याने पुढील शिक्षणापासून तो वंचित असल्याची माहिती आहे. आरमोरी न. पं. क्षेत्रातील वॉर्ड क्र. ७ मध्ये समावेश असलेल्या गोपाळ समाजाच्या वस्तीत अनेक समस्या कायम आहेत. शिवाय येथील नागरिक हलाखीचे जीवन जगत आहेत. सदर वस्तीतील नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी या समाजातील नागरिकांना जात प्रमाणपत्र मिळवून द्यावे, उदर्निवाहासाठी दोन एकर शेती शासनातर्फे मिळवून द्यावी तसेच इतर मूलभूत सुविधा व शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी पाऊले उचलावी. - चंदू वडपल्लीवार, माजी सभापती, पं. स. आरमोरी