शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

खुशखबर ! जुने जन्म-मृत्यू रेकाॅर्ड आता मिळणार ग्रामपंचायतींमधून !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 22:05 IST

पूर्वी जन्म-मृत्यूच्या दाखल्यासाठी नागरिकांना सावली येथे पंचायत समितीत यावे लागत होते. मात्र आता ग्रामपंचायतींमधून जन्म-मृत्यूचे दाखले नागरिकांना मिळत आहे. यामुळे नागरिकांची पायपीट थांबल्याने पंचायत समितीच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.जुने जन्म -मृत्यूच्या दाखला मिळवण्यासाठी नागरिकांना पंचायत समितीच्या चकरा माराव्या लागत होत्या; परंतु या निर्णयामुळे गावातच दाखले मिळत असल्याने नागरिक समाधानी आहेत.  

दिलीप फुलबांधेलोकमत न्यूज नेटवर्कगेवरा :  अनेक वर्षांपासूनचे जुने जन्म-मृत्यूचे रेकॉर्ड पंचायत समितीकडे असल्यामुळे गावातून तालुक्यात येऊन दाखला मिळविण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत होती. आता पंचायत समितीने सर्व रेकॉर्ड ग्रामपंचायतींना पाठविण्याचा निर्णय घेतला असून, यापुढे ग्रामपंचायतींमधून दाखले मिळणार आहेत. या निर्णयाचे तालुक्यातील जनतेने स्वागत केले आहे.गेल्या अनेक वर्षांपासून जुने जन्म - मृत्यू रेकॉर्ड पंचायत समितीकडे जमा करण्यात आले होते. सावली तालुक्यातील नागरिकांना जुने जन्म - मृत्यू दाखले काढायचे असल्यास सावली येथील पंचायत समिती कार्यालयात यावे लागते होते. आठवड्यातून दोन दिवस दाखले देण्याचे ठरले होते, मात्र त्या दिवशी अचानक  अधिकारी बैठकीसाठी किंवा कामासाठी गेल्यास नागरिकांना रिकाम्या हाती परत जावे लागत होते. अनेकदा रेकॉर्ड नसल्यास दाखले उपलब्ध नसल्याचा दाखला घेऊन परत जावे लागत असे.नागरिकांना पायपीट करावी लागत असे.  ही बाब पंचायत समिती पदाधिकारी यांच्या लक्षात आली. त्यांनी मासिक सभेत जन्म-मृत्यू रेकॉर्ड ग्रामपंचायतींना परत करण्याचा ठराव घेतला. हा ठराव रवींद्र बोलीवार यांनी मांडला व सर्वानुमते सभापती विजय कोरेवार, सदस्य तुकाराम ठिकरे, गणपत कोठारे, छाया शेंडे, मनिषा जवादे, ऊर्मिला तरारे, संगीता चौधरी यांनी ठरावाला मान्यता दिली. गटविकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे यांनी अंमलबजावणी करून ग्रामपंचायतींना रेकॉर्ड परत केले.

नागरिकांची पायपीट थांबलीपूर्वी जन्म-मृत्यूच्या दाखल्यासाठी नागरिकांना सावली येथे पंचायत समितीत यावे लागत होते. मात्र आता ग्रामपंचायतींमधून जन्म-मृत्यूचे दाखले नागरिकांना मिळत आहे. यामुळे नागरिकांची पायपीट थांबल्याने पंचायत समितीच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.

जुने जन्म -मृत्यूच्या दाखला मिळवण्यासाठी नागरिकांना पंचायत समितीच्या चकरा माराव्या लागत होत्या; परंतु या निर्णयामुळे गावातच दाखले मिळत असल्याने नागरिक समाधानी आहेत.   या निर्णयासाठी बिडीओ मरस्कोल्हे यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. नागरिकांनी ग्रामपंचायतमध्ये जाऊन दाखले घ्यावेत.                 -विजय कोरेवार,  सभापती, सावली

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत