शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

गडचिरोलीकरांची पाणीटंचाईतून होणार मुक्तता

By admin | Updated: March 16, 2016 08:36 IST

स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने गेल्या १५ दिवसांपासून वैनगंगा नदीपात्रातील पाणी योजनेच्या इंटेक व्हेल व

गडचिरोली : स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने गेल्या १५ दिवसांपासून वैनगंगा नदीपात्रातील पाणी योजनेच्या इंटेक व्हेल व जॉकवेल विहिरीतील गाळ उपसण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आता पोकलॅन्ड मशिनने विहिरीलगतच्या पात्रातील रेती उपसा करणे तसेच रिकाम्या सिमेंटच्या पिशव्यांमध्ये रेती भरून बंधारा बांधण्याचे काम शिल्लक आहे. सदर काम आठ दिवसांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून पाणीटंचाईच्या समस्येने त्रस्त असलेल्या गडचिरोलीकरांची तब्बल आठ दिवसानंतर पाणीटंचाईच्या समस्येतून मुक्तता होणार आहे.शहरातील पाणीटंचाईच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक-यादव, पाणीपुरवठा सभापती नंदू कायरकर व नगराध्यक्षांचे पती रामकिरीत यादव यांनी मंगळवारी नळ योजना कार्यान्वित करण्यात आलेल्या ठिकाणी भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी पालिकेचे अभियंता पुनवटकर, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता शेंडे व काम करणारे कर्मचारी व मजूर उपस्थित होते. नदीकाठावर असलेल्या मोठ्या टाकीतील गाळ उपसा करण्याचे काम पूर्ण झाले आहे. नदीपात्रातील विहिरीतील गाळ काढण्याचे काम अंतिम टप्प्यात असून ते दोन दिवसांत पूर्ण होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात पालिकेच्या वतीने केवळ एकदाच पाणीपुरवठा केला जात आहे. सखल भागात दोनवेळा पाणीपुरवठा होत आहे. पाणीटंचाईमुळे महिलांचा त्रास वाढला आहे. आठ दिवसानंतर ही समस्या मार्गी लागणार आहे.(स्थानिक प्रतिनिधी)टिल्लूपंपधारकांवर कारवाई करणार४यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे वैनगंगा नदीतील पाण्याची पातळी प्रचंड खालावली आहे. परिणामी शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. अशा स्थितीत शहरातील सर्व नागरिकांना पुरेसे पाणी मिळण्यासाठी टिल्लूपंपधारकांविरोधात कारवाईसत्र सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय उन्हाळ्यात पाण्याचा अपव्यय होऊ नये, यासाठी पालिकेच्या वतीने जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक यांनी लोकमतशी बोलताना दिली.