शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली टू पिपली (बुर्गी) व्हाया छत्तीसगड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:30 IST

एटापल्ली : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांचा एटापल्लीच्या दुर्गम भागातील दौरा समस्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नवीन ...

एटापल्ली : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांचा एटापल्लीच्या दुर्गम भागातील दौरा समस्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नवीन धडा देणारा ठरला. पिपली (बुर्गी) सारख्या शेवटच्या टोकावरील गावाला जाण्यासाठी सीईओंना चक्क छत्तीसगड राज्याच्या सीमेतील इरपनार या गावातून जावे लागले. नदीतून आणि पायी चालत जाऊन त्यांनी जाणून घेतलेल्या समस्यांमुळे गावकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

पिपली (बुर्गी) हे एटापल्ली तालुक्यातील शेवटच्या टोकावर छत्तीसगड सीमेलगत आहे. अजूनही हे गाव विकासापासून कोसो दूर आहे. या गावाचा संपर्क महाराष्ट्रापेक्षा छत्तीसगड राज्यातच जास्त असतो. या गावाला पोहोचण्यासाठी तालुक्यातून मार्ग नसल्याने छत्तीसगड राज्यातील इरपनार गावातून जावे लागते. सीईओ आशीर्वाद दुपारी जारावंडी, भापडा या गावावरून इरपनारमार्गे पिपली (बुर्गी)ला पोहोचले. तिथे सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे काम शेवटच्या टप्प्यात पोहोचले आहे. या कामाची त्यांनी पाहणी केली. तसेच गावातील नागरिकांशी संवाद साधला व आरोग्य सुविधांची माहिती घेतली. कोरोनाची लस घेण्याचेही आवाहन केले.

यावेळी सीईओंसोबत सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. विनोद म्हशाखेत्री होते. कसनसूरचे वैद्यकीय अधिकारी तथा प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. अस्तिता देवगडे गृहविलगीकरणात असल्याने त्या भ्रमणध्वनीच्या माध्यमाने संपर्कात होत्या.

(बॉक्स)

अडीच ते तीन किलोमीटरचा पायी प्रवास

पिपली बुर्गी गावातून परतीच्या वेळी सेवारीमार्गे सीईओ कसनसूरला आले. यावेळी त्यांना अडीत ते तीन किलोमीटर पायी चालावे लागले. तसेच सेवारी गावाजवळील बांदे नदीपात्रातील पाण्यातून पायी वाट काढावी लागली. नदीत पाणी पातळी जास्त असती तर नावेने (डोंग्यातून) पैलतीर गाठावे लागले असते.

(बॉक्स)

दौरा सार्थकी लागेल का?

पावसाळ्यात या गावांचा कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्रासोबत संपर्क तुटतो. या काळात गरोदर मातांच्या सुरक्षित प्रसूती कशी होते, याची माहिती आरोग्य कर्मचाऱ्यांकडून जाणून घेतली. यावेळी येणाऱ्या अडचणीही सीईओंनी जाणून घेतल्या. आता या भागातील समस्या दूर होणार का आणि कधीपर्यंत दूर होणार? असे प्रश्न नागरिकांना पडले आहेत. प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष न करता हा दौरा सार्थकी लावावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.