शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

अहेरीच्या स्वच्छतेला प्राधान्य देणार

By admin | Updated: February 22, 2015 01:24 IST

अहेरी शहराच्या स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी अहेरी गावात भूमीगत गटार योजना आणली जाणार आहे. या माध्यमातून अहेरीच्या स्वच्छतेवर भर दिला जाणार आहे.

अहेरी : अहेरी शहराच्या स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी अहेरी गावात भूमीगत गटार योजना आणली जाणार आहे. या माध्यमातून अहेरीच्या स्वच्छतेवर भर दिला जाणार आहे. शिवाय प्रथम ६० व नंतर ७०० गावांचा विकास आराखडा आदिवासी विकास विभागामार्फत तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित समाधान शिबिरात ते शनिवारी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहेरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी आर. आर. सोनकवडे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, संवर्ग विकास अधिकारी सुभाष चांदेकर, तहसीलदार के. वाय. कुनारपवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी, जिल्हा परिषद सभापती अजय कंकडालवार, सुवर्णा खरवडे, पं.स. सभापती रविना गावडे, सिरोंचाचे तहसीलदार मिश्रा, प्रकाश गेडाम आदी उपस्थित होते. या समाधान शिबिरात ना. अम्ब्रीशराव आत्राम यांचा उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, प्रकल्प अधिकारी सोनकवडे व संवर्ग विकास अधिकारी सुभाष चांदेकर या तिघांनी शाल श्रीफळ व रोपटे देऊन सत्कार केला. या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना ना. आत्राम यांनी शेती विकासासाठी सिंचन व्यवस्था निर्माण करून शेतकऱ्यांना बारमाही पाणी उपलब्ध करून दिले जाईल, यासाठी राज्याच्या वित्त विभागाकडून २०० कोटी रूपयाचा निधी आपण आणणार असल्याचे सांगितले. स्पर्धा परीक्षा केंद्रातून आदिवासी मुलांना आयएएस, आयपीएस व आयएफएस परीक्षेचे मार्गदर्शनही उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील , अशी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दर्शना कुळमेथे, संचालन निशाली मेश्राम तर आभार अर्चना नागमोते यांनी केले.