शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

मिरकल, सकीनगट्टाला वीज द्या

By admin | Updated: September 30, 2016 01:35 IST

स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही अहेरी तालुका मुख्यालयापासून ३० किमी अंतरावर असलेल्या आरेंदा ग्रा. पं. अंतर्गत येणाऱ्या मिरकल,

अभियंत्यांना निवेदन : वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर नागरिकांची धडक आलापल्ली : स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही अहेरी तालुका मुख्यालयापासून ३० किमी अंतरावर असलेल्या आरेंदा ग्रा. पं. अंतर्गत येणाऱ्या मिरकल, सकीनगट्टा येथे अद्यापही वीज पोहोचली नाही. वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही गावाच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने गावे वंचित आहेत. त्यामुळे या दोन गावात वीज पुरवठा सुरू करावा, या मागणीसाठी नागरिकांनी आलापल्ली येथील वीज वितरण कार्यालयावर बुधवारी धडक देऊन अभियंत्यांना निवेदन सादर केले.आरेंदा ग्राम पंचायतींतर्गत येणाऱ्या अतिदुर्गम मिरकल, सकीनगट्टा या दोन गावात वीज पुरवठा अद्यापही करण्यात आला नाही. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी तीव्र रोष आहे. वारंवार पाठपुरावा करूनही समस्या निकाली न निघाल्याने संतप्त नागरिकांनी विद्यार्थी प्रतिनिधी कैैलास कोरेत यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या आलापल्ली येथील कार्यालयावर धडक देऊन निवेदन सादर केले. अनेक वर्षांपासून येथील नागरिकांना अंधारातच दिवस काढावे लागत आहे. अतिदुर्गम भागातील नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. परंतु योजनांची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने नागरिकांना मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित राहावे लागते. त्यामुळे नागरिकांनी धडक देऊन निवेदन सादर केले. निवेदन कार्यकारी अभियंता अमित परांजपे यांनी स्वीकारले. निवेदन देताना कैैलास कोरेत, बाजीराव आत्राम, सिनू कुळमेथे, रैैनू गावळे, पेदू तलांडी, सिन्ना कुळमेथे, साधू कुळमेथे, बिच्चू गावडे, रामदास गावडे, देवाजी मडावी, राजू कुळमेथे, देसू कुळमेथे, राजू गावडे, बेगा कुळमेथे, करपा गावळे, बाजीराव आत्राम सुक्कू आत्राम, रावजी नैैताम, राकेश कोडापे व नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)