शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
3
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
6
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
7
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
8
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
9
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
10
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
11
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
12
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
13
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
14
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
15
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
16
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
17
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
18
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
19
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
20
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख

अनुभवी जिल्हाधिकारी द्या

By admin | Updated: November 3, 2014 23:26 IST

मागास व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या जलद विकासासाठी अनुभवी व कार्यक्षम जिल्हाधिकारी देण्यात यावा, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार सुरेश पद्मशाली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना

नव्या सरकारकडे मागणी : सुरेश पद्मशाली यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदनगडचिरोली : मागास व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या जलद विकासासाठी अनुभवी व कार्यक्षम जिल्हाधिकारी देण्यात यावा, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार सुरेश पद्मशाली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. गडचिरोली जिल्हा निर्मितीस ३२ वर्ष पूर्ण झाले आहेत. मात्र गडचिरोली शहर, वडसा शहर, तालुक्याचे ठिकाण तसेच विविध मोठ्या गावांचा विकास झाला नाही. गडचिरोली हा राज्याच्या क्रमवारी शेवटच्या क्रमांकाचा जिल्हा असल्याने महाराष्ट्र शासनाने गडचिरोलीच्या जिल्हाधिकारीपदी अनुभव नसलेल्या नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. या नव्या अधिकाऱ्यांना अनुभव घेताघेता त्यांची बदली करण्यात येते. त्यामुळे नवे अधिकारी जिल्ह्याचा गतीने विकास करू शकत नाही. गडचिरोली जिल्ह्याबरोबर निर्माण झालेला लातूर जिल्हा व त्यानंतर निर्माण झालेले अनेक जिल्हे प्रगतिपथावर आहेत. मात्र गडचिरोली जिल्हा अद्यापही आहे त्याच स्थितीत आहे. जिल्हा निर्माण झाल्यानंतर गडचिरोली नगर परिषदेची (ग्रामपंचायतीची) स्वतंत्र इमारत होती. सद्यस्थितीत नगर परिषदेचे प्रशासकीय कामकाज खासदार निधीतून बांधलेल्या आदिवासी सांस्कृतीक भवनात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. जनतेच्या सोयीसाठी जिल्ह्याचे प्रथम जिल्हाधिकारी रत्नाकर गायकवाड यांनी बांधलेली मुख्य मार्गावरील राजस्व भवनाची शासकीय इमारत दारूच्या रिकाम्या बॉटला ठेवण्यासाठी वापरली जात आहे. गडचिरोली शहरात एकमेव असलेल्या इंदिरा गांधी चौकातील ट्रॉफीक सिग्नल दोन ते तीन वर्षापासून बंद आहे. एमआयडीसी व जिल्हा कारागृहाच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. गडचिरोली शहरात नागरिकांच्या सोयीसाठी एकही बगीचा नाही. ५०० ते १००० नागरिक एकत्र बसू शकतील, असे नगर भवन अथवा सांस्कृतीक भवनाची सोय नाही. गडचिरोली शहरात जिल्हाधिकारी स्वत: निवासी राहतात. मात्र ते गडचिरोली शहराच्या विकासाकडे लक्ष देत नाहीत. तर जिल्ह्याच्या १२ तालुक्यांकडे व १६०० गावांकडे किती लक्ष देतात, याची कल्पना येते. जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी जिल्हास्तरावरील प्रशासकीय यंत्रणा गतीमान असायला हवी. मात्र कार्यरत असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे जिल्ह्याचा विकास रखडला आहे, असा आरोपही सुरेश पद्मशाली यांनी केला आहे. जिल्ह्याच्या जलद विकासासाठी अनुभवी जिल्हाधिकाऱ्याची गरज असल्यामुळे अनुभवी जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी पद्मशाली यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)