शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

गांधी विचारात सर्वच समस्यांवरील उपाय

By admin | Updated: August 13, 2016 01:42 IST

महात्मा गांधींनी जगाला दिलेल्या शांतीच्या विचारांमध्ये सर्वच समस्यांवरील उपाय आहेत.

पोलीस अधीक्षकांचे प्रतिपादन : आत्मसमर्पितांसाठी ‘गांधी शांती विचार परीक्षा’ गडचिरोली : महात्मा गांधींनी जगाला दिलेल्या शांतीच्या विचारांमध्ये सर्वच समस्यांवरील उपाय आहेत. हे विचार प्रत्येक व्यक्तीने अंगीकारले पाहिजे. माओवादी व महात्मा गांधी यांच्या विचारसरणीत फार मोठे अंतर आहे. आत्मसमर्पण केलेल्या व्यक्तींच्या मनातून माओवादी व हिंसावादी विचार कायमचे काढून टाकण्यासाठी गांधी शांती विचार परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या व्यक्तींनी ही परीक्षा दिली आहे. त्यांनी शांतीदूत म्हणून काम करावे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले. आत्मसमर्पित नक्षल्यांना शांतीच्या मार्गाने जीवन जगता यावे, यासाठी आदर्श मित्र मंडळ पुणे, लक्ष्मीनृसिंह पतसंस्था बल्लारपूर व जिल्हा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा पोलीस मुख्यालयात शुक्रवारी गांधी शांती विचार परीक्षेचे आयोजन करण्यात आले. या परीक्षेत सहभागी झालेल्या आत्मसमर्पितांना प्रमाणपत्र व पदकाच्या वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष उदय जगताप, लक्ष्मीनृसिंह पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास सूंचुवार, अप्पर पोलीस अधीक्षक मंजूनाथ सिंगे, एसडीपीओ डॉ. सागर कवडे, परीक्षाविधीन एसडीपीओ डॉ. रणजित पाटील, पोलीस उपअधीक्षक गृह गणेश बिरादार, परीक्षा समन्वयक लक्ष्मण बोडे आदी मान्यवर उपस्थित होते. ५६ आत्मसमर्पितांनी सदर परीक्षा दिली. परीक्षेपूर्वी या सर्वांना गांधी विचारांचे पुस्तक देण्यात आले. त्याचबरोबर गांधीजींच्या शांतीच्या मार्गाविषयी मार्गदर्शन सुध्दा करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना उदय जगताप यांनी चुकीच्या विचारांमुळे येथील आदिवासी युवक व जनता भरकटली जात आहे. मार्ग अनेक असले तरी योग्य मार्गाची निवड करण्याचा शहाणपणा प्रत्येक व्यक्तीने दाखविला पाहिजे. गांधी विचारानंतर आत्मसमर्पितांचे मतपरिवर्तन झाले असून त्यांनी शांतीदूत म्हणून काम करावे, असे आवाहन केले. प्रास्ताविक एसडीपीओ डॉ. सागर कवडे, संचालन पीएसआय तेजस्वी पाटील, आभार पीएसआय राजपूत यांनी मानले. (नगर प्रतिनिधी) क्रिष्णा व रघुने उलगडला नक्षल चळवळीतील फोलपणा अहिंसेच्या मार्गाने काहीच साध्य होत नाही. सत्ता प्राप्त करण्यासाठी हिंसेचा मार्ग स्वीकारावाच लागतो, अशी शिकवण नक्षल्यांकडून दिली जाते. त्याचबरोबर मोठमोठी स्वप्न दाखविली जातात. या विचारांना बळी पडून आदिवासी युवक नक्षल चळवळीमध्ये सहभागी होते. नक्षल चळवळीत प्रत्यक्ष सहभागी झाल्यानंतर या चळवळीतील फोलपणा लक्षात येते. वरिष्ठांचे आदेश पाळत जंगलात व पहाडांवर रात्रंदिवस फिरावे लागते. कधी-कधी दोन ते तीन दिवस उपाशी राहण्याचे संकटही झेलावे लागत असल्याचे सत्य आत्मसमर्पित क्रिष्णा मासा दोरपेटी व रघु लालसाय सडमेक यांनी बोलून दाखविले.