शहरं
Join us  
Trending Stories
1
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
2
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
3
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
4
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
5
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
6
आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी
7
Operation Sindoor: नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
8
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
9
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
10
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
11
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
12
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
13
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
14
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
15
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...
16
"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
17
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
18
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
19
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
20
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश

गोदावरी पुलावरून ट्रकद्वारे रेतीची वाहतूक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 00:58 IST

गेल्या काही दिवसांपासून सिरोंचा तालुक्यात रेती वाहतूक करणाºया ट्रकांचा बोलबाला असून येथील गोदावरी पुलावरून दिवसरात्र रेतीची ट्रकांद्वारे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे.

ठळक मुद्देट्रकांच्या रांगेने वाहतुकीस अडथळा : पुलास धोका होण्याची शक्यता; प्रशासकीय अधिकारी सुस्त

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : गेल्या काही दिवसांपासून सिरोंचा तालुक्यात रेती वाहतूक करणाºया ट्रकांचा बोलबाला असून येथील गोदावरी पुलावरून दिवसरात्र रेतीची ट्रकांद्वारे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. दरम्यान रेती भरलेल्या ट्रकांची गोदावरी नदीच्या पुलावर लांबच्या लांब रांग राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी या पुलास धोका होण्याची शक्यता बळावली आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाचा कानाडोळा आहे.वर्षभरापूर्वी गोदावरी नदीच्या पुलाचे रितसर उद्घाटन झाले होते. सदर पूल निर्मितीमुळे दोन राज्याचा संपर्क थेट वाढणार असून महाराष्टÑ व तेलंगणा राज्यातील जनतेचे आवागमन सुलभरित्या होईल, लोकांचा प्रवास सुखकर होईल, असे वाटले होते. मात्र आता पूल निर्मितीनंतर सदर मार्ग रेती वाहतुकदारांसाठीच निर्माण करण्यात आला काय, असाही प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे. रेती भरलेल्या ट्रकच्या अपघातात दोन ते तीन जणांना आपला प्राण गमवावा लागला. छोटमोटे अपघात सुरूच आहेत. सिरोंचा तालुक्यातील रेती घाटावरून तेलंगणा राज्यात रेती नेण्यासाठी ट्रकांचे आवागमन दिवसरात्र सुरू आहे. ट्रकांचे वजन करण्यासाठी रेतीघाटावर व्यवस्था आहे. महाराष्टÑाच्या हद्दीतील ट्रकांमध्ये किती रेती भरलेली आहे, याचे मोजमाप करण्याची कोणतीही यंत्रणा नाही. वनजकाटा सुद्धा आंध्रप्रदेशाच्या हद्दीत आहे. रेतीने भरलेले ट्रकाचा वजनकाटा गोदावरी नदीच्या पुलाच्या पलिकडे आहे. येथे मोजमाप केल्यानंतर ट्रक पुढे मार्गक्रमण करतात. रेतीघाटावर ट्रक चालकांना रेतीची टिपी दिली जाते. तेलंगणात या ट्रकाचे वजन केले जाते. जास्त रेती असल्यास उर्वरित रेती रस्त्याच्या कडेला उतरविली जाते. त्यामुळे गोदावरी नदीच्या पुलावर १०० ट्रकांची रांग पाहावयास मिळते. मात्र गोदावरी नदीचा पूल एवढ्या मोठ्या प्रमाणातील वजन पेलू शकतो की नाही, याबाबत स्पष्टता नाही. भविष्यात सदर पूल कोसळण्याची घटना घडल्यास या घटनेला जबाबदार कोण, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. मात्र यासंदर्भात कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेला सोयरसुतक नाही. बांधकाम व महसूल विभाग हेतुपुरस्सर या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.रेतीची वाहतूक करणाºया ट्रकांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असतो. त्यातल्या त्यात अपघाताची शक्यता अधिक असते. अशाप्रसंगी कायदा व सुव्यवस्था राखणारे पोलीस विभागही सुस्त असल्याचे दिसून येत आहे. एकंदरित सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान तसेच जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. सिरोंचा तालुक्यात रेती वाहतुकीचे हे भयावह चित्र असतानाही अधिकाºयांचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. सदर प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाºयांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी सिरोंचा तालुकावासियांनी केली आहे.