शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीची रेल्वे कागदावरच

By admin | Updated: January 31, 2015 01:40 IST

राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातून मध्यप्रदेश राज्याला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण ब्रिटीश काळात करण्यात आले होते.

अभिनय खोपडे गडचिरोलीराज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातून मध्यप्रदेश राज्याला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण ब्रिटीश काळात करण्यात आले होते. परंतु स्वातंत्र्यानंतर या रेल्वे मार्गाचाही प्रश्न रखडून आहे. तसेच या जिल्ह्यातील नैसर्गिक साधनसंपत्ती लक्षात घेऊन जमशेटजी टाटा यांनी रेल्वे मार्ग टाकण्याची तयारी दाखविली होती. मात्र राजकीय विरोधामुळे ही मागणी पूर्ण होवू शकली नाही. जिल्ह्यात जवळजवळ वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गासह आणखी चार ते पाच प्रकल्प लोहमार्गाचे प्रलंबित आहे. नव्या केंद्र व राज्य सरकारने या भागातील प्रलंबित रेल्वे प्रकल्पांसाठी विशेष निधीची तरतूद करून हे प्रकल्प मार्गी लावावेत, अशी मागणी आहे. मात्र राज्य सरकार वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी केंद्रसरकारने अधिक निधी आधी द्यावा. त्यानंतर आम्ही निधी देऊ अशी भूमिका घेऊन आहे. सध्या दोन्ही सरकारची आर्थिक परिस्थिती पाहू जाता गडचिरोली जिल्ह्यातील रेल्वे प्रकल्प कागदावरच राहण्याची दाट शक्यता आहे.गडचिरोली हा पूर्वीचा चंद्रपूर जिल्ह्याचा अविभाज्य भाग होता. तत्कालीन चंद्रपूर जिल्ह्यात वडसा (देसाईगंज) हे मोठे गाव होते. देसाईगंज ही व्यावसायिक बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध होती. इंग्रजांचा या भागात व्यावसायिक दृष्टिकोनातून संपर्क होता. इंग्रजकालीन अधिकारी येथे वास्तव्याला होते. या भागातील माल रेल्वेने वाहून नेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी रेल्वे मार्गाचे जाळे विकसित केले होते. चांदा फोर्ट ते गोंदिया हा रेल्वे मार्ग इंग्रजांनीच तयार केला. या भागातील माल मध्यप्रदेशात नेता यावा, म्हणून ब्रिटिशांनी वडसा-रांगी-येरकड-मुरूमगाव-भिलाई या रेल्वे मार्गाचेही सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणाच्या अनेक खुणा धानोरा तालुक्यातील जांगदा गाव परिसरात आहेत, अशी माहिती या भागातील वयोवृद्ध देतात. इंग्रजांनी सर्वेक्षणानंतर या भागात मोठे दगड गाडून त्याच्या सीमारेषा निश्चित केल्या होत्या. परंतु स्वातंत्र्यानंतर हा रेल्वे मार्ग मार्गी लागू शकला नाही. भिलाई येथे पोलाद प्रकल्प उभा झाला. गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यात सुरजागड पहाडीवर उच्च प्रतिचे लोहखनिज आहे. या खनिजाचा वापर व्हावा, म्हणून जमशेटजी टाटा यांनी येथून चंद्रपुरसाठी रेल्वे मार्ग टाकण्याची तयारी दर्शविली होती. १९३१ च्या सुमारास या कामाचे टाटा यांच्यामार्फत सर्वेक्षणही झाले होते, अशी माहिती आहे. काही राजकीय घराण्यांनी या कामाला विरोध केला. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात रेल्वे मार्गाचे जाळे निर्माण होण्यात प्रचंड अडथळे आलेत. इंग्रजी सत्तेनंतरही सरकारने रेल्वे मार्गाचे जाळे निर्माण करण्यात गडचिरोली जिल्ह्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सद्य:स्थितीतही तीन रेल्वे मार्ग जिल्ह्यातच प्रलंबित आहेत. ज्याची ब्रिटीशकाळात नोंद होती.