शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:59 IST

तालुक्याच्या दुर्गम भागातील विविध गावांत आम्हच्या पूर्वजांनी तीन पिढ्यांपासून वन जमिनीवर अतिक्रमण करून शेती केली आहे.

ठळक मुद्देनिवेदन सादर : दुर्गम भागातील शेतकरी उपविभागीय कार्यालयावर धडकले

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तालुक्याच्या दुर्गम भागातील विविध गावांत आम्हच्या पूर्वजांनी तीन पिढ्यांपासून वन जमिनीवर अतिक्रमण करून शेती केली आहे. महसूल व वन विभागाने काही लोकांचे नोंदी व पिवार तयार केले आहेत. मात्र आम्हाला अद्यापही वन जमिनीचे पट्टे मिळाले नाही. त्यामुळे शासकीय सोयीसुविधांचा लाभ घेण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे आम्हा अतिक्रमणधारकांना तत्काळ वन जमिनीचे पट्टे देण्यात यावे, अशी मागणी अतिक्रमणधारक शेतकºयांनी केली आहे.या संदर्भात अतिक्रमणधारक शेतकºयांनी सोमवारी थेट एटापल्ली येथील उपविभागीय कार्यालयावर धडक दिली. व उपविभागीय अधिकाºयांना लेखी निवेदन दिले. मागण्यांचे हे निवेदन या कार्यालयातील नायब तहसीलदार डोर्लीकर यांनी स्वीकारले.याप्रसंगी जि. प. सदस्य संजय चरडुके, जारावंडीचे सरपंच सुधाकर टेकाम, शेतकरी संघटना शाखेचे अध्यक्ष हरिदास टेकाम, उपाध्यक्ष केशव पेदापल्लीवार, सचिव लक्ष्मण चन्नेवार आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील जारावंडी, दोलंदा, दिंडवी, भापडा, जांभुळगट्टा, गर्तावाही, मंजीगड, इरपनपायली, मालेनगट्टा, हनपायली, वेडमागड, टेक्का, कसुरवाही, सरखेडा व वडोली भागातील शेतकºयांनी वन जमिनीवर अतिक्रमण करून शेती कसने सुरू केले आहे. वनहक्क अधिनियम २००६ नुसार तसेच २००८ नुसार आम्ही प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र आमचे वनदाव्याचे प्रस्ताव प्रलंबितच आहेत. पट्टे न मिळाल्यामुळे शेती उपयोगासाठी शासकीय सवलती घेता येत नाही. या दृष्टीने कार्यवाही करून वनहक्क पट्टे द्यावे, अशी मागणी अतिक्रमणधारकांनी केली आहे.