शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

अहेरीत वीज उपकेंद्र द्या

By admin | Updated: May 8, 2017 01:42 IST

शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे शहरवासीयांना अनेक सोयीसुविधा उपलब्ध होण्यास अडसर येत आहे.

ऊर्जामंत्र्यांकडे मागणी : अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन लोकमत न्यूज नेटवर्क अहेरी : शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे शहरवासीयांना अनेक सोयीसुविधा उपलब्ध होण्यास अडसर येत आहे. विशेषत: अहेरी येथे विजेची समस्या जाणवत आहे. त्यामुळे येथे विद्युत उपकेंद्र निर्माण करावे, अशी मागणी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीने ऊर्जामंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अहेरी उपविभागातील प्रशासकीय केंद्र म्हणून अहेरीची ओळख आहे. शहराची लोकसंख्या जलदगतीने वाढत आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात घरोघरी तसेच कार्यालयांत विजेवर चालणारी उपकरणे उपयोगी आणली जातात. परंतु अखंडीत वीज पुरवठा नसला तर कामांमध्ये व्यत्यय येतो. अडथळ्यामुळे काम अपुरी होतात. वेळही वाया जाऊन नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे येथे वीज पुरवठ्याची गरज आहे. अहेरी येथे उपकेंद्रासाठी जागेचा प्रश्न नाही. तसेच कर्मचाऱ्यांसाठी वसाहतही आहे. देखभाल दुरूस्ती केली की, समस्या निकाली निघू शकते. त्यामुळे येथे विद्युत केंद्र निर्माण करावे व कर्मचारी वर्गाची नेमणूकही करावी, अशी मागणीही अध्यक्ष रघुनाथ तलांडे, डॉ. ढेंगळे, विलास रापर्तीवार यांनी ऊर्जामंत्र्यांकडे केली आहे. अतिरिक्त बिलापासून मुक्तता हवी दर महिन्याची रिडिंग आणि त्यानुसार वीज देयक यात सदोष नाही. १ तारखेच्या आत रिडिंग घेतली जात नाही. वीज देयके नियोजित तारखेत ग्राहकांना प्राप्त होत नाही. त्यामुळे अतिरिक्त विलंब शुल्क आकारणीचा भुर्दंड चूक नसतानाही सोसावा लागतो. अतिरिक्त वीज देयकाच्या रूपात लाखो रूपये कंपनी वसूल करीत आहे. ग्राहकांची पिळवणूक होत आहे. वारंवार समस्या लक्षात आणूनही पर्यायी उपाययोजना करण्यात आल्या नाही. तसेच समाजातील श्रीमंत लोकांकडील वीज देयके दर महिन्याला वसूल केले जात नाही. सर्वसामान्य नागरिकांची विद्युत मात्र खंडित केली जाते. विद्युत कंपनीकडून असा भेदभाव सुरू आहे. उशिरा वीज देयके प्राप्त होत असल्याने ग्राहकांना विलंब शुल्क भरावा लागत आहे. त्यामुळे या समस्येची सोडवणूक करावी, अशी मागणी समितीने केली आहे.