शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

सत्यवानरावांच्या निधनानंतर सुरू झाला गणेशोत्सव

By admin | Updated: September 12, 2016 02:10 IST

माजी आमदार व अहेरीचे दिवंगत राजे सत्यवानराव महाराज यांच्या निधनानंतर दोन वर्षांनी राणी रूख्मिणीदेवी यांनी राजमहल परिसरात

राजपरिवारातील सोहळा : पंचक्रोशीतील आकर्षणअहेरी : माजी आमदार व अहेरीचे दिवंगत राजे सत्यवानराव महाराज यांच्या निधनानंतर दोन वर्षांनी राणी रूख्मिणीदेवी यांनी राजमहल परिसरात श्रीगणेशाची प्रतिष्ठापणा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून येथे श्रीगणेश उत्सवाला सुरूवात झाली. यंदा या गणेशोत्सवाचे पाचवे वर्ष आहे. गणपती विराजमान झाल्यानंतर संपूर्ण राजपरिवाराचे सदस्य सर्व धार्मिक कार्यक्रमांवर लक्ष देऊन राहतात. दररोज सकाळ व संध्याकाळची आरती स्वत: राणी रूख्मिणीदेवी व अवधेशराव यांच्या उपस्थितीत केली जाते. दररोज रात्री भजनाचा कार्यक्रमही आयोजित केला जातो. या संपूर्ण कार्यक्रमाला राणी रूख्मिणीदेवी स्वत: जातीने हजर राहून परिसरातील गावांमधून देखावे, गणेशमूर्ती पाहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाची व्यक्तिगत विचारपूस करतात. अनेक लोक मंडपातच मुक्कामीही राहतात. त्यांचीही सकाळी विचारपूस केल्याशिवाय राणी रूख्मिणीदेवी यांची दिनचर्या सुरू होत नाही. गणेशोत्सवाचे १० दिवस संपूर्ण राज परिवार अहेरीत राहून पार पाडतात. सकाळ व संध्याकाळी दररोज लाडूचा प्रसाद उपस्थितांना वितरित केला जातो. या कामावरही अवधेशराव स्वत: लक्ष ठेवून असतात. धार्मिक उत्सव अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. हा श्रीगणेश विराजमान झाल्यानंतर राणी रूख्मिणीदेवी यांना जिल्हा परिषद निवडणुकीत पहिल्यांदा यश मिळाले. त्यानंतर राजे अम्ब्रीशराव आत्राम विधानसभेवर निवडून गेलेत. पहिल्यांदाच त्यांना राज्यमंत्री पदही मिळाले, असे अनेकजण सांगतात. ना. अम्ब्रीशराव आत्राम कामात व्यस्त असले तरी राणी रूख्मिणीदेवी हा उत्सव सांभाळून घेतात. राजमहालातील गणेशाच्या मूर्तीची निवड, वेशभूषा, आकार व रूप कसे असले पाहिजे, याची निवड राजे अम्ब्रीशराव महाराज व अवधेशराव यांनी केली होती. फुलांचा हार, गणेश सजावट व मंदिर सजावटीकडे अवधेशराव स्वत: लक्ष देतात. (तालुका प्रतिनिधी)