शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

विदर्भ द्या; अनेक संघटना एकवटल्या

By admin | Updated: July 31, 2014 00:01 IST

लोकसभा निवडणुकीनंतर स्वतंत्र विदर्भाच्या मागणीने जोरदार उचल खालली आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीची पहिली मशाल अहेरी भूमितूनच दिवंगत राजे विश्वेश्वरराव

ए. आर. खान - अहेरीलोकसभा निवडणुकीनंतर स्वतंत्र विदर्भाच्या मागणीने जोरदार उचल खालली आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीची पहिली मशाल अहेरी भूमितूनच दिवंगत राजे विश्वेश्वरराव महाराज यांनी चेतविली होती. आता स्वतंत्र विदर्भाची मागणी घेऊन अहेरी भागातील अनेक संघटना एकवटल्या आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य झाल्याशिवाय गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी उपविभागाचा विकास शक्य नाही, असा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ विदर्भ राज्याची घोषणा करावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी ही पूर्वीच्या सी.पी. अ‍ॅन्ड बेरारच्या काळापासूनची जुनी आहे. १ मे १९६० ला भाषिक तत्वाच्या आधारे महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आली. त्यावेळीही विदर्भवाद्यांनी स्वतंत्र विदर्भाची मागणी लावून धरली होती. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील स्वार्थी राजकारण्यांनी विदर्भाच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यावेळी अहेरी येथून कै. राजे विश्वेश्वरराव महाराज, लोकनायक बापूजी अणे, ब्रिजलाल बियाणी, जांबुवंतराव धोटे या आदींनी आंदोलन व पदयात्रा करून नाग विदर्भ आंदोलन समितीच्या माध्यमातून ही मागणी रेटून धरली होती. मात्र तत्कालीन राज्यकर्त्यांनी विदर्भातील जनतेच्या भावनांची कदर केली नाही. स्वतंत्र विदर्भ राज्याचा प्रश्न विविध राजकीय पक्षांनी आपल्या सोयीनुसार वापरून निवडणुका जिंकल्यात. आता मात्र विदर्भवादी आक्रमक झाल्या आहेत. अहेरी उपविभागात नाग विदर्भ आंदोलन समिती, अहेरी जिल्हा निर्माण कृती समिती, आॅल इंडिया एम्प्लाईज फेडरेशन, आदिवासी विद्यार्थी संघटना, ओबीसी संघटना तसेच या भागातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्या माध्यमातून आता स्वतंत्र विदर्भाची मागणी होऊ लागली आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रातील अहेरी, मुलचेरा, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली या तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिकही स्वतंत्र विदर्भ राज्याच्या पाठीशी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण झाल्यास गडचिरोली जिल्ह्यात विकासाला चालना मिळून सिंचन, उद्योग, रस्ते, पूल, रेल्वे आदी येऊन या भागातील खनिज व जलसंपत्ती तसेच वनसंपत्ती या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याचा विकास शक्य असल्याचे विदर्भवाद्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला आता मोठे बळ मिळाले आहे. विदर्भात अनेक संघटनांमार्फत आता स्वतंत्र राज्याची मागणी रेटली जात आहे. लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम विदर्भवादी नेत्यांसोबतच सामाजिक कार्यकर्तेही करीत आहे. भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, नाविस, बसपा या पक्षांचा स्वतंत्र विदर्भाला पाठींबा आहे.