शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

व्यसनविरोधी अभियानाचे मुक्तीसैनिक व्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 22:39 IST

२०१८ हे वर्ष अस्ताला जाऊन २०१९ चा सूर्योदय सर्वांची वाट पाहत आहे. नवी सुरुवात ही आनंदात आणि भान राखून होणे गरजेचे आहे. पण देशाचे भविष्य ज्यांच्या खांद्यावर आहे त्या तरुणाईला बेभान करून नव्या वर्षाची सुरुवात करण्याची विकृत संस्कृती जन्म घेत आहे.

ठळक मुद्देअभय बंग यांचे आवाहन : साकारली व्यसनविरोधी मानवी साखळी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २०१८ हे वर्ष अस्ताला जाऊन २०१९ चा सूर्योदय सर्वांची वाट पाहत आहे. नवी सुरुवात ही आनंदात आणि भान राखून होणे गरजेचे आहे. पण देशाचे भविष्य ज्यांच्या खांद्यावर आहे त्या तरुणाईला बेभान करून नव्या वर्षाची सुरुवात करण्याची विकृत संस्कृती जन्म घेत आहे. अशी स्थिती सर्वत्र असताना गडचिरोलीची तरुणाई व्यसन विरोधी अभियानात सहभागी होत असल्याची बाब अभिनंदनीय आहे. ही युवा पिढी अशीच व्यसनमुक्त राहण्यासाठी दारूच्या पहिल्या घोटापासूनच त्यांनी दूर राहणे गरजेचे आहे. त्यामुळे व्यसन विरोधी अभियानाचे मुक्तीसैनिक होऊन व्यसनमुक्तीच्या लोकलढ्यात सहभागी व्हा, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक डॉ.अभय बंग यांनी ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर केले.नव्या वर्षाचे स्वागत सर्वांनी आनंदी आणि शुद्धीत राहून करावे, सोबतच युवा वर्गाने व्यसनमुक्त राहण्याचा निर्धार करावा यासाठी मुक्तिपथ अभियान आणि राष्ट्रीय सेवा योजना, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने युवा वर्गाच्या सहभागातून ३१ डिसेंबर रोजी शहरात व्यसनविरोधी मानवी साखळी तयार करून व्यसनमुक्तीची हाक देण्यात आली. या अभियानात सहभागी होत डॉ. बंग यांनी युवकांशी संवाद साधला. यावेळी विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ. नरेश मडावी, मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता, उपसंचालक संतोष सावळकर उपस्थित होते. थोडीशी गम्मत म्हणून सुरु झालेली दारूची मजा संपूर्ण शरीराचा ताबा घेते. त्यामुळे हिंसा, अत्याचार, अपघात या प्रकारांच्या मुळाशी दारूचे व्यसन असते. एकट्या गडचिरोली जिल्ह्यात या वर्षात दारूमुळे ३०० वर अपघात झाले आहे. हे दुष्टचक्र थांबविण्यासाठी सर्वांनी व्यसनमुक्त होण्याची गरज त्यांनी व्यक्त करतानाच या मानवी साखळीतून हा संकल्प युवा वगार्तून प्रगट झाल्याचे डॉ. बंग यावेळी म्हणाले.दारू पिऊन होत असलेले अपघात आणि त्या अपघाताचा कुटुंबावर पडणारा प्रभाव दाखविणारे पथनाट्य शासकीय विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे सादर केले. सर्वांनी हातात हात घेऊन व्यसनविरोधी मानवी साखळी यावेळी तयार केली. शिवाजी महाविद्यालय, इंदिरा गांधी महाविद्यालय, महिला महाविद्यालय, फुले, शाहू, आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, आयटीआय, कृषी महाविद्यालय, शासकीय विज्ञान महाविद्यालयातील आणि एकूण २१६ विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.चौकात लागला आरसाशहरात दारूविक्री होणाऱ्या जागा, त्यांची संख्या, या महिन्यात झालेली कृती आणि या कृतीमुळे बंद झालेली दारू हे दर्शविणारा ‘गडचिरोली शहराचा आरसा’ असलेला फलक शहराच्या मध्यभागी गांधी चौकात यावेळी लावण्यात आला. डॉ. अभय बंग यांच्या हस्ते या फलकाचे अनावरण करण्यात आले. किती जागी पोलिसांनी कारवाई केली हे प्रत्येक महिन्यात या आरशावर लिहिले जाणार आहे.