शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

गोंडवाना विद्यापीठाची भरती प्रक्रिया वांद्यात येण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2016 00:47 IST

चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला गती देण्यासाठी आघाडी सरकारच्या काळात निर्माण करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठात गैरप्रकार

चौकशीची मागणी : मुलाखत समितीतील सदस्याचीच सहायक प्राध्यापक म्हणून नियुक्तीगडचिरोली : चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला गती देण्यासाठी आघाडी सरकारच्या काळात निर्माण करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठात गैरप्रकार व अनागोंदीची मालिका अद्यापही खंडीत झालेली नाही. अलिकडेच झालेल्या भरती प्रक्रियेबाबतही विविध आरोप, प्रत्यारोप दररोज होत असल्याने ही भरती प्रक्रिया वाद्यांत येण्याची शक्यता दिसत आहे. काही प्राध्यापक व शिक्षक संघटनांनी या भरती प्रक्रियेविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. गोंडवाना विद्यापीठात सहायक प्राध्यापकाची भरती प्रक्रिया नुकतीच राबविण्यात आली. या भरती प्रक्रियेत अनेक पात्र उमेदवारांना डावलण्यात आले, ५५ टक्के गुण अपेक्षित असताना कमी टक्केवारी असलेल्या उमेदवारांची निवड करण्यात आली. तसेच भरती प्रक्रिया राबविताना नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचे प्रकार आता उघडकीस आले आहे. इंग्रजी विषयाचे सहायक प्राध्यापक म्हणून नियुक्त झालेले प्रा. डॉ. विवेक जोशी हे मुलाखत समितीचे सदस्य असताना त्यांनी स्वत:च मुलाखत दिली. मुलाखत देण्यापूर्वी त्यांनी या समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा का दिला नाही. हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. या भरती प्रक्रियेचा पोळा आधीच फुटला. या संदर्भात अनेक माध्यमांमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यावर विद्यापीठाच्या कुलगुरूंसह प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. विद्यापीठाने निवड झालेल्या प्राध्यापकांची यादी घाईगडबडीत प्रसिध्द केली असून वेबसाईटवरही ती उपलब्ध आहे. विशेष बाब म्हणजे जे प्रा.डॉ. जोशी मुलाखत समितीचे सदस्य होते, त्यांची मुलाखत घेऊन त्यांचीच नियुक्ती करण्याचे पुण्यकर्मही विद्यापीठाने पार पाडले आहे. जोशी हे इंग्रजी विषयाचे अधिष्ठाता असून व्यवस्थापन व विद्याशाखेचे सदस्यही आहेत. त्यामुळे मुलाखत समितीत त्यांचा समावेश होता, असे असताना त्यांनी मुलाखत दिली व त्यांची आपसुकच निवड झाली, असे दिसून येत आहे. या संदर्भात विद्यापीठाचे कुलगुरू, कुलसचिव हे दोघेही प्रक्रिया कायदेशीर झाल्याचे विविध माध्यमांना वारंवार सांगत असून कुलगुरूंनी तर कुणाला संशय असेल तर त्यांनी थेट पोलिसात तक्रार करावी किवां न्यायालयात जावे, असे थेट आवाहनच माध्यमांशी बोलताना दिले आहे. एकूणच या भरती प्रक्रियेनंतरही विद्यापीठाच्या गैरकारभाराचा ससेमिरा थांबलेला नाही. या पूर्वीही निर्मितीपासूनच गोंडवाना विद्यापीठ विविध कारणांनी गाजत राहिले आहे. ती परंपरा यावेळीही कायमच राहिली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)