शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीला मिळाले तीन नवे उपजिल्हाधिकारी

By admin | Updated: November 23, 2015 01:15 IST

राज्य शासनाने राज्यातील विविध ठिकाणी कार्यरत राज्य सेवेतील आठ अधिकाऱ्यांच्या विदर्भात बदल्या केल्या असून, तीन अधिकाऱ्यांना गडचिरोलीला पाठविण्यात आले आहे.

गडचिरोली : राज्य शासनाने राज्यातील विविध ठिकाणी कार्यरत राज्य सेवेतील आठ अधिकाऱ्यांच्या विदर्भात बदल्या केल्या असून, तीन अधिकाऱ्यांना गडचिरोलीला पाठविण्यात आले आहे.नागपूर महानगरपालिकेचे उपायुक्त प्रमोद भुसारी यांना गडचिरोलीचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून पाठविण्यात आले आहे. पिंपरी चिचवड महानगरपालिकेचे उपायुक्त मंगेश जोशी यांची गडचिरोलीचे उपजिल्हाधिकारी(भूसंपादन) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे कार्यकारी संचालक मनोज रानडे यांना उपजिल्हाधिकारी(रोहयो) या पदावर आणण्यात आले आहे. गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी डी.एस.सोनवणे यांची गडचिरोलीचे निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक अधिकारी विदर्भात येण्यास अनुत्सूक असतात. त्यामुळे महत्वाच्या पदांचा अनुशेष वाढत जाऊन विकासकामांत अडथळा निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन शासनाने बदली व नियुक्तीसंदर्भात एक कायदा केला. त्याअन्वये आता अधिकाऱ्यांना बदली व नियुक्तीच्या स्थळी रुजू होणे अनिवार्य झाले आहे. नव्या कायद्यात पहिली नियुक्ती नागपूर व अमरावती या दोन प्रशासकीय विभागात करण्याची तरतूद आहे. त्याअनुषंगाने शासनाने आठ अधिकाऱ्यांच्या विदर्भात बदल्या केल्या असून, त्यात पाच जण नवीन आहेत.पुण्याच्या यशदा संस्थेतील सहायक प्राध्यापक अर्जुन चिखले यांची चंद्रपूरचे उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त अनिल पवार यांची चंद्रपूरचे उपजिल्हाधिकारी(रोहयो)म्हणून नियुक्ती झाली आहे. चिमूरच्या उपविभागीय अधिकारी संगीता राठोड यांची गोंडपिपरीला बदली करण्यात आली आहे.गडचिरोलीत गेल्या चार महिन्यात दोन निवासी उपजिल्हाधिकारी बदलले आहेत. राम जोशी यांची आठ महिन्यांतच बदली झाली. त्यानंतर आलेले सुनील गाढे यांचेही अल्पावधीत स्थानांतरण करण्यात आले. त्यामुळे नवे अधिकारी किती काळ राहतील, हा प्रश्न जिल्हावासीयांपुढे निर्माण झाला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)