शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
4
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
5
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
6
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
7
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
8
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
9
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
10
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
11
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
12
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
13
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
14
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
15
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
16
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
17
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
18
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
19
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

विद्यार्थिनींनी एक तास बस रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 23:58 IST

मुलचेरा-लगाम मार्गावर मानव विकास मिशन अंतर्गत महामंडळाची बसफेरी सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी विद्यार्थिनींनी गुरूवारी कोपरअल्ली येथे मानव विकास मिशनची बस तब्बल एक तास रोखून धरली.

ठळक मुद्देतहसीलदार व ठाणेदारांना निवेदन : मुलचेरा-लगाम मार्गावर बसफेरी सुरू करा

लोकमत न्यूज नेटवर्कमुलचेरा : मुलचेरा-लगाम मार्गावर मानव विकास मिशन अंतर्गत महामंडळाची बसफेरी सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी विद्यार्थिनींनी गुरूवारी कोपरअल्ली येथे मानव विकास मिशनची बस तब्बल एक तास रोखून धरली. यामुळे येथे काही काळ खळबळ निर्माण झाली होती.या संदर्भात विद्यार्थिनींनी थेट मुलचेरा पोलीस ठाणे गाठून पोलीस निरिक्षकांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, कोपरअल्ली परिसरातील मल्लेरा, कोळसापूर, विश्वनाथ नगर, कोपरअल्ली परिसरातील ६० ते ७० विद्यार्थी मुलचेरा येथे शिक्षणासाठी येतात. गुरूवारला ७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास मुलचेरा-नरेंद्रपूर या बसला हात दाखविला असता, सदर बस न थांबता ती थेट मुलचेरा येथे निघून गेली. यावेळी विद्यार्थ्यांना पायपीट करीत शाळा गाठावी लागली. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थिनींनी मुलचेराचे नगराध्यक्ष सुभाष आत्राम यांच्या नेतृत्वात तब्बल एक तास मानव विकास मिशनची बस रोखून धरली. या बाबीची माहिती कळताच मुलचेराच्या पोलीस निरिक्षकांनी घटनास्थळ गाठून विद्यार्थिनींची समजूत काढली. तसेच तहसीलदार व पोलीस ठाण्यात निवेदन देण्यास सांगितले. त्यानुसार विद्यार्थिनींनी तहसीलदार व पोलीस निरिक्षकांना निवेदन दिले.मुलचेरा मार्गावर सकाळी ७ वाजताची बस सुरू न झाल्यास शनिवारी चक्काजाम आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष सुभाष आत्राम, शितल मोहुर्ले, पल्लवी आत्राम, गोपिका नैताम यांच्यासह विद्यार्थिनी हजर होत्या.