शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
कॅशने घर घेताय? थांबा! होम लोनचा असा करा 'स्मार्ट' वापर! गृहकर्ज फिटेपर्यंत कोट्यधीश व्हाल
4
दिल्ली स्फोट : गाडीतील मृतदेह डॉक्टर उमरचाच; डीएनए जुळला! नक्की कशी पार पडली फॉरेन्सिक प्रक्रिया?
5
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
6
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
7
Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं 'फिटनेस सीक्रेट'; बिझी शेड्यूलमध्ये स्वत:ला अभिनेत्री कसं ठेवते फिट?
8
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
9
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
10
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
11
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
12
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
13
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
14
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
15
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
16
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
17
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
18
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
19
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
20
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती

गोदावरी तिरावर टाकणार भराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 22:16 IST

तेलंगणा सरकारच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या कालेश्वरम सिंचन प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील आईपेठा व तुमनूर ही गावे बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे. सदर गावे बुडीत क्षेत्रात येऊ नये, यासाठी तेलंगणा सरकार गोदावरी तिरावर मातीचा भराव टाकणार आहे. यासाठी राज्य शासनाने १० हेक्टर वनजमीन वळती केली आहे.

ठळक मुद्देकालेश्वरम प्रकल्पाचा फटका : आईपेठा व तुमनूर गावे बुडण्याचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तेलंगणा सरकारच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या कालेश्वरम सिंचन प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील आईपेठा व तुमनूर ही गावे बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे. सदर गावे बुडीत क्षेत्रात येऊ नये, यासाठी तेलंगणा सरकार गोदावरी तिरावर मातीचा भराव टाकणार आहे. यासाठी राज्य शासनाने १० हेक्टर वनजमीन वळती केली आहे.गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारच्या वतीने कालेश्वरम धरण बांधले जात आहे. या धरणाचे संपूर्ण पाणी तेलंगणासाठी वापरले जाणार आहे. सदर पाणी कालव्याने हैदराबादपर्यंत नेले जाणार आहे. सिरोंचा तालुक्यातील गावांना पाणी मिळणार नाही. मात्र काही गावे बुडणार आहेत. सुरूवातीला गावकऱ्यांनी विरोध केला. महाराष्टÑ राज्य शासनाकडे मागणी केली. मात्र राज्य शासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता सिरोंचा तालुक्यातील काही गावे बुडीत क्षेत्रात येणार आहेत.आईपेठा व तुमनूर ही गावे बुडीत क्षेत्रात जाऊ नये, यासाठी गोदावरी नदीच्या डाव्या सिमेंट काँक्रिट व मातीचा तिरावर भराव टाकला जाणार आहे. या ठिकाणी जंगल असल्याने सदर जमीन वनविभागाच्या अखत्यारित आहे. ज्या ठिकाणी भराव टाकायचा आहे, त्यासाठी १०.२३ हेक्टर वनजमीन वळती केली जाणार आहे.भराव टाकताना पर्यावरण संवर्धन कायद्याच्या सर्व अटी तेलंगणा सरकारने पाळाव्यात, असे निर्देश दिले आहेत. याबाबत राज्य शासनाच्या महसूल व वनविभागाने ६ जुलै रोजी शासन निर्णय काढला आहे. भराव टाकण्यामुळे ही दोन्ही गावे बुडीत क्षेत्रात येणार नाही. मात्र सिंचनाचा लाभही मिळणार नाही.जमीन महाराष्ट्राची, पाणी मात्र तेलंगणालागोदावरी नदी महाराष्ट्र व तेलंगणा राज्याची दुभाजक आहे. त्यामुळे या नदीच्या पाण्यावर दोन्ही राज्यांचा सारखा हक्क आहे. तेलंगणा सरकारने गोदावरी नदीवर प्रकल्प उभा केला. या ठिकाणचे पाणी ३०० किमी अंतरावर असलेल्या हैदराबाद येथे पोहोचविले जाणार आहे. गोदावरी नदीच्या पाण्यावर दोन्ही राज्यांचा सारखा हक्क आहे. प्रकल्पासाठी सिरोंचा तालुक्यातील शेकडो हेक्टर जमीन बुडीत क्षेत्रात जात आहे. मात्र पाण्याचा लाभ तेलंगणा राज्याला होणार आहे. महाराष्ट्र शासनाने कोणतेही पाऊल उचलले नसल्याने राज्याला लाभ मिळाला नाही.