शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

गोदावरीच्या पुलाला आर. आर. पाटील यांचे नाव द्या

By admin | Updated: September 23, 2016 01:43 IST

सिरोंचा तालुक्यात तेलंगणा-महाराष्ट्राला जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाला महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांना निवेदन : अहेरीवरून हैद्राबाद बस सुरू कराअहेरी : सिरोंचा तालुक्यात तेलंगणा-महाराष्ट्राला जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाला महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री आर. आर. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी कार्यकारी जिल्हाध्यक्ष बबलू हकीम यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने राज्य सरकारकडे केली आहे. तसेच अहेरी उपविभागातील व जिल्ह्यातील प्रमुख मार्गांची दुरवस्था झाली असून काही ठिकाणी कमी उंचीच्या पुलावर मोठे खड्डे पडले आहेत. या मार्गांची दुरूस्ती करून खड्डे बुजविण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. अहेरी-सिरोंचा-हैद्राबाद अशी बससेवा सुरू करण्यात यावी, असेही या निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदन उपविभागीय अधिकारी राममूर्ती यांच्या मार्फतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पाठविण्यात आले आहे. एसडीओंना निवेदन देताना राजेश्वर उत्तरवार, कुसूम दुधी, अंजना पेंदाम, आदिल पठाण, आत्माराम गदेकर, पुष्पा अलोणे आदी उपस्थित होते. पाठपूरावा करण्याचे आश्वासन एसडीओंनी दिले.(प्रतिनिधी)या मार्गांची करा दुरूस्तीआलापल्ली-मुलचेरा, अहेरी-आष्टी, आलापल्ली-सिरोंचा, आलापल्ली-एटापल्ली, एटापल्ली-कसनसूर-जारावंडी, अहेरी शहर या प्रमुख मार्गांची दयनिय अवस्था झाली आहे. शेकडो लोक या मार्गावरून आवागमन करतात. मात्र रस्ता खराब झाल्याने नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो. रस्त्यावरील खड्ड्यामुळे अनेकांना पाठीचे आजार वाढले आहेत. याशिवाय एटापल्ली-बुर्गी-कांदोळी, मन्नेराजाराम-ताडगाव, मोयाबीनपेठा या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे, अहेरी-देवलमरी-व्यंकटापूर या रस्त्याचीही दुरूस्ती करण्यात यावी, अहेरी-आष्टी दरम्यान दिना नदीच्या पुलावर मोठा खड्डा पडला आहे. तसेच चौडमपल्ली येथील पुलावरही अशीच अवस्था आहे. हे खड्डे तत्काळ बुजविण्यात यावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. अहेरी-बुर्गी-कांदोळी या मार्गावर बसफेरीही सुरू करण्यात यावी, असे निवेदन पाठविण्यात आले आहे.