शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:58 IST

आरमोरी तालुक्यातील वैरागड- मानापूर मार्गावरील वैैलोचना नदीवर मोठ्या पुलाचे काम सुरू आहे.

ठळक मुद्देआमदारांचे कंत्राटदार व यंत्रणेला निर्देश : वैैलोचना नदीवरील पुलाच्या कामाची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी तालुक्यातील वैरागड- मानापूर मार्गावरील वैैलोचना नदीवर मोठ्या पुलाचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी आ. कृष्णा गजबे यांनी नुकतीच केली. सदर पुलाचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून हा पूल पावसाळ्यात वाहतुकीसाठी खुला करावा, असे निर्देश त्यांनी संबंधित कंत्राटदार व यंत्रणेला यावेळी दिले.वैरागड-मानापूर मार्गावर बारमाही वाहणारी वैलोचना नदी आहे. सदर मार्गाच्या दोन्ही बाजूला अनेक गावांची लोकवस्ती असल्याने या गावातील नागरिक थेट मार्ग म्हणून याच रस्त्याचा उपयोग करतात. परिणामी या मार्गावर दररोज दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. उन्हाळ्यात व हिवाळ्यात या नदीला पाणी कमी राहत असल्याने जुन्या कमी उंचीच्या पुलावरून वाहतूक सुरळीत चालते. मात्र पावसाळ्यात पर्जन्यमानामुळे वैलोचना नदी दुथळी भरून वाहत असते. यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या जोरदार पावसाने वैलोचना नदीच्या जुन्या पुलावर तीन ते चारदा पाणी चढले होते. परिणामी वाहतूक ठप्प झाली होती. कमी उंचीच्या पुलामुळे वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून या ठिकाणी नवीन उंच पुलाचे काम मंजूर करण्यात आले. व हे काम गेल्या वर्षाभरापासून सुरू आहे. पाहणीदरम्यान आ. गजबे यांनी सदर पुलाच्या कामात योग्य दर्जा राखण्यात यावा, असेही निर्देश कंत्राटदार व यंत्रणेला दिले. त्यानंतर या परिसरातील धान पीक नुकसानीची पाहणी त्यांनी केली. याप्रसंगी जि. प. सदस्य संपत आळे, नंदू पेट्टेवार, भाष्कर बोडणे, महेंद्र ताविळे, तंमुस अध्यक्ष सावरकर, उपसरपंच अहीरकर, राजू आकरे आदी उपस्थित होते.वैरागड-मानापूर मार्गावरील वैलोचना नदीवर पुलाचे बांधकाम अतिशय गतीने सुरू आहे. त्यामुळे या पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्याची शक्यता आहे. आगामी पावसाळ्यात नव्या पुलावरून वाहतूक सुरू होण्याची चिन्ह आहेत.