शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बॉम्बच्या भीतीने गडचिरोलीत खळबळ

By admin | Updated: August 12, 2016 00:43 IST

सकाळी ११.३० वाजताची वेळ. गडचिरोली शहरातून शाळेसाठी निघालेले विद्यार्थी, पाच किमी अंतरावर कॉम्प्लेक्स परिसरात आॅफीस पकडण्यासाठी...

अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ वाहतूक ठप्प : सुटकेसमध्ये स्फोटक नसल्याचे झाले निष्पन्न गडचिरोली : सकाळी ११.३० वाजताची वेळ. गडचिरोली शहरातून शाळेसाठी निघालेले विद्यार्थी, पाच किमी अंतरावर कॉम्प्लेक्स परिसरात आॅफीस पकडण्यासाठी लगबगीने निघालेले पुरूष व महिला कर्मचारी अशा स्थितीतीच शेकडो वाहनांची वर्दळ सुरू असताना गडचिरोली शहराचा मुख्य चौक असलेल्या इंदिरा गांधी चौकात बेवारस स्थितीत सुटकेस असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर बीडीडीएस पथकाने तत्काळ चौकाचा ताबा घेऊन सुटकेस आपल्या ताब्यात घेतली व निर्जनस्थळी नेऊन ही सुटकेस उघडली. त्यात काहीही नसल्याचे निष्पन्न झाले व गडचिरोलीकरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. इंदिरा गांधी चौकात बेवारस सुटकेस असल्याची माहिती मिळताच तत्काळ पोलीस विभागाची सारी यंत्रणा कामाला लागली. छत्तीसगडकडे जाणाऱ्या धानोरा, चामोर्शी, नागपूर, चंद्रपूर मार्गावरची वाहतूक तत्काळ थांबविण्यात आली. जवळजवळ अर्धा ते पाऊण तास हा थरार चालला. त्यानंतर पोलीस विभागाचे बीडीडीएस पथक घटनास्थळी दाखल झाले. बॉम्ब शोधपथकाचे शेकडो कर्मचारी या कामी लागलेत. दोन पथदिव्यांना दोरी बांधण्यात आली. नंतर या दोरीच्या सहाय्यानेच सुटकेस पोलिसांच्या टेम्पो वाहनामध्ये अलगद उचलून टाकण्यात आली. तोपर्यंत संपूर्ण उपस्थितांच्या छातीचे ठोके धडधडत होते. गडचिरोलीत बॉम्ब आढळला, बॉम्ब कुणी ठेवला असेल, अशा चर्चा सुरू झाल्या. सोशल मीडिया, व्हॉटस्अपवरून घटनास्थळाचे फोटोही पाठविण्यास उत्साही लोकांनी सुरूवात केली. ही बातमी राज्याच्या कानाकोपऱ्यात हवेसारखी पसरली. अखेरीस बीडीडीएस पथकाने निर्जनस्थळी नेऊन ही सुटकेस उघडली. त्यामध्ये काहीही मिळून आले नाही, अशी माहिती पोलीस विभागाच्या जनसंपर्क अधिकारी तेजस्वीनी पाटील यांनी दुपारीच दिली. या घटनेमुळे गडचिरोलीसह राज्याच्या विविध भागात सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवांना पेव फुटले होते. त्यानंतर तत्काळ पोलीस विभागाने सदर माहिती जाहीर केली. सुटकेस हस्तगत केल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली. मात्र दिवसभर या घटनेची चर्चा होती. लोकमत कार्यालयातही अनेक जण विदर्भातून या घटनेबाबत विचारणा करीत होते. अफवांचा बाजार दिवसभर चालला. मात्र एवढ्या वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक पोलीस उपस्थित असतानाही सुटकेस कुणी आणून ठेवली असावी, हा अतिशय गंभीरच विषय आहे. (नगर प्रतिनिधी)