शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
5
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
6
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
7
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
8
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
9
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
10
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
11
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
12
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
13
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
14
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
15
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
16
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
17
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
18
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
19
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती

गोदावरीच्या पुलाला आर. आर. पाटील यांचे नाव द्या

By admin | Updated: September 23, 2016 01:43 IST

सिरोंचा तालुक्यात तेलंगणा-महाराष्ट्राला जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाला महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांना निवेदन : अहेरीवरून हैद्राबाद बस सुरू कराअहेरी : सिरोंचा तालुक्यात तेलंगणा-महाराष्ट्राला जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाला महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री आर. आर. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी कार्यकारी जिल्हाध्यक्ष बबलू हकीम यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने राज्य सरकारकडे केली आहे. तसेच अहेरी उपविभागातील व जिल्ह्यातील प्रमुख मार्गांची दुरवस्था झाली असून काही ठिकाणी कमी उंचीच्या पुलावर मोठे खड्डे पडले आहेत. या मार्गांची दुरूस्ती करून खड्डे बुजविण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. अहेरी-सिरोंचा-हैद्राबाद अशी बससेवा सुरू करण्यात यावी, असेही या निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदन उपविभागीय अधिकारी राममूर्ती यांच्या मार्फतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पाठविण्यात आले आहे. एसडीओंना निवेदन देताना राजेश्वर उत्तरवार, कुसूम दुधी, अंजना पेंदाम, आदिल पठाण, आत्माराम गदेकर, पुष्पा अलोणे आदी उपस्थित होते. पाठपूरावा करण्याचे आश्वासन एसडीओंनी दिले.(प्रतिनिधी)या मार्गांची करा दुरूस्तीआलापल्ली-मुलचेरा, अहेरी-आष्टी, आलापल्ली-सिरोंचा, आलापल्ली-एटापल्ली, एटापल्ली-कसनसूर-जारावंडी, अहेरी शहर या प्रमुख मार्गांची दयनिय अवस्था झाली आहे. शेकडो लोक या मार्गावरून आवागमन करतात. मात्र रस्ता खराब झाल्याने नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो. रस्त्यावरील खड्ड्यामुळे अनेकांना पाठीचे आजार वाढले आहेत. याशिवाय एटापल्ली-बुर्गी-कांदोळी, मन्नेराजाराम-ताडगाव, मोयाबीनपेठा या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे, अहेरी-देवलमरी-व्यंकटापूर या रस्त्याचीही दुरूस्ती करण्यात यावी, अहेरी-आष्टी दरम्यान दिना नदीच्या पुलावर मोठा खड्डा पडला आहे. तसेच चौडमपल्ली येथील पुलावरही अशीच अवस्था आहे. हे खड्डे तत्काळ बुजविण्यात यावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. अहेरी-बुर्गी-कांदोळी या मार्गावर बसफेरीही सुरू करण्यात यावी, असे निवेदन पाठविण्यात आले आहे.