शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

गोदावरी तिरावर टाकणार भराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 22:16 IST

तेलंगणा सरकारच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या कालेश्वरम सिंचन प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील आईपेठा व तुमनूर ही गावे बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे. सदर गावे बुडीत क्षेत्रात येऊ नये, यासाठी तेलंगणा सरकार गोदावरी तिरावर मातीचा भराव टाकणार आहे. यासाठी राज्य शासनाने १० हेक्टर वनजमीन वळती केली आहे.

ठळक मुद्देकालेश्वरम प्रकल्पाचा फटका : आईपेठा व तुमनूर गावे बुडण्याचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तेलंगणा सरकारच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या कालेश्वरम सिंचन प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील आईपेठा व तुमनूर ही गावे बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे. सदर गावे बुडीत क्षेत्रात येऊ नये, यासाठी तेलंगणा सरकार गोदावरी तिरावर मातीचा भराव टाकणार आहे. यासाठी राज्य शासनाने १० हेक्टर वनजमीन वळती केली आहे.गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारच्या वतीने कालेश्वरम धरण बांधले जात आहे. या धरणाचे संपूर्ण पाणी तेलंगणासाठी वापरले जाणार आहे. सदर पाणी कालव्याने हैदराबादपर्यंत नेले जाणार आहे. सिरोंचा तालुक्यातील गावांना पाणी मिळणार नाही. मात्र काही गावे बुडणार आहेत. सुरूवातीला गावकऱ्यांनी विरोध केला. महाराष्टÑ राज्य शासनाकडे मागणी केली. मात्र राज्य शासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता सिरोंचा तालुक्यातील काही गावे बुडीत क्षेत्रात येणार आहेत.आईपेठा व तुमनूर ही गावे बुडीत क्षेत्रात जाऊ नये, यासाठी गोदावरी नदीच्या डाव्या सिमेंट काँक्रिट व मातीचा तिरावर भराव टाकला जाणार आहे. या ठिकाणी जंगल असल्याने सदर जमीन वनविभागाच्या अखत्यारित आहे. ज्या ठिकाणी भराव टाकायचा आहे, त्यासाठी १०.२३ हेक्टर वनजमीन वळती केली जाणार आहे.भराव टाकताना पर्यावरण संवर्धन कायद्याच्या सर्व अटी तेलंगणा सरकारने पाळाव्यात, असे निर्देश दिले आहेत. याबाबत राज्य शासनाच्या महसूल व वनविभागाने ६ जुलै रोजी शासन निर्णय काढला आहे. भराव टाकण्यामुळे ही दोन्ही गावे बुडीत क्षेत्रात येणार नाही. मात्र सिंचनाचा लाभही मिळणार नाही.जमीन महाराष्ट्राची, पाणी मात्र तेलंगणालागोदावरी नदी महाराष्ट्र व तेलंगणा राज्याची दुभाजक आहे. त्यामुळे या नदीच्या पाण्यावर दोन्ही राज्यांचा सारखा हक्क आहे. तेलंगणा सरकारने गोदावरी नदीवर प्रकल्प उभा केला. या ठिकाणचे पाणी ३०० किमी अंतरावर असलेल्या हैदराबाद येथे पोहोचविले जाणार आहे. गोदावरी नदीच्या पाण्यावर दोन्ही राज्यांचा सारखा हक्क आहे. प्रकल्पासाठी सिरोंचा तालुक्यातील शेकडो हेक्टर जमीन बुडीत क्षेत्रात जात आहे. मात्र पाण्याचा लाभ तेलंगणा राज्याला होणार आहे. महाराष्ट्र शासनाने कोणतेही पाऊल उचलले नसल्याने राज्याला लाभ मिळाला नाही.