शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
2
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
3
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
4
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
5
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
6
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
7
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
8
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
9
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
10
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
11
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
12
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
13
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
14
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
15
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
16
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
17
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
18
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
19
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
20
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

एटापल्ली उपविभागाला स्वतंत्र एसडीओ मिळेना

By admin | Updated: July 8, 2016 01:31 IST

तत्कालीन काँग्रेस-राकाँ आघाडी सरकारने अहेरी उपविभागाचे विभाजन करून भामरागड व एटापल्ली या दोन तालुक्यासाठी १ मे २०१२ रोजी...

दोन वर्षांपासून प्रभारी एसडीओ : विकास कामांवर होतोय परिणामएटापल्ली : तत्कालीन काँग्रेस-राकाँ आघाडी सरकारने अहेरी उपविभागाचे विभाजन करून भामरागड व एटापल्ली या दोन तालुक्यासाठी १ मे २०१२ रोजी महाराष्ट्रातील एटापल्ली येथे स्वतंत्र उपविभागीय अधिकारी कार्यालयाची निर्मिती केली. मात्र येथील उपविभागीय अधिकाऱ्यांचे पद दोन वर्षांपासून रिक्त असून सदर उपविभागाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. यामुळे एटापल्ली व भामरागड या दोन्ही तालुक्यातील विकासकामे प्रचंड मंदावली आहेत. चार वर्षांत केवळ दोनच नियमित मिळाले एसडीओएटापल्ली येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात चंद्रभान पराते व आयएएस दर्जाचे राहूल रेखावार हे दोनच अधिकारी दीड वर्षांसाठी नियमित एसडीओ म्हणून कार्यरत होते. तर तब्बल दोन वर्ष प्रभारी अधिकाऱ्यांनीच एटापल्लीचा उपविभाग सांभाळला. डी. एम. कांबळे, उदय चौधरी, जितेंद्र पाटील हे तिन्ही अधिकारी प्रभारी म्हणूनच एटापल्लीच्या उपविभागाला मिळाले. नियमित एसडीओ देण्याची मागणी प्रलंबितच आहे. उपविभागीय अधिकारी हे सर्व विभागाचे प्रमुख असतात. त्यांना मार्गदर्शन करण्यासोबतच वनहक्क पट्टे देणे, आदिवासींची जमीन खरेदी-विक्री तसेच परवाना देणे, भोगवटदार वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये करणे, कृषक जमिनीचे अकृषक करणे, पोलीस पाटील भरती प्रक्रिया राबविणे, तलाठी पदभरती प्रक्रिया व बदली प्रक्रिया राबविणे आदी महत्त्वाची कामे उपविभागीय अधिकाऱ्यांना करावी लागतात. विशेष म्हणजे, उपविभागीय अधिकारी हे रोजगार हमी योजना समितीच्या अध्यक्षस्थानी असतात. मात्र एवढे मोठे महत्त्वाचे पद असतानाही एटापल्ली उपविभाग २८ फेब्रुवारी २०१४ पासून प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर आहे. त्यामुळे विकासकामांचा दावा करणाऱ्या विद्यमान सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अहेरी उपविभागाच्या प्रश्नांकडे लोकप्रतिनिधींचेही सातत्याने दुर्लक्ष होत आहे. (तालुका प्रतिनिधी)अहेरीचे एसडीओ सांभाळतात एटापल्लीचा कारभारअहेरीचे उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्याकडेच एटापल्ली उपविभागाच्या एसडीओ पदाचा प्रभार होता. त्यांची बदली ३१ आॅक्टोबर २०१५ ला झाल्यानंतर एटापल्लीचे तहसीलदार संपत खलाटे यांच्याकडे एटापल्ली व अहेरीच्या उपविभागीय अधिकारी पदाचा प्रभार सोपविण्यात आला आहे. याशिवाय एटापल्ली या नवनिर्मित नगर पंचायतीचे प्रशासक म्हणूनही खलाटे काम सांभाळत आहेत. २० दिवस काम सांभाळल्यानंतर तलाठी यांच्याकडून एसडीओ प्रभार काढण्यात आला. आता अहेरीचे उपविभागीय अधिकारी एस. राममूर्ती यांच्याकडे एटापल्ली उपविभागीय कार्यालयाचा प्रभार सोपविण्यात आला आहे. विशेष म्हणजे २८फेब्रुवारी २०१४ पासून एटापल्ली उपविभागीय कार्यालयाला स्वतंत्र एसडीओ मिळाले नाही.