शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

अनुभवी जिल्हाधिकारी द्या

By admin | Updated: November 3, 2014 23:26 IST

मागास व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या जलद विकासासाठी अनुभवी व कार्यक्षम जिल्हाधिकारी देण्यात यावा, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार सुरेश पद्मशाली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना

नव्या सरकारकडे मागणी : सुरेश पद्मशाली यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदनगडचिरोली : मागास व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या जलद विकासासाठी अनुभवी व कार्यक्षम जिल्हाधिकारी देण्यात यावा, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार सुरेश पद्मशाली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. गडचिरोली जिल्हा निर्मितीस ३२ वर्ष पूर्ण झाले आहेत. मात्र गडचिरोली शहर, वडसा शहर, तालुक्याचे ठिकाण तसेच विविध मोठ्या गावांचा विकास झाला नाही. गडचिरोली हा राज्याच्या क्रमवारी शेवटच्या क्रमांकाचा जिल्हा असल्याने महाराष्ट्र शासनाने गडचिरोलीच्या जिल्हाधिकारीपदी अनुभव नसलेल्या नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. या नव्या अधिकाऱ्यांना अनुभव घेताघेता त्यांची बदली करण्यात येते. त्यामुळे नवे अधिकारी जिल्ह्याचा गतीने विकास करू शकत नाही. गडचिरोली जिल्ह्याबरोबर निर्माण झालेला लातूर जिल्हा व त्यानंतर निर्माण झालेले अनेक जिल्हे प्रगतिपथावर आहेत. मात्र गडचिरोली जिल्हा अद्यापही आहे त्याच स्थितीत आहे. जिल्हा निर्माण झाल्यानंतर गडचिरोली नगर परिषदेची (ग्रामपंचायतीची) स्वतंत्र इमारत होती. सद्यस्थितीत नगर परिषदेचे प्रशासकीय कामकाज खासदार निधीतून बांधलेल्या आदिवासी सांस्कृतीक भवनात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. जनतेच्या सोयीसाठी जिल्ह्याचे प्रथम जिल्हाधिकारी रत्नाकर गायकवाड यांनी बांधलेली मुख्य मार्गावरील राजस्व भवनाची शासकीय इमारत दारूच्या रिकाम्या बॉटला ठेवण्यासाठी वापरली जात आहे. गडचिरोली शहरात एकमेव असलेल्या इंदिरा गांधी चौकातील ट्रॉफीक सिग्नल दोन ते तीन वर्षापासून बंद आहे. एमआयडीसी व जिल्हा कारागृहाच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. गडचिरोली शहरात नागरिकांच्या सोयीसाठी एकही बगीचा नाही. ५०० ते १००० नागरिक एकत्र बसू शकतील, असे नगर भवन अथवा सांस्कृतीक भवनाची सोय नाही. गडचिरोली शहरात जिल्हाधिकारी स्वत: निवासी राहतात. मात्र ते गडचिरोली शहराच्या विकासाकडे लक्ष देत नाहीत. तर जिल्ह्याच्या १२ तालुक्यांकडे व १६०० गावांकडे किती लक्ष देतात, याची कल्पना येते. जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी जिल्हास्तरावरील प्रशासकीय यंत्रणा गतीमान असायला हवी. मात्र कार्यरत असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे जिल्ह्याचा विकास रखडला आहे, असा आरोपही सुरेश पद्मशाली यांनी केला आहे. जिल्ह्याच्या जलद विकासासाठी अनुभवी जिल्हाधिकाऱ्याची गरज असल्यामुळे अनुभवी जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी पद्मशाली यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)