शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:58 IST

आरमोरी तालुक्यातील वैरागड- मानापूर मार्गावरील वैैलोचना नदीवर मोठ्या पुलाचे काम सुरू आहे.

ठळक मुद्देआमदारांचे कंत्राटदार व यंत्रणेला निर्देश : वैैलोचना नदीवरील पुलाच्या कामाची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी तालुक्यातील वैरागड- मानापूर मार्गावरील वैैलोचना नदीवर मोठ्या पुलाचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी आ. कृष्णा गजबे यांनी नुकतीच केली. सदर पुलाचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून हा पूल पावसाळ्यात वाहतुकीसाठी खुला करावा, असे निर्देश त्यांनी संबंधित कंत्राटदार व यंत्रणेला यावेळी दिले.वैरागड-मानापूर मार्गावर बारमाही वाहणारी वैलोचना नदी आहे. सदर मार्गाच्या दोन्ही बाजूला अनेक गावांची लोकवस्ती असल्याने या गावातील नागरिक थेट मार्ग म्हणून याच रस्त्याचा उपयोग करतात. परिणामी या मार्गावर दररोज दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. उन्हाळ्यात व हिवाळ्यात या नदीला पाणी कमी राहत असल्याने जुन्या कमी उंचीच्या पुलावरून वाहतूक सुरळीत चालते. मात्र पावसाळ्यात पर्जन्यमानामुळे वैलोचना नदी दुथळी भरून वाहत असते. यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या जोरदार पावसाने वैलोचना नदीच्या जुन्या पुलावर तीन ते चारदा पाणी चढले होते. परिणामी वाहतूक ठप्प झाली होती. कमी उंचीच्या पुलामुळे वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून या ठिकाणी नवीन उंच पुलाचे काम मंजूर करण्यात आले. व हे काम गेल्या वर्षाभरापासून सुरू आहे. पाहणीदरम्यान आ. गजबे यांनी सदर पुलाच्या कामात योग्य दर्जा राखण्यात यावा, असेही निर्देश कंत्राटदार व यंत्रणेला दिले. त्यानंतर या परिसरातील धान पीक नुकसानीची पाहणी त्यांनी केली. याप्रसंगी जि. प. सदस्य संपत आळे, नंदू पेट्टेवार, भाष्कर बोडणे, महेंद्र ताविळे, तंमुस अध्यक्ष सावरकर, उपसरपंच अहीरकर, राजू आकरे आदी उपस्थित होते.वैरागड-मानापूर मार्गावरील वैलोचना नदीवर पुलाचे बांधकाम अतिशय गतीने सुरू आहे. त्यामुळे या पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्याची शक्यता आहे. आगामी पावसाळ्यात नव्या पुलावरून वाहतूक सुरू होण्याची चिन्ह आहेत.