शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

समस्याग्रस्त आहे गोंडवाना विद्यापीठ

By admin | Updated: November 23, 2014 23:20 IST

२००९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला गती देण्यासाठी गडचिरोली येथे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

गडचिरोली : २००९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला गती देण्यासाठी गडचिरोली येथे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. २०११ मध्ये हे विद्यापीठ स्थापन होऊन विद्यापीठाचा कारभार सुरू झाला. सदर विद्यापीठ निर्मितीच्या कामात राज्याचे सध्याचे अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठा पुढाकार घेतला होता. मात्र विद्यापीठ निर्माण झाल्यानंतर येथील कारभारामुळे त्यांनी या विद्यापीठाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. अद्याप विद्यापीठाला स्वत:ची जमीन मिळालेली नाही. विद्यापीठाच्या कारभाराला स्थैर्य देणे व जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी विद्यापीठाच्या अडचणी सोडविण्यात शासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. याला लोकप्रतिनिधीही तेवढेच जबाबदार आहेत.मागील दीड ते दोन वर्षांपासून विद्यापीठांच्या समित्या गठण करण्याचे काम रखडलेले आहे. याशिवाय मागील दोन ते अडीच वर्षांपासून गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाला जागा उपलब्ध झालेली नाही. गोंडवाना विद्यापीठ स्थापन झाले. मात्र राज्य सरकारने अद्याप विद्वत्त व व्यवस्थापन या दोन प्रमुख समित्यांसह अन्य समित्यांचेही गठण केलेले नाही. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाचा शैक्षणिक डोलारा पूर्णत: कोसळलेला आहे. गोंडवाना विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू नियुक्त करण्यासाठीही अडचणी निर्माण झाल्या आहेत. गोंडवाना विद्यापीठ २ एफमध्ये नसल्यामुळे या विद्यापीठातील अनेक महाविद्यालयांना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून १२ (बी) अनुदानासाठी मान्यता दिली जात नाही. १२ बी अनुदानासाठी गोंडवाना विद्यापीठात किमान पाच स्वतंत्र पदव्युत्तर विभाग व या विभागात प्राध्यापकांची नियुक्ती होणे आवश्यक आहे. मात्र स्वतंत्र विभाग नसल्याने याचा फटका इतर महाविद्यालयांना बसत आहे. त्यामुळे राज्य शासनाने गोंडवाना विद्यापीठात तत्काळ स्वतंत्र ५ पदव्युत्तर विभागाची नियुक्ती करावी. गोंडवाना विद्यापीठाने १२ बी अनुदानाचा प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगाकडे दाखल केला आहे. मात्र सदर प्रस्ताव अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या विद्यापीठांतर्गत ३० महाविद्यालयांना २ एफ १२ बी चे अनुदान आहे. मात्र विद्यापीठांतर्गत ३४ महाविद्यालय या अनुदानापासून वंचित आहेत. विद्यापीठ विभाजनाचा अनेक महाविद्यालयांना फटका बसला. गोंडवाना विद्यापीठांतर्गत चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात २२७ महाविद्यालय आहेत. यापैकी अनेक महाविद्यालयांना पूर्णवेळ व पीएचडी पात्रताधारक प्राचार्य नाहीत. त्यामुळे या महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवरही परिणाम होत आहे. अनेक महाविद्यालयांना आता विद्यार्थ्यांचीही टंचाई जाणवू लागली आहे. या विद्यापीठाला राष्ट्रीय पातळीवर चांगला दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे. यासाठी राज्य सरकारचे सहकार्य आवश्यक आहे.