शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

चामोर्शी शहर विकासासाठी भाजपाला पूर्ण बहुमत द्या

By admin | Updated: October 30, 2015 01:30 IST

केंद्रात विकासाची विहीर आहे, पाणी आणणारे पाईप राज्यात भाजपाचेच आहे, चामोर्शीत तोटी लावायची आहे, .....

जाहीर सभा : सुधीर मुनगंटीवार यांचे मतदारांना आवाहनंचामोर्शी : केंद्रात विकासाची विहीर आहे, पाणी आणणारे पाईप राज्यात भाजपाचेच आहे, चामोर्शीत तोटी लावायची आहे, ती काँग्रेसची गंजलेली असावी की भाजपची नवी कोरी तोटी लावायची, याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. मतदारांनी चामोर्शी नगर पंचायतीत भाजपाचे १७ ही उमेदवार निवडून दिल्यास राज्य शासनाकडून १० कोटींचा निधी आणून चामोर्शीला जिल्ह्यातील क्रमांक १ चे सुंदर व स्वच्छ शहर बनविणार, असे आश्वासन देत भाजपाला पूर्ण बहुमत देण्याचे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. गुरूवारी चामोर्शीच्या वाळवंटी चौकात आयोजित नगर पंचायत निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, रवींद्र ओल्लालवार, स्वप्नील वरघंटे, प्रमोद पिपरे, डॉ. भारत खटी, मनोज पालारपवार, रवी बोमनवार, मनोहर पालारपवार, प्रकाश अर्जुनवार, प्रकाश गेडाम, आनंद भांडेकर, आनंद गण्यारपवार, पं. स. सभापती शशी चिळंगे, उपसभापती मंदा दुधबावरे, रेखा डोळस, रमेश भुरसे आदी उपस्थित होते. ना. मुनगंटीवार म्हणाले, राज्यात होत असलेल्या शेतकरी आत्महत्यांना तत्कालीन काँग्रेस सरकारची कामगिरी जबाबदार आहे. मात्र काँग्रेसचे नेते भाजपाला बदनाम करीत आहेत. काँग्रेस गरीब माणसाचे साधे बँक बचत खाते उघडू शकले नाही, ते काम भाजप सरकारने प्रथमच केले. केंद्र व राज्यातील भाजपचे सरकार हे गरीब जनतेच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. गरीब जनतेला त्रास देवू नका अशी स्पष्ट ताकीद सर्व प्रशासन व अधिकाऱ्यांना दिली आहे. सत्तेसाठी आम्ही राजकारणात नाही तर लोकसेवेसाठी सत्तेत आहो, इंदिरा आवास योजनेंतर्गत काँग्रेस सरकारने ज्या बीपीएलधारकांजवळ स्वत:ची जागा होती, त्यांनाच घरकूल दिले. मात्र भाजप सरकार सर्व जातीतील बीपीएलधारकांना घरकूल देणार आहे. ज्या बीपीएलधारकांकडे जागा नाही, अशांचे घरकूल उभे राहण्यासाठी राज्य सरकार ५० हेक्टर जागा घेऊन त्यांना घरकूल देणार आहे. काँगे्रसने ६० वर्षांत काय दिवे लावले, याचा हिशेब काँग्रेस नेत्यांनी प्रथम द्यावा, असे खुले आव्हानही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.शेतकऱ्यांच्या धानाला भाव मिळवून देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार, मार्र्कंडा देवस्थानाला नियम बदलवून निधी दिला, विरोधात असताना निधी दिला, आता तर सत्तेत आहो, विकासासाठी भाजपाच्या पाठिशी राहा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.याप्रसंगी खा. अशोक नेते यांनी जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा मांडला. आ. डॉ. देवराव होळी, प्रकाश गेडाम, प्रमोद पिपरे, रमेश भुरसे यांचीही भाषणे झालीत.प्रचार सभेचे संचालन रवींद्र ओल्लालवार यांनी केले तर आभार स्वप्नील वरघंटे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)