शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

‘कुलगुरू’ पद ओबीसींना द्या

By admin | Updated: July 31, 2014 00:02 IST

गोंडवाना विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. विजय आर्इंचवार सेवानिवृत्त झाल्याने चार ते पाच महिन्यांपासून कुलगुरूचे पद रिक्त आहे. सध्य:स्थितीत कुलगुरू पदाचा कार्यभार गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे

रिक्त पद त्वरित भरा : राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाची मागणीगडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. विजय आर्इंचवार सेवानिवृत्त झाल्याने चार ते पाच महिन्यांपासून कुलगुरूचे पद रिक्त आहे. सध्य:स्थितीत कुलगुरू पदाचा कार्यभार गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. परंतु जिल्हाधिकारी हे प्रशासकीय प्रमुख असल्याने विद्यापीठाच्या कामात अधिकाधिक वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे विद्यापीठातील अनेक कामे वेळेत पूर्ण होऊ शकत नाही. विद्यापीठातील रिक्त असलेले कुलगुरूचे पद भरतांना जिल्ह्यातील ओबीसींना प्राधान्य देऊन कुलगुरूपदी ओबीसीची नियुक्ती करावी व रिक्त असलेले पद भरावे, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष एम. डी. चलाख यांनी राज्याचे राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडे निवेदनातू केली आहे.गडचिरोली-चंद्रपूर हे दोन्ही जिल्हे शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत मागासलेले आहेत. जिल्ह्यातील तिनही आमदार आदिवासी आहेत. तसेच जिल्ह्यातील बहुसंख्य अधिकारी आदिवासी संवर्गाचे आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बहुसंख्येने असलेल्या ओबीसी समाजाला पुरेशा प्रमाणात प्रतिनिधीत्व मिळत नाही. परिणामी ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात ओबीसींना शासकीय नोकरी व इतर कामात पुरेसे प्रतिनिधीत्व मिळत नसल्याने ओबीसी समाजाचा विकास खुंटला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ओबीसी समाजात नैराश्य पसरले आहे. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी समाजात अनेक तज्ज्ञ, उच्च विद्याविभूषित लोक आहेत. याबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक परिस्थितीची जाण असणारे अनेक प्राध्यापक, डॉक्टरेट पदव्या प्राप्त करणारीही मंडळी भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे गुणवत्तेनुसार गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती होण्यास जिल्ह्यातील ओबीसी समाजातील अनेक उमेदवार सक्षम आहेत. त्यामुळे कुलगुरूचे रिक्त पद भरतांना ओबीसी समाजातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे, असेही चलाख यांनी म्हटले आहे. प्रथम कुलगुरूपदी जिल्ह्यातील ओबीसी समाजातील उमेदवाराची नियुक्ती व्हावी, यासाठी ओबीसी बहुजन महासंघाच्यावतीने प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली होती. मात्र काही समाजाच्या राजकारण्यांनी ओबीसी समाजाची मागणी धुडकावून लावली होती. गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी ओबीसी उमेदवाराची नियुक्ती केल्यास संपूर्ण ओबीसी समाजासह इतर समाजालाही न्याय मिळू शकतो. विद्यापीठात नवनवीन अभ्यासक्रम लागू करण्यासाठी अभ्यासू व्यक्तीची कुलगुरूपदी निवड होणे आवश्यक आहे. जिल्ह्याचा विकास शिक्षणातूनच होऊ शकतो. यासाठी विद्यापीठ सक्षम असणे आवश्यक आहे. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी ओबीसींची नियुक्ती करावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष एम. डी. चलाख यांनी केली आहे.