शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

गोपाळ समाज उपेक्षितच

By admin | Updated: June 25, 2017 01:26 IST

भारतातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत सोयीसुविधा मिळण्याचा अधिकार व हक्क आहे.

जात प्रमाणपत्र मिळेना : शासकीय योजना पोहोचल्या नाही लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : भारतातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत सोयीसुविधा मिळण्याचा अधिकार व हक्क आहे. शिवाय शासकीय योजनेचा लाभ घेऊन आर्थिक स्तर उंचाविण्याची संविधानात तरतूद आहे. मात्र अशिक्षितपणामुळे आरमोरी नगर पंचायत क्षेत्रात येणाऱ्या व आरमोरीपासून चार किमी अंतरावर असलेला गोपाळ समाज विकासापासून वंचित आहे. सदर गोपाळ समाजाच्या वस्तीत मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असून येथील नागरिक जात प्रमाणपत्रापासून वंचित असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. आरमोरीपासून चार किमी अंतरावर असलेल्या गोपाळ समाजाच्या वस्तीत जवळपास २५ कुटूंब असून येथील लोकसंख्या १०० आहे. येथील काही नागरिक नगर पंचायतीचे मतदार असून येथील लोकांकडे केवळ मतदान ओळखपत्र आहे. या पलिकडे इतर कोणतेही महत्त्वपूर्ण कागदपत्रे त्यांच्याकडे नाहीत. गावागावात फिरून गारूडीचा खेळ करण्यासोबत मोलमजुरी करून उपजिविका येथील नागरिक भागवित आहेत. सदर वस्तीत पक्के रस्ते, नाल्यांचा अभाव आहे. शासनाने वैयक्तिक लाभाच्या विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. मात्र येथील एकाही नागरिकाला संजय गांधी व इतर वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ मिळत नाही. आरमोरी ग्राम पंचायत असताना इंदिरा गांधी आवास योजनेतून या वस्तीतील काही मोजक्या कुटुंबांना घरकूल मिळाले. मात्र नगर पंचायत झाल्यापासून येथे घरकूल मिळाले नाही. ५० वर्षांपासून या वस्तीत गोपाळ समाज बांधवांचे वास्तव्य असतानासुद्धा येथील नागरिक विविध मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधी विकास होत असल्याचा कांगावा करीत असले तरी गोपाळ समाजाच्या वस्तीकडे बघितले असता, विकासाची प्रक्रिया तळागाळापर्यंत पोहोचली नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते. आजवर जिल्ह्यातील एकही लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी या गोपाळ वस्तीला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेण्याचे सौदार्य दाखविले नाही. गडचिरोली मार्गावरील गाढवी नदीजवळ ही वस्ती असली तरी प्रशासनाचे या वस्तीच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. रवी दिलीप नेवारे हा मुलगा गतवर्षी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला. मात्र जात प्रमाणपत्र नसल्याने पुढील शिक्षणापासून तो वंचित असल्याची माहिती आहे. आरमोरी न. पं. क्षेत्रातील वॉर्ड क्र. ७ मध्ये समावेश असलेल्या गोपाळ समाजाच्या वस्तीत अनेक समस्या कायम आहेत. शिवाय येथील नागरिक हलाखीचे जीवन जगत आहेत. सदर वस्तीतील नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी या समाजातील नागरिकांना जात प्रमाणपत्र मिळवून द्यावे, उदर्निवाहासाठी दोन एकर शेती शासनातर्फे मिळवून द्यावी तसेच इतर मूलभूत सुविधा व शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी पाऊले उचलावी. - चंदू वडपल्लीवार, माजी सभापती, पं. स. आरमोरी