शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
3
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
4
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
5
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
6
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
7
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
8
जातगणना : मॅजिक की मंडल?
9
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
10
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
11
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
12
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
13
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
14
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
15
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
16
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
17
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
18
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
19
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
20
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा

आम्हाला न्याय मिळवून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 23:48 IST

तालुक्यातील नेलगुंडा व गोंगवाडा येथील नागरिकांना पोलिसांनी कारण नसताना पोलीस ठाण्यात नेऊन अत्याचार करीत आहेत.

ठळक मुद्देनिवेदन सादर : आदिवासी बांधवांची प्रकाश आमटेंकडे धाव

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : तालुक्यातील नेलगुंडा व गोंगवाडा येथील नागरिकांना पोलिसांनी कारण नसताना पोलीस ठाण्यात नेऊन अत्याचार करीत आहेत. त्यामुळे आम्हाला न्याय मिळवून देण्यात यावा, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांच्याकडे निवेदनातून ग्रामस्थांनी केली आहे.ग्रामस्थांनी म्हटले आहे की, ११ आॅक्टोबर रोजी गोंगवाडा येथील रहिवासी रैनु काना पुंगाटी याला पोलिसांनी घरून नेले. त्याच्या चौकशीनंतर धोडराज येथील कोरके नेंडा पल्लो, झुरू चिन्ना पुंगाटी, संतोष नारायण भांडेकर, अशोका फकीरा सोमनकर, बंडू चिन्ना गेडाम तसेच मेडपल्ली येथील वांगे जोगी मज्जी याला पोलिसांनी नेले. मात्र त्यांच्या नातेवाईकांना याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली. तसेच त्यांना मारहाण केल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनातून केला आहे.आदिवासींनी गावातील गोटूलमध्ये बसून बैठक घेवू नये, दुसºया गावात जावू नये, असेही पोलिसांनी बजावल्याचे निवेदनात नमूद केले आहे. आम्ही राहत असलेल्या गावांमधील परिस्थिती आपणास माहित असून अशिक्षित आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, असे डॉ. आमटे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदन अनिकेत आमटे यांनी स्वीकारले.मारहाण केली नाही-राजपूतयाबाबत ठाण्याच्या प्रभारी पोलीस अधिकारी अंजली राजपूत यांना विचारणा केली असता त्या म्हणाल्या, पोलिसांच्या ताब्यात असलेल्या नागरिकांना कायदेशिरपणे अटक करण्यात आलेली आहे. पोलिसांकडून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार केला जात नसून त्यांच्या राहण्याची तसेच जेवनाचीसुध्दा व्यवस्था करण्यात आलेली आहे. अटक करण्यात आलेल्यांवर कसल्याही प्रकारचा पोलिसांनी दबाव टाकलेला नसल्याची माहिती राजपूत यांनी दिली आहे.