शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शी शहर विकासासाठी भाजपाला पूर्ण बहुमत द्या

By admin | Updated: October 30, 2015 01:30 IST

केंद्रात विकासाची विहीर आहे, पाणी आणणारे पाईप राज्यात भाजपाचेच आहे, चामोर्शीत तोटी लावायची आहे, .....

जाहीर सभा : सुधीर मुनगंटीवार यांचे मतदारांना आवाहनंचामोर्शी : केंद्रात विकासाची विहीर आहे, पाणी आणणारे पाईप राज्यात भाजपाचेच आहे, चामोर्शीत तोटी लावायची आहे, ती काँग्रेसची गंजलेली असावी की भाजपची नवी कोरी तोटी लावायची, याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. मतदारांनी चामोर्शी नगर पंचायतीत भाजपाचे १७ ही उमेदवार निवडून दिल्यास राज्य शासनाकडून १० कोटींचा निधी आणून चामोर्शीला जिल्ह्यातील क्रमांक १ चे सुंदर व स्वच्छ शहर बनविणार, असे आश्वासन देत भाजपाला पूर्ण बहुमत देण्याचे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. गुरूवारी चामोर्शीच्या वाळवंटी चौकात आयोजित नगर पंचायत निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, रवींद्र ओल्लालवार, स्वप्नील वरघंटे, प्रमोद पिपरे, डॉ. भारत खटी, मनोज पालारपवार, रवी बोमनवार, मनोहर पालारपवार, प्रकाश अर्जुनवार, प्रकाश गेडाम, आनंद भांडेकर, आनंद गण्यारपवार, पं. स. सभापती शशी चिळंगे, उपसभापती मंदा दुधबावरे, रेखा डोळस, रमेश भुरसे आदी उपस्थित होते. ना. मुनगंटीवार म्हणाले, राज्यात होत असलेल्या शेतकरी आत्महत्यांना तत्कालीन काँग्रेस सरकारची कामगिरी जबाबदार आहे. मात्र काँग्रेसचे नेते भाजपाला बदनाम करीत आहेत. काँग्रेस गरीब माणसाचे साधे बँक बचत खाते उघडू शकले नाही, ते काम भाजप सरकारने प्रथमच केले. केंद्र व राज्यातील भाजपचे सरकार हे गरीब जनतेच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. गरीब जनतेला त्रास देवू नका अशी स्पष्ट ताकीद सर्व प्रशासन व अधिकाऱ्यांना दिली आहे. सत्तेसाठी आम्ही राजकारणात नाही तर लोकसेवेसाठी सत्तेत आहो, इंदिरा आवास योजनेंतर्गत काँग्रेस सरकारने ज्या बीपीएलधारकांजवळ स्वत:ची जागा होती, त्यांनाच घरकूल दिले. मात्र भाजप सरकार सर्व जातीतील बीपीएलधारकांना घरकूल देणार आहे. ज्या बीपीएलधारकांकडे जागा नाही, अशांचे घरकूल उभे राहण्यासाठी राज्य सरकार ५० हेक्टर जागा घेऊन त्यांना घरकूल देणार आहे. काँगे्रसने ६० वर्षांत काय दिवे लावले, याचा हिशेब काँग्रेस नेत्यांनी प्रथम द्यावा, असे खुले आव्हानही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.शेतकऱ्यांच्या धानाला भाव मिळवून देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार, मार्र्कंडा देवस्थानाला नियम बदलवून निधी दिला, विरोधात असताना निधी दिला, आता तर सत्तेत आहो, विकासासाठी भाजपाच्या पाठिशी राहा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.याप्रसंगी खा. अशोक नेते यांनी जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा मांडला. आ. डॉ. देवराव होळी, प्रकाश गेडाम, प्रमोद पिपरे, रमेश भुरसे यांचीही भाषणे झालीत.प्रचार सभेचे संचालन रवींद्र ओल्लालवार यांनी केले तर आभार स्वप्नील वरघंटे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)