शहरं
Join us  
Trending Stories
1
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
2
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
3
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
4
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
5
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
6
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
7
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
8
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
9
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
10
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
11
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
12
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
13
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
14
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
15
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
16
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
17
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
18
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
19
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
20
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?

गांधी विचारात सर्वच समस्यांवरील उपाय

By admin | Updated: August 13, 2016 01:42 IST

महात्मा गांधींनी जगाला दिलेल्या शांतीच्या विचारांमध्ये सर्वच समस्यांवरील उपाय आहेत.

पोलीस अधीक्षकांचे प्रतिपादन : आत्मसमर्पितांसाठी ‘गांधी शांती विचार परीक्षा’ गडचिरोली : महात्मा गांधींनी जगाला दिलेल्या शांतीच्या विचारांमध्ये सर्वच समस्यांवरील उपाय आहेत. हे विचार प्रत्येक व्यक्तीने अंगीकारले पाहिजे. माओवादी व महात्मा गांधी यांच्या विचारसरणीत फार मोठे अंतर आहे. आत्मसमर्पण केलेल्या व्यक्तींच्या मनातून माओवादी व हिंसावादी विचार कायमचे काढून टाकण्यासाठी गांधी शांती विचार परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या व्यक्तींनी ही परीक्षा दिली आहे. त्यांनी शांतीदूत म्हणून काम करावे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले. आत्मसमर्पित नक्षल्यांना शांतीच्या मार्गाने जीवन जगता यावे, यासाठी आदर्श मित्र मंडळ पुणे, लक्ष्मीनृसिंह पतसंस्था बल्लारपूर व जिल्हा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा पोलीस मुख्यालयात शुक्रवारी गांधी शांती विचार परीक्षेचे आयोजन करण्यात आले. या परीक्षेत सहभागी झालेल्या आत्मसमर्पितांना प्रमाणपत्र व पदकाच्या वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष उदय जगताप, लक्ष्मीनृसिंह पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास सूंचुवार, अप्पर पोलीस अधीक्षक मंजूनाथ सिंगे, एसडीपीओ डॉ. सागर कवडे, परीक्षाविधीन एसडीपीओ डॉ. रणजित पाटील, पोलीस उपअधीक्षक गृह गणेश बिरादार, परीक्षा समन्वयक लक्ष्मण बोडे आदी मान्यवर उपस्थित होते. ५६ आत्मसमर्पितांनी सदर परीक्षा दिली. परीक्षेपूर्वी या सर्वांना गांधी विचारांचे पुस्तक देण्यात आले. त्याचबरोबर गांधीजींच्या शांतीच्या मार्गाविषयी मार्गदर्शन सुध्दा करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना उदय जगताप यांनी चुकीच्या विचारांमुळे येथील आदिवासी युवक व जनता भरकटली जात आहे. मार्ग अनेक असले तरी योग्य मार्गाची निवड करण्याचा शहाणपणा प्रत्येक व्यक्तीने दाखविला पाहिजे. गांधी विचारानंतर आत्मसमर्पितांचे मतपरिवर्तन झाले असून त्यांनी शांतीदूत म्हणून काम करावे, असे आवाहन केले. प्रास्ताविक एसडीपीओ डॉ. सागर कवडे, संचालन पीएसआय तेजस्वी पाटील, आभार पीएसआय राजपूत यांनी मानले. (नगर प्रतिनिधी) क्रिष्णा व रघुने उलगडला नक्षल चळवळीतील फोलपणा अहिंसेच्या मार्गाने काहीच साध्य होत नाही. सत्ता प्राप्त करण्यासाठी हिंसेचा मार्ग स्वीकारावाच लागतो, अशी शिकवण नक्षल्यांकडून दिली जाते. त्याचबरोबर मोठमोठी स्वप्न दाखविली जातात. या विचारांना बळी पडून आदिवासी युवक नक्षल चळवळीमध्ये सहभागी होते. नक्षल चळवळीत प्रत्यक्ष सहभागी झाल्यानंतर या चळवळीतील फोलपणा लक्षात येते. वरिष्ठांचे आदेश पाळत जंगलात व पहाडांवर रात्रंदिवस फिरावे लागते. कधी-कधी दोन ते तीन दिवस उपाशी राहण्याचे संकटही झेलावे लागत असल्याचे सत्य आत्मसमर्पित क्रिष्णा मासा दोरपेटी व रघु लालसाय सडमेक यांनी बोलून दाखविले.