शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:59 IST

तालुक्याच्या दुर्गम भागातील विविध गावांत आम्हच्या पूर्वजांनी तीन पिढ्यांपासून वन जमिनीवर अतिक्रमण करून शेती केली आहे.

ठळक मुद्देनिवेदन सादर : दुर्गम भागातील शेतकरी उपविभागीय कार्यालयावर धडकले

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तालुक्याच्या दुर्गम भागातील विविध गावांत आम्हच्या पूर्वजांनी तीन पिढ्यांपासून वन जमिनीवर अतिक्रमण करून शेती केली आहे. महसूल व वन विभागाने काही लोकांचे नोंदी व पिवार तयार केले आहेत. मात्र आम्हाला अद्यापही वन जमिनीचे पट्टे मिळाले नाही. त्यामुळे शासकीय सोयीसुविधांचा लाभ घेण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे आम्हा अतिक्रमणधारकांना तत्काळ वन जमिनीचे पट्टे देण्यात यावे, अशी मागणी अतिक्रमणधारक शेतकºयांनी केली आहे.या संदर्भात अतिक्रमणधारक शेतकºयांनी सोमवारी थेट एटापल्ली येथील उपविभागीय कार्यालयावर धडक दिली. व उपविभागीय अधिकाºयांना लेखी निवेदन दिले. मागण्यांचे हे निवेदन या कार्यालयातील नायब तहसीलदार डोर्लीकर यांनी स्वीकारले.याप्रसंगी जि. प. सदस्य संजय चरडुके, जारावंडीचे सरपंच सुधाकर टेकाम, शेतकरी संघटना शाखेचे अध्यक्ष हरिदास टेकाम, उपाध्यक्ष केशव पेदापल्लीवार, सचिव लक्ष्मण चन्नेवार आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील जारावंडी, दोलंदा, दिंडवी, भापडा, जांभुळगट्टा, गर्तावाही, मंजीगड, इरपनपायली, मालेनगट्टा, हनपायली, वेडमागड, टेक्का, कसुरवाही, सरखेडा व वडोली भागातील शेतकºयांनी वन जमिनीवर अतिक्रमण करून शेती कसने सुरू केले आहे. वनहक्क अधिनियम २००६ नुसार तसेच २००८ नुसार आम्ही प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र आमचे वनदाव्याचे प्रस्ताव प्रलंबितच आहेत. पट्टे न मिळाल्यामुळे शेती उपयोगासाठी शासकीय सवलती घेता येत नाही. या दृष्टीने कार्यवाही करून वनहक्क पट्टे द्यावे, अशी मागणी अतिक्रमणधारकांनी केली आहे.