शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

देवींचे विसर्जन झाले; स्वच्छतेचे काय?

By admin | Updated: October 7, 2014 23:34 IST

नवरात्र दरम्यान शहरात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या शेकडो दुर्गा व शारदांचे चंद्रपूर मार्गावर असलेल्या तलावात विसर्जन करण्यात आले. यामुळे तलावात प्रचंड घाण पसरली असून यामुळे

गडचिरोली : नवरात्र दरम्यान शहरात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या शेकडो दुर्गा व शारदांचे चंद्रपूर मार्गावर असलेल्या तलावात विसर्जन करण्यात आले. यामुळे तलावात प्रचंड घाण पसरली असून यामुळे तलावाचे पाणी दुर्गंधीयुक्त झाले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. गडचिरोली शहरात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. यादरम्यान खासगी व सार्वजनिक मंडळाच्या मिळून शेकडो शारदा व दुर्गाची प्रतिष्ठापणा करण्यात येते. सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळांच्यावतीने लाखो रूपयांची विद्युत रोषणाई केली जाते. त्याचबरोबर भाविकांना आपल्या मंडळाकडे आकर्षित करण्यासाठी नऊ दिवस विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. हे कार्यक्रम पाहण्यासाठी ग्रामीण व दुर्गम भागातील हजारो नागरिक दरदिवशी येत असल्याने शहराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. नऊ दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी किंवा त्यानंतर दुर्गा व शारदेचे ढोल ताशांच्या गजरात विसर्जन करण्यात येते. चंद्रपूर मार्गावर बाजारानजीक असलेला तलाव शहराच्या मध्यभागी आहे. त्यामुळे संपूर्ण शहरातील देवींचे याच तलावात विसर्जन करण्यात येते. नऊ दिवसांच्या पूजेनंतरचे निर्माल्य येथील पाण्यामध्ये टाकले जाते. देवी ठेवण्यासाठी बनविण्यात आलेल्या लाकडी पाट्याही पाण्यामध्ये टाकल्या जातात. यामुळे या तलावातील पाणी गढूळ झाले असून पाण्याला दुर्गंधीयुक्त वास यायला लागला आहे. तलावाच्या चारही बाजूला वस्ती आहे. या दुर्गंधीचा त्रास सभोवतालच्या नागरिकांना सहन करावा लागतो. विशेष करून ज्या ठिकाणी देवीदेवतांचे विसर्जन केले जाते. त्या सभोवतालच्या नागरिकांना याचा त्रास अधिक होत असल्याचे दिसून येत आहे. याबद्दल येथील नागरिकांनी प्रचंड रोष व्यक्त केला आहे. या दुर्गंधीमुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर तलावाची तत्काळ सफाई करण्याची मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)