शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

अधिकार रक्षणासाठी संघटित व्हा

By admin | Updated: December 26, 2015 01:36 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील दलित, आदिवासी, दीनदुबळ्या लोकांचा संविधानातील मूलभूत सूचित अंतर्भाव करून त्यांना आरक्षणाचा घटनादत्त अधिकार दिला.

आरमोरीत गोटूल महोत्सवाचे उद्घाटन : वसंत पुरके यांचे आदिवासींना आवाहनआरमोरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील दलित, आदिवासी, दीनदुबळ्या लोकांचा संविधानातील मूलभूत सूचित अंतर्भाव करून त्यांना आरक्षणाचा घटनादत्त अधिकार दिला. मात्र आदिवासी समाजाला मिळालेल्या आरक्षणावर डोळा ठेऊन बोगस जाती खऱ्या आदिवासींमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आदिवासींचे आरक्षण हिरावू पाहणाऱ्या गैरआदिवासींना शासन संरक्षण देण्याचे काम करीत आहे. आरक्षण हा आपला हक्क असून तो कुणालाही हिरावू देणार नाही, हक्क आणि अधिकारांच्या रक्षणासाठी एकजूट होऊन संघटितपणे लढा देण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन माजी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वसंतराव पुरके यांनी केले. गोटूल बहुउद्देशीय समिती व आदिवासी विद्यार्थी संघ तालुका शाखा आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील गोटूल भूमीवर गुरूवारी आयोजित गोटूल महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी प्रा. पुरके बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री शिवाजीराव मोघे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, ज्येष्ठनेते सुधीर भातकुलकर, माजी जि. प. सदस्य पी. आर. आकरे, विभागीय समाजकल्याण अधिकारी आर. डी. आत्राम, वेणू ढवगाये, भूवैज्ञानिक तुकेश सयाम, जि. प. सदस्य सुकमा जांगधुर्वे, भाऊराव मरापे, दत्ताजी मालगडे, डॉ. आशिष कोरेटी, सुकरंजन उसेंडी, मुक्तेश नरोटे, संदीप ठाकुर, प्रा. दौलत धुर्वे, बाळू मडावी, संदीप गरफडे, प्रा. हंसराज बडोले उपस्थित होते. बोगस आदिवासींना संरक्षण देण्याचे काम १९९५ मध्ये युती सरकारने केले. त्यानंतर पुन्हा आता सत्तेत आलेल्या सरकारने बोगस आदिवासींना संरक्षण देण्याचे काम सुरू केले आहे. आदिवासी, दलित समाजाला मिळालेले आरक्षण संपविण्याचे कारस्थान सध्या सुरू आहे. त्यामुळे याविरोधात संघटित होऊन संघर्ष करावा, असे आवाहन शिवाजीराव मोघे यांनी केले. महोत्सवात सुकरंजन उसेंडी, तुकेश सयाम, डॉ. आशिष कोरेटी, शालू पदा यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रा. दौलत धुर्वे, संचालन भावेश उईके यांनी केले. प्रा. दिलीप कुमरे, दिलीप कोडाप, राम वालदे, दिलीप घोडाम, गोटूल समिती व आविसंच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)