शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
4
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
5
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
6
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
7
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
8
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
9
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
10
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
11
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
13
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
14
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
15
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
16
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
17
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
18
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
19
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
20
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!

गोदावरी पुलावरून ट्रकद्वारे रेतीची वाहतूक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 00:58 IST

गेल्या काही दिवसांपासून सिरोंचा तालुक्यात रेती वाहतूक करणाºया ट्रकांचा बोलबाला असून येथील गोदावरी पुलावरून दिवसरात्र रेतीची ट्रकांद्वारे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे.

ठळक मुद्देट्रकांच्या रांगेने वाहतुकीस अडथळा : पुलास धोका होण्याची शक्यता; प्रशासकीय अधिकारी सुस्त

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : गेल्या काही दिवसांपासून सिरोंचा तालुक्यात रेती वाहतूक करणाºया ट्रकांचा बोलबाला असून येथील गोदावरी पुलावरून दिवसरात्र रेतीची ट्रकांद्वारे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. दरम्यान रेती भरलेल्या ट्रकांची गोदावरी नदीच्या पुलावर लांबच्या लांब रांग राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी या पुलास धोका होण्याची शक्यता बळावली आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाचा कानाडोळा आहे.वर्षभरापूर्वी गोदावरी नदीच्या पुलाचे रितसर उद्घाटन झाले होते. सदर पूल निर्मितीमुळे दोन राज्याचा संपर्क थेट वाढणार असून महाराष्टÑ व तेलंगणा राज्यातील जनतेचे आवागमन सुलभरित्या होईल, लोकांचा प्रवास सुखकर होईल, असे वाटले होते. मात्र आता पूल निर्मितीनंतर सदर मार्ग रेती वाहतुकदारांसाठीच निर्माण करण्यात आला काय, असाही प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे. रेती भरलेल्या ट्रकच्या अपघातात दोन ते तीन जणांना आपला प्राण गमवावा लागला. छोटमोटे अपघात सुरूच आहेत. सिरोंचा तालुक्यातील रेती घाटावरून तेलंगणा राज्यात रेती नेण्यासाठी ट्रकांचे आवागमन दिवसरात्र सुरू आहे. ट्रकांचे वजन करण्यासाठी रेतीघाटावर व्यवस्था आहे. महाराष्टÑाच्या हद्दीतील ट्रकांमध्ये किती रेती भरलेली आहे, याचे मोजमाप करण्याची कोणतीही यंत्रणा नाही. वनजकाटा सुद्धा आंध्रप्रदेशाच्या हद्दीत आहे. रेतीने भरलेले ट्रकाचा वजनकाटा गोदावरी नदीच्या पुलाच्या पलिकडे आहे. येथे मोजमाप केल्यानंतर ट्रक पुढे मार्गक्रमण करतात. रेतीघाटावर ट्रक चालकांना रेतीची टिपी दिली जाते. तेलंगणात या ट्रकाचे वजन केले जाते. जास्त रेती असल्यास उर्वरित रेती रस्त्याच्या कडेला उतरविली जाते. त्यामुळे गोदावरी नदीच्या पुलावर १०० ट्रकांची रांग पाहावयास मिळते. मात्र गोदावरी नदीचा पूल एवढ्या मोठ्या प्रमाणातील वजन पेलू शकतो की नाही, याबाबत स्पष्टता नाही. भविष्यात सदर पूल कोसळण्याची घटना घडल्यास या घटनेला जबाबदार कोण, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. मात्र यासंदर्भात कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेला सोयरसुतक नाही. बांधकाम व महसूल विभाग हेतुपुरस्सर या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.रेतीची वाहतूक करणाºया ट्रकांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असतो. त्यातल्या त्यात अपघाताची शक्यता अधिक असते. अशाप्रसंगी कायदा व सुव्यवस्था राखणारे पोलीस विभागही सुस्त असल्याचे दिसून येत आहे. एकंदरित सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान तसेच जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. सिरोंचा तालुक्यात रेती वाहतुकीचे हे भयावह चित्र असतानाही अधिकाºयांचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. सदर प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाºयांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी सिरोंचा तालुकावासियांनी केली आहे.