शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अनुभवी जिल्हाधिकारी द्या

By admin | Updated: November 3, 2014 23:26 IST

मागास व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या जलद विकासासाठी अनुभवी व कार्यक्षम जिल्हाधिकारी देण्यात यावा, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार सुरेश पद्मशाली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना

नव्या सरकारकडे मागणी : सुरेश पद्मशाली यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदनगडचिरोली : मागास व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या जलद विकासासाठी अनुभवी व कार्यक्षम जिल्हाधिकारी देण्यात यावा, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार सुरेश पद्मशाली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. गडचिरोली जिल्हा निर्मितीस ३२ वर्ष पूर्ण झाले आहेत. मात्र गडचिरोली शहर, वडसा शहर, तालुक्याचे ठिकाण तसेच विविध मोठ्या गावांचा विकास झाला नाही. गडचिरोली हा राज्याच्या क्रमवारी शेवटच्या क्रमांकाचा जिल्हा असल्याने महाराष्ट्र शासनाने गडचिरोलीच्या जिल्हाधिकारीपदी अनुभव नसलेल्या नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. या नव्या अधिकाऱ्यांना अनुभव घेताघेता त्यांची बदली करण्यात येते. त्यामुळे नवे अधिकारी जिल्ह्याचा गतीने विकास करू शकत नाही. गडचिरोली जिल्ह्याबरोबर निर्माण झालेला लातूर जिल्हा व त्यानंतर निर्माण झालेले अनेक जिल्हे प्रगतिपथावर आहेत. मात्र गडचिरोली जिल्हा अद्यापही आहे त्याच स्थितीत आहे. जिल्हा निर्माण झाल्यानंतर गडचिरोली नगर परिषदेची (ग्रामपंचायतीची) स्वतंत्र इमारत होती. सद्यस्थितीत नगर परिषदेचे प्रशासकीय कामकाज खासदार निधीतून बांधलेल्या आदिवासी सांस्कृतीक भवनात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. जनतेच्या सोयीसाठी जिल्ह्याचे प्रथम जिल्हाधिकारी रत्नाकर गायकवाड यांनी बांधलेली मुख्य मार्गावरील राजस्व भवनाची शासकीय इमारत दारूच्या रिकाम्या बॉटला ठेवण्यासाठी वापरली जात आहे. गडचिरोली शहरात एकमेव असलेल्या इंदिरा गांधी चौकातील ट्रॉफीक सिग्नल दोन ते तीन वर्षापासून बंद आहे. एमआयडीसी व जिल्हा कारागृहाच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. गडचिरोली शहरात नागरिकांच्या सोयीसाठी एकही बगीचा नाही. ५०० ते १००० नागरिक एकत्र बसू शकतील, असे नगर भवन अथवा सांस्कृतीक भवनाची सोय नाही. गडचिरोली शहरात जिल्हाधिकारी स्वत: निवासी राहतात. मात्र ते गडचिरोली शहराच्या विकासाकडे लक्ष देत नाहीत. तर जिल्ह्याच्या १२ तालुक्यांकडे व १६०० गावांकडे किती लक्ष देतात, याची कल्पना येते. जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी जिल्हास्तरावरील प्रशासकीय यंत्रणा गतीमान असायला हवी. मात्र कार्यरत असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे जिल्ह्याचा विकास रखडला आहे, असा आरोपही सुरेश पद्मशाली यांनी केला आहे. जिल्ह्याच्या जलद विकासासाठी अनुभवी जिल्हाधिकाऱ्याची गरज असल्यामुळे अनुभवी जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी पद्मशाली यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)