शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

धान पिकाच्या किडीवर नियंत्रण मिळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 23:09 IST

पावसाची दांडी व वातावरणातील बदलामुळे धान पिकावर लष्कर, पाने गुंडाळणारी अळी तसेच बेरडी या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकºयांनी किडी व रोगांवर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे संदीप कºहाळे तसेच किटकशास्त्रज्ञ पुष्पक बोथीकर यांनी केले आहे.

ठळक मुद्देकीटकशास्त्रज्ञांचे आवाहन : शेतकऱ्यांनी जपून फवारणी करावी, पावसाने दडी मारल्यामुळे पिकांवर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पावसाची दांडी व वातावरणातील बदलामुळे धान पिकावर लष्कर, पाने गुंडाळणारी अळी तसेच बेरडी या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकºयांनी किडी व रोगांवर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे संदीप कºहाळे तसेच किटकशास्त्रज्ञ पुष्पक बोथीकर यांनी केले आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाला बºयापैकी सुरवात झाली असून जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यामध्ये रोवणीची कामे आटोपलेली आहेत. सध्या १५ दिवसापासून पावसाने दडी मारली असून ढगाळ वातावरण कायम आहे. नियमित ढगाळ वातावरण, रिमझीम पाऊस, वातावरणातील भक्कम आर्द्रता व दिवसातील ३-४ तास सूर्यप्रकाश हा लष्करी अळीचा उद्रेक होण्यास पोषक वातावरण ठरू शकतो व त्यामुळेच लष्करी अळीचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.गादमाशी : गादमाशीचा प्रादुर्भाव रोपवाटिकेमधूनच सुरू होतो. उशीरा रोवणी केलेले धान, ढगाळलेले वातावरण, रिमझीम पडणारा पाऊस, ८० ते ९० टक्के वातावरणातील आर्द्रता या किडीच्या वाढीस अतिशय पोषक ठरते. प्रादुर्भावग्रस्त फुटवे आढळून आल्यास फोरेट १० टक्के दाणेदार १० किलो किंवा क्विनॉलफॉस ५ टक्के दाणेदार १५ किलो प्रती हेक्टरी या प्रमाणाात बांधीमध्ये ५ ते १० सेंमी पाणी असताना नियंत्रणाकरीता वापरावे.पाने गुंडाळणारी अळी : या किडीचे पतंग सोनेरी फिक्कट सोनेरी पिवळसर रंगाचे असतात. त्यांच्या पंखावर काळी नागमोळी नक्षी असते. पूर्ण वाढलेली अळी पिवळसर हिरवट असते, डोके मात्र काळसर असते. अळी नेहमी पानाच्या गुंडाळीत राहते. किडग्रस्त पाने दिसल्यास मॅलाथीआॅन ५० टक्के प्रवाही ३० मिली किंवा टॉयझोफॉस ४० टक्के प्रवाही २० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.सुरळीतील अळी /बेरडी : पतंग लहान व नाजूक असून त्याचे पांढºया पंखावर तांबूस लालसर ठिपके असतात. अळी पानाच्या सुरळीत किंवा पुंगळीत असते. पाने कैचीने कापल्यासारखे दिसल्यास किटकनाशकाची फवारणी करावी, असे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले आहे.असा करा लष्करी अळीचा नायनाटलष्कर अळ्या पाने कुरतडतात. या अळीच्या नियंत्रणाकरीता क्लोरोपायरीफॉस २० ई.सी. ४ मिली किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही २८ मिली प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यानंतर ही अळी नष्ट होते.