शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

वनहक्कधारकांना सातबारा द्या

By admin | Updated: October 25, 2015 01:15 IST

तालुक्यातील शेकडो नागरिकांना वनपट्ट्यांचे वाटप करण्यात आले. मात्र अजूनपर्यंत त्यांना सातबारा देण्यात आला नाही.

भामरागड तहसीलसमोर आंदोलन : जनहितवादी युवा समिती व अहेरी जिल्हा निर्माण समितीची मागणीभामरागड : तालुक्यातील शेकडो नागरिकांना वनपट्ट्यांचे वाटप करण्यात आले. मात्र अजूनपर्यंत त्यांना सातबारा देण्यात आला नाही. त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास अडचण होत आहे. तहसीलदारांनी याबाबीकडे लक्ष घालून सातबारा द्यावा, त्याचबरोबर तालुक्यातील इतरही समस्या सोडवाव्या आदी मागण्यांसाठी जनहितवादी युवा समिती व अहेरी जिल्हा निर्माण समिती एटापल्ली यांच्या मार्फतीने शुक्रवारी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन सादर केले.भामरागड तालुक्यातील वैयक्तिक व सामुहिक वनहक्क पट्ट्यांचे वितरण तत्काळ करावे, प्रलंबित वनहक्क प्रस्तावांवर तत्काळ निर्णय घेऊन २५ ते ४० दिवसांत वनहक्क प्रदान करावे, वनहक्क धारकांना सातबारा द्यावा, भारतीय संविधानातील पाचव्या व सहाव्या अनुसूचीनुसार गौण व इतर नैसर्गिक साधनसंपत्तीवर ग्रामसभांना १०० टक्के मालकीहक्क प्रदान करावे, लोहखनिज संबंधित व लगतच्या ग्रामसभांना ६ टक्के मालकी हक्क व उर्वरित मालकीहक्क पंचायत समिती, जिल्हा परिषद, राज्य सरकार व केंद्र सरकार यांना योग्य प्रमाणात देण्यात यावे, पेसाच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करावे, १९ आॅगस्ट २०१४ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, सूरजागड व दमकोंडवाही तसेच अन्य पहाडावरील लोहखनिजाचे उत्खनन करण्याचे व कच्च्या मालाचे एटापल्ली, अहेरी उपविभागाच्या बाहेर वाहतूक करून या जिल्ह्याच्या खनिज संपत्तीची लूट करण्याची खासगी कंपन्यांना लिज देवू नये, शासन स्वत: लोहखनिजाचे उत्खनन करण्यास असमर्थ असेल तर लोहखनिज उत्खननाचे अधिकार ग्रामसभांना देण्यात यावे, कसनसूर, जारावंडी, पेंढरी, गट्टा, तागडगाव, लाहेरी, जिमलगट्टा, आष्टी या तालुक्यासह अहेरी जिल्हा निर्माण करण्यात यावा, नवीन ग्राम पंचायत व तलाठी साजे निर्माण करावे, पूर्व महाराष्ट्राच्या विकासासाठी विदर्भ राज्य निर्माण करावा, कसनसूर, जारावंडी येथे टॉवर उभे करून मोबाईल सेवा सुरू करावी, भामरागड तालुक्याच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.आंदोलनाचे नेतृत्व जनहितवादी युवा समिती एटापल्लीचे संयोजक सुरेश बारसागडे, जनहितवादी युवा समितीचे सहसचिव राहुल धोंगडे, राजू गोटा आदी उपस्थित होते. सदर निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांनासुद्धा पाठविण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)