शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
4
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
5
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
6
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
7
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
8
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
9
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
10
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
11
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
12
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
13
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
14
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
15
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
16
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
17
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
18
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
19
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
20
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?

चामोर्शी शहर विकासासाठी भाजपाला पूर्ण बहुमत द्या

By admin | Updated: October 30, 2015 01:30 IST

केंद्रात विकासाची विहीर आहे, पाणी आणणारे पाईप राज्यात भाजपाचेच आहे, चामोर्शीत तोटी लावायची आहे, .....

जाहीर सभा : सुधीर मुनगंटीवार यांचे मतदारांना आवाहनंचामोर्शी : केंद्रात विकासाची विहीर आहे, पाणी आणणारे पाईप राज्यात भाजपाचेच आहे, चामोर्शीत तोटी लावायची आहे, ती काँग्रेसची गंजलेली असावी की भाजपची नवी कोरी तोटी लावायची, याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. मतदारांनी चामोर्शी नगर पंचायतीत भाजपाचे १७ ही उमेदवार निवडून दिल्यास राज्य शासनाकडून १० कोटींचा निधी आणून चामोर्शीला जिल्ह्यातील क्रमांक १ चे सुंदर व स्वच्छ शहर बनविणार, असे आश्वासन देत भाजपाला पूर्ण बहुमत देण्याचे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. गुरूवारी चामोर्शीच्या वाळवंटी चौकात आयोजित नगर पंचायत निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, रवींद्र ओल्लालवार, स्वप्नील वरघंटे, प्रमोद पिपरे, डॉ. भारत खटी, मनोज पालारपवार, रवी बोमनवार, मनोहर पालारपवार, प्रकाश अर्जुनवार, प्रकाश गेडाम, आनंद भांडेकर, आनंद गण्यारपवार, पं. स. सभापती शशी चिळंगे, उपसभापती मंदा दुधबावरे, रेखा डोळस, रमेश भुरसे आदी उपस्थित होते. ना. मुनगंटीवार म्हणाले, राज्यात होत असलेल्या शेतकरी आत्महत्यांना तत्कालीन काँग्रेस सरकारची कामगिरी जबाबदार आहे. मात्र काँग्रेसचे नेते भाजपाला बदनाम करीत आहेत. काँग्रेस गरीब माणसाचे साधे बँक बचत खाते उघडू शकले नाही, ते काम भाजप सरकारने प्रथमच केले. केंद्र व राज्यातील भाजपचे सरकार हे गरीब जनतेच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. गरीब जनतेला त्रास देवू नका अशी स्पष्ट ताकीद सर्व प्रशासन व अधिकाऱ्यांना दिली आहे. सत्तेसाठी आम्ही राजकारणात नाही तर लोकसेवेसाठी सत्तेत आहो, इंदिरा आवास योजनेंतर्गत काँग्रेस सरकारने ज्या बीपीएलधारकांजवळ स्वत:ची जागा होती, त्यांनाच घरकूल दिले. मात्र भाजप सरकार सर्व जातीतील बीपीएलधारकांना घरकूल देणार आहे. ज्या बीपीएलधारकांकडे जागा नाही, अशांचे घरकूल उभे राहण्यासाठी राज्य सरकार ५० हेक्टर जागा घेऊन त्यांना घरकूल देणार आहे. काँगे्रसने ६० वर्षांत काय दिवे लावले, याचा हिशेब काँग्रेस नेत्यांनी प्रथम द्यावा, असे खुले आव्हानही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.शेतकऱ्यांच्या धानाला भाव मिळवून देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार, मार्र्कंडा देवस्थानाला नियम बदलवून निधी दिला, विरोधात असताना निधी दिला, आता तर सत्तेत आहो, विकासासाठी भाजपाच्या पाठिशी राहा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.याप्रसंगी खा. अशोक नेते यांनी जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा मांडला. आ. डॉ. देवराव होळी, प्रकाश गेडाम, प्रमोद पिपरे, रमेश भुरसे यांचीही भाषणे झालीत.प्रचार सभेचे संचालन रवींद्र ओल्लालवार यांनी केले तर आभार स्वप्नील वरघंटे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)