शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

‘कुलगुरू’ पद ओबीसींना द्या

By admin | Updated: July 31, 2014 00:02 IST

गोंडवाना विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. विजय आर्इंचवार सेवानिवृत्त झाल्याने चार ते पाच महिन्यांपासून कुलगुरूचे पद रिक्त आहे. सध्य:स्थितीत कुलगुरू पदाचा कार्यभार गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे

रिक्त पद त्वरित भरा : राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाची मागणीगडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. विजय आर्इंचवार सेवानिवृत्त झाल्याने चार ते पाच महिन्यांपासून कुलगुरूचे पद रिक्त आहे. सध्य:स्थितीत कुलगुरू पदाचा कार्यभार गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. परंतु जिल्हाधिकारी हे प्रशासकीय प्रमुख असल्याने विद्यापीठाच्या कामात अधिकाधिक वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे विद्यापीठातील अनेक कामे वेळेत पूर्ण होऊ शकत नाही. विद्यापीठातील रिक्त असलेले कुलगुरूचे पद भरतांना जिल्ह्यातील ओबीसींना प्राधान्य देऊन कुलगुरूपदी ओबीसीची नियुक्ती करावी व रिक्त असलेले पद भरावे, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष एम. डी. चलाख यांनी राज्याचे राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडे निवेदनातू केली आहे.गडचिरोली-चंद्रपूर हे दोन्ही जिल्हे शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत मागासलेले आहेत. जिल्ह्यातील तिनही आमदार आदिवासी आहेत. तसेच जिल्ह्यातील बहुसंख्य अधिकारी आदिवासी संवर्गाचे आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बहुसंख्येने असलेल्या ओबीसी समाजाला पुरेशा प्रमाणात प्रतिनिधीत्व मिळत नाही. परिणामी ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात ओबीसींना शासकीय नोकरी व इतर कामात पुरेसे प्रतिनिधीत्व मिळत नसल्याने ओबीसी समाजाचा विकास खुंटला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ओबीसी समाजात नैराश्य पसरले आहे. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी समाजात अनेक तज्ज्ञ, उच्च विद्याविभूषित लोक आहेत. याबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक परिस्थितीची जाण असणारे अनेक प्राध्यापक, डॉक्टरेट पदव्या प्राप्त करणारीही मंडळी भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे गुणवत्तेनुसार गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती होण्यास जिल्ह्यातील ओबीसी समाजातील अनेक उमेदवार सक्षम आहेत. त्यामुळे कुलगुरूचे रिक्त पद भरतांना ओबीसी समाजातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे, असेही चलाख यांनी म्हटले आहे. प्रथम कुलगुरूपदी जिल्ह्यातील ओबीसी समाजातील उमेदवाराची नियुक्ती व्हावी, यासाठी ओबीसी बहुजन महासंघाच्यावतीने प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली होती. मात्र काही समाजाच्या राजकारण्यांनी ओबीसी समाजाची मागणी धुडकावून लावली होती. गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी ओबीसी उमेदवाराची नियुक्ती केल्यास संपूर्ण ओबीसी समाजासह इतर समाजालाही न्याय मिळू शकतो. विद्यापीठात नवनवीन अभ्यासक्रम लागू करण्यासाठी अभ्यासू व्यक्तीची कुलगुरूपदी निवड होणे आवश्यक आहे. जिल्ह्याचा विकास शिक्षणातूनच होऊ शकतो. यासाठी विद्यापीठ सक्षम असणे आवश्यक आहे. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी ओबीसींची नियुक्ती करावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष एम. डी. चलाख यांनी केली आहे.