शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

रेल्वेग्रस्तांना योेग्य मोबदला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 01:29 IST

देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी ज्या शेतकºयांची जमीन जात आहे, अशा शेतकºयांना तसेच ज्या नागरिकांचे घरे जात आहेत, ....

ठळक मुद्देप्लॉटच्या जागेवर रेल्वे लाईन : नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी ज्या शेतकºयांची जमीन जात आहे, अशा शेतकºयांना तसेच ज्या नागरिकांचे घरे जात आहेत, अशा नागरिकांना योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणी रेल्वेग्रस्तांनी केली आहे.गडचिरोली-देसाईगंज रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. रेल्वेस्थानकाचे बांधकाम गडचिरोली शहरातील एसटी डेपोच्या अगदी मागच्या बाजूला होणार आहे. या परिसरात अरूणा प्रदीप तेलसे व देवराव नक्टू चौधरी यांची पक्की घरे आहेत. तर पत्रू डोनूजी रोहणकर, राजू वकरे, भास्कर निंबेकर यांच्या घराचे अर्धवट बांधकाम झाले आहे. त्याचबरोबर लक्ष्मीकांत मेश्राम, श्रीराम कांबळे, रवींद्र बाळेकरमकर, पुरूषोत्तम गेडाम, वच्छला गेडाम, भीमराव वासनिक, पुरूषोत्तम ढेंगळे, देवेंद्र कोकोडे, राजेश सूर्यवंशी, डी. यू. गोरे, सी. यू. कोहपरे, वैशाली चन्नावार, अर्चना पिटवार आदींची घरांची जागा आहे. रेल्वे विभागाने सर्वेक्षण करण्यापूर्वी येथील नागरिकांना नोटीस सुद्धा पाठविली नाही. सर्वे करून एकाचवेळी या भागात खांब गाडण्यात आले. सदर जागा घरांच्या बांधकामाची असल्याने प्रत्येक प्लॉटची किंमत १० लाखांच्या जवळपास आहे. त्यामुळे त्यानुसार मोबदला देण्यात यावा, प्रत्येक जमीनधारकाला नोकरी देण्यात यावी, अशी मागणी या नागरिकांनी केली आहे.आयुष्याची जमापूंजी खर्च करून अनेकांनी प्लॉट खरेदी केले आहे. मात्र सदर प्लॉट आता रेल्वेमार्गासाठी जाणार आहेत. तेवढा मोबदला मिळला नाही तर अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे.प्रकल्पग्रस्त एकवटणारजमिनीचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे. यासाठी रेल्वे प्रकल्पग्रस्त समितीचे गठन केले जाणार आहे. या माध्यमातून लढा दिला जाणार आहे.