शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

गोंडवानात वीर बाबुरावांनी पेटविली स्वातंत्र्यसंग्राम ज्योत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 23:36 IST

इस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेनंतर इंग्रज भारतात हळुहळू स्थिरावले. १७५७ च्या प्लासीच्या लढाईपासून तर १८५७ पर्यंत भारतातील राजवटी, संस्थानांना स्वत:चे मालकीत्व स्वीकारायला लावत,

ठळक मुद्देइस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेनंतर इंग्रज भारतात हळुहळू स्थिरावले.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : इस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेनंतर इंग्रज भारतात हळुहळू स्थिरावले. १७५७ च्या प्लासीच्या लढाईपासून तर १८५७ पर्यंत भारतातील राजवटी, संस्थानांना स्वत:चे मालकीत्व स्वीकारायला लावत, संस्थाने खालसा करत देशामध्ये इंग्रजानी एकछत्री अंमल केला. सगळीकडे इंग्रज राजवट होती. या देशातील नागरिकांना गुलामीचे जीवन जगावे लागत होते. अशास्थितीत जनतेत स्वाभिमान, अस्मिता निर्माण होण्यासाठी १८५७ चा उठाव कारणीभूत ठरला. गोंडवानाच्या गडामंडलाचा राजा शंकरशहा आणि त्याचा पुत्र रघुनाथशहा यांनी उत्तर गोंडवानामध्ये इंग्रजाविरूद्ध प्रथम उठाव केला आणि पाहता-पाहता सगळीकडे इंग्रजांविरूद्ध युद्धाची ठिणगी पेटली. १८५७ चा उठाव इतिहासाच्या पानांवर सुवर्ण अक्षरांनी लिहिल्या गेला. १८५७ च्या उठावाचे लोण सगळीकडे पसरल्याने शेवटी दक्षिण गोंडवानामध्ये राजकुमार बाबुराव शेडमाके यांनी ब्रिटिश फौजेला सळो की पळो करून सोडले. अनेकदा ब्रिटिश सेनेचा पराभव केला आणि भारत मातेच्या रक्षणासाठी २१ आॅक्टोबर १८५८ ला हसतहसत फासावर गेले.त्यांचा आज शहीद दिन.क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांचा जन्म १२ मार्च १८३३ मधे अहेरी तालुक्यातील किष्टापूर (मोलमपल्ली) येथील राजवाड्यात पुलेश्वर शेडमाके आणि सुरजा कुंवर यांच्यापोटी झाला. १३ मार्च १८५८ ला घोसरी येथे बाबुरावांच्या सैन्याने ढाल, तलवार, तीरकमठे घेवून इंग्रजांवर आक्रमण केले. त्यात अनेक इंग्रज सैनिक ठार झाले. बाबुराव व त्यांच्या साथीदारांनी २९ एप्रिल १८५८ ला इंग्रजांच्या छावणीवर हल्ला केला. यामधे कॅप्टन हॉल, कॅप्टन गार्टलॅन्ड हे ठार झाले. बाबुरावांनी १५ सप्टेंबर १८५८ ला वैनगंगेच्या तारसा घाट पार करणाºया अनेक इंग्रज सैनिकांचे मुंडके छाटले. त्यानंतर वीर बाबुराव अहेरी येथे राजवाड्यात दाखल झाले. याची माहिती इंग्रजांच्या गुप्तहेरांना काही कपटी लोकांनी दिली. कॅप्टन शेक्सपिअर हा फौजेसह राजवाड्यात दाखल झाला. बाबुरावांनी इंग्रजांच्या सैैन्यावर चाल केली. परंतु ते इंग्रजांच्या ताब्यात सापडले. बाबुरावांना अटक केल्यानंतर त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले. त्याच्यावर बंडखोरी आणि इंग्रजांच्या खुनाचा आरोप ठेवण्यात आला. न्यायव्यवस्थेने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. २१ आॅक्टोबर १८५८ ला सायंकाळी ४:४० मिनिटांनी चंद्रपूर येथील कारागृहाच्या पटांगणावरील पिंपळाच्या वृक्षावर वीर बाबुराव शेडमाके या वीर सुपुत्राला खुलेआम फाशी देण्यात आली. गोंडवानाचा क्रांतिवीर हसतहसत फासावर गेला. शहीद वीर बाबुराव शेडमाके यांनी गोंडवानात स्वातंत्र्यसंग्रामातील आक्रोशाची ज्योत पेटविली होती. गोंडवानाच्या या वीर शहिदाचा २१ आॅक्टोबर हा १६० वा शहीद दिन त्यांच्या विविध पराक्रमांची स्मृती आजही जागृत करीत आहे.