शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गोपाळ समाज उपेक्षितच

By admin | Updated: June 25, 2017 01:26 IST

भारतातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत सोयीसुविधा मिळण्याचा अधिकार व हक्क आहे.

जात प्रमाणपत्र मिळेना : शासकीय योजना पोहोचल्या नाही लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : भारतातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत सोयीसुविधा मिळण्याचा अधिकार व हक्क आहे. शिवाय शासकीय योजनेचा लाभ घेऊन आर्थिक स्तर उंचाविण्याची संविधानात तरतूद आहे. मात्र अशिक्षितपणामुळे आरमोरी नगर पंचायत क्षेत्रात येणाऱ्या व आरमोरीपासून चार किमी अंतरावर असलेला गोपाळ समाज विकासापासून वंचित आहे. सदर गोपाळ समाजाच्या वस्तीत मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असून येथील नागरिक जात प्रमाणपत्रापासून वंचित असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. आरमोरीपासून चार किमी अंतरावर असलेल्या गोपाळ समाजाच्या वस्तीत जवळपास २५ कुटूंब असून येथील लोकसंख्या १०० आहे. येथील काही नागरिक नगर पंचायतीचे मतदार असून येथील लोकांकडे केवळ मतदान ओळखपत्र आहे. या पलिकडे इतर कोणतेही महत्त्वपूर्ण कागदपत्रे त्यांच्याकडे नाहीत. गावागावात फिरून गारूडीचा खेळ करण्यासोबत मोलमजुरी करून उपजिविका येथील नागरिक भागवित आहेत. सदर वस्तीत पक्के रस्ते, नाल्यांचा अभाव आहे. शासनाने वैयक्तिक लाभाच्या विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. मात्र येथील एकाही नागरिकाला संजय गांधी व इतर वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ मिळत नाही. आरमोरी ग्राम पंचायत असताना इंदिरा गांधी आवास योजनेतून या वस्तीतील काही मोजक्या कुटुंबांना घरकूल मिळाले. मात्र नगर पंचायत झाल्यापासून येथे घरकूल मिळाले नाही. ५० वर्षांपासून या वस्तीत गोपाळ समाज बांधवांचे वास्तव्य असतानासुद्धा येथील नागरिक विविध मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधी विकास होत असल्याचा कांगावा करीत असले तरी गोपाळ समाजाच्या वस्तीकडे बघितले असता, विकासाची प्रक्रिया तळागाळापर्यंत पोहोचली नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते. आजवर जिल्ह्यातील एकही लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी या गोपाळ वस्तीला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेण्याचे सौदार्य दाखविले नाही. गडचिरोली मार्गावरील गाढवी नदीजवळ ही वस्ती असली तरी प्रशासनाचे या वस्तीच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. रवी दिलीप नेवारे हा मुलगा गतवर्षी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला. मात्र जात प्रमाणपत्र नसल्याने पुढील शिक्षणापासून तो वंचित असल्याची माहिती आहे. आरमोरी न. पं. क्षेत्रातील वॉर्ड क्र. ७ मध्ये समावेश असलेल्या गोपाळ समाजाच्या वस्तीत अनेक समस्या कायम आहेत. शिवाय येथील नागरिक हलाखीचे जीवन जगत आहेत. सदर वस्तीतील नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी या समाजातील नागरिकांना जात प्रमाणपत्र मिळवून द्यावे, उदर्निवाहासाठी दोन एकर शेती शासनातर्फे मिळवून द्यावी तसेच इतर मूलभूत सुविधा व शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी पाऊले उचलावी. - चंदू वडपल्लीवार, माजी सभापती, पं. स. आरमोरी