शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

शाळेपर्यंतचा मुलींचा प्रवास बसमुळे झाला सुकर

By admin | Updated: December 18, 2014 22:54 IST

नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्यातच येथील विद्यार्थिनींना आता शासनाच्या मानव विकास मिशनचा आधार मिळाल्यामुळे शिक्षणाचा

गडचिरोली : नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्यातच येथील विद्यार्थिनींना आता शासनाच्या मानव विकास मिशनचा आधार मिळाल्यामुळे शिक्षणाचा अडसर दूर होऊन गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थिनींचा प्रवास सुखकर झाला आहे. गडचिरोली जिल्हा हा अतिसंवेदनशील असलेला नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात अतिदुर्गम भागात लोकवस्ती आढळते. जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाहतुकीची योग्य सोय नसल्यामुळे मुलींना आठवीनंतर बारावीपर्यंतचे शिक्षण घेणे अवघड झाले होते. या भागातील मुलींचे कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत शिक्षण होणार असल्यामुळे बालविवाहाला आळा बसेल. मुलींचे लग्न योग्य वयात झाल्यामुळे जन्माला येणाऱ्या बालकांची कुपोषणाची समस्या सुटेल. विद्याथीर्नींची अनेक कि.मी. पायपीट थांबावी म्हणून शासनाने २९ जून २००६ च्या शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र मानव विकास मिशन अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात विद्यार्थिनींसाठी बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व मुलींना इयत्ता बारावी पर्यंत शिक्षण घेणे शक्य व्हावे, याकरीता गाव ते शाळा या दरम्यान वाहतुकीची मोफत सुविधा उपलब्ध करणे, हा शासनाचा मुख्य हेतू आहे. या बसेसमध्ये विद्यार्थिनींना मोफत प्रवास सवलत आहे. या मिशन अंतर्गत गडचिरोली बसस्थानकातून दररोज ५५ बसेस सोडण्यात येतात. त्यात गडचिरोली, आरमोरी, कुरखेडा, कोरची, चामोर्शी व धानोरा, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा या अकरा तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यातील विविध गावांमधून निश्चित केलेल्या वेगवेगळ्या मार्गावर धावणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ५५ बसेसमधून दररोज विद्याथीर्नी प्रवास करतात. एकूण जिल्ह्यातील ११ तालुक्यात प्रत्येकी ५ बसेस देण्यात आल्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)