शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

विदर्भ द्या; अनेक संघटना एकवटल्या

By admin | Updated: July 31, 2014 00:01 IST

लोकसभा निवडणुकीनंतर स्वतंत्र विदर्भाच्या मागणीने जोरदार उचल खालली आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीची पहिली मशाल अहेरी भूमितूनच दिवंगत राजे विश्वेश्वरराव

ए. आर. खान - अहेरीलोकसभा निवडणुकीनंतर स्वतंत्र विदर्भाच्या मागणीने जोरदार उचल खालली आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीची पहिली मशाल अहेरी भूमितूनच दिवंगत राजे विश्वेश्वरराव महाराज यांनी चेतविली होती. आता स्वतंत्र विदर्भाची मागणी घेऊन अहेरी भागातील अनेक संघटना एकवटल्या आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य झाल्याशिवाय गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी उपविभागाचा विकास शक्य नाही, असा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ विदर्भ राज्याची घोषणा करावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी ही पूर्वीच्या सी.पी. अ‍ॅन्ड बेरारच्या काळापासूनची जुनी आहे. १ मे १९६० ला भाषिक तत्वाच्या आधारे महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आली. त्यावेळीही विदर्भवाद्यांनी स्वतंत्र विदर्भाची मागणी लावून धरली होती. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील स्वार्थी राजकारण्यांनी विदर्भाच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यावेळी अहेरी येथून कै. राजे विश्वेश्वरराव महाराज, लोकनायक बापूजी अणे, ब्रिजलाल बियाणी, जांबुवंतराव धोटे या आदींनी आंदोलन व पदयात्रा करून नाग विदर्भ आंदोलन समितीच्या माध्यमातून ही मागणी रेटून धरली होती. मात्र तत्कालीन राज्यकर्त्यांनी विदर्भातील जनतेच्या भावनांची कदर केली नाही. स्वतंत्र विदर्भ राज्याचा प्रश्न विविध राजकीय पक्षांनी आपल्या सोयीनुसार वापरून निवडणुका जिंकल्यात. आता मात्र विदर्भवादी आक्रमक झाल्या आहेत. अहेरी उपविभागात नाग विदर्भ आंदोलन समिती, अहेरी जिल्हा निर्माण कृती समिती, आॅल इंडिया एम्प्लाईज फेडरेशन, आदिवासी विद्यार्थी संघटना, ओबीसी संघटना तसेच या भागातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्या माध्यमातून आता स्वतंत्र विदर्भाची मागणी होऊ लागली आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रातील अहेरी, मुलचेरा, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली या तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिकही स्वतंत्र विदर्भ राज्याच्या पाठीशी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण झाल्यास गडचिरोली जिल्ह्यात विकासाला चालना मिळून सिंचन, उद्योग, रस्ते, पूल, रेल्वे आदी येऊन या भागातील खनिज व जलसंपत्ती तसेच वनसंपत्ती या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याचा विकास शक्य असल्याचे विदर्भवाद्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला आता मोठे बळ मिळाले आहे. विदर्भात अनेक संघटनांमार्फत आता स्वतंत्र राज्याची मागणी रेटली जात आहे. लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम विदर्भवादी नेत्यांसोबतच सामाजिक कार्यकर्तेही करीत आहे. भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, नाविस, बसपा या पक्षांचा स्वतंत्र विदर्भाला पाठींबा आहे.