शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, दुसऱ्यांदा म्हणाले...!
2
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
3
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
4
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
6
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
7
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
8
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
9
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
10
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
11
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
12
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
13
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
14
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
15
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
16
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
17
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
18
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
19
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
20
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?

आपातग्रस्तांना तत्काळ मदत द्या

By admin | Updated: July 15, 2016 01:50 IST

अलीकडेच सतत पाच दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, पीडित शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी,

महसूलमंत्र्यांना आमदार भेटले : शेतकरी अडचणीत गडचिरोली : अलीकडेच सतत पाच दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, पीडित शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी आ. डॉ. देवराव होळी यांनी महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. सतत पाच दिवस मुसळधार पाऊस पडल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले. त्यामुळे पऱ्ह्यांचे नुकसान झाले. परिणामी शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. केवळ शेतीच नाही तर पावसामुळे अनेक नागरिकांची घरेही पडली आहे. काही जणांची पाळीव जनावरे मृत्यूमुखी पडल्याने त्यांचेही नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत करावी, या मागणीसाठी आ. डॉ. देवराव होळी यांनी मुंबईला जाऊन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. आ. होळी यांनी जिल्ह्यातील पूरपरिस्थिती व झालेल्या नुकसानीबाबत महसूलमंत्र्यांना अवगत केले. शासन पीडित शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले. शेतकऱ्यांनी नुकसानीबाबतची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना कळवावी, तसेच काही तक्रारी असल्यास आपल्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आ. डॉ. होळी यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)