शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
5
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
6
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
7
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
8
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
9
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
10
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
11
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
12
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
13
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
14
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
15
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
16
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
17
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
18
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
19
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
20
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा

विकासात गडचिरोलीला प्रथम प्राधान्य

By admin | Updated: May 2, 2015 01:29 IST

शासनाच्या वतीने जिल्ह्याच्या विकासासाठी आदिवासी विकास विभागाकडून ग्रामपंचायतींना पाच टक्के थेट निधी मंजूर करण्यात आला आहे.

गडचिरोली : शासनाच्या वतीने जिल्ह्याच्या विकासासाठी आदिवासी विकास विभागाकडून ग्रामपंचायतींना पाच टक्के थेट निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यात गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी शासन कटीबध्द आहे. राज्याच्या विकासात गडचिरोली जिल्ह्याला प्रथम प्राधान्य राहिल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर आयोजित महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५५ व्या वर्धापण दिन कार्यक्रमात जनतेला संदेश देताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रणजितकुमार , जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जि.प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, मुख्य वनसंरक्षक टी. एस. के. रेड्डी, गडचिरोलीच्या उपवनसंरक्षक लक्ष्मी अण्णाबत्तुला, नगराध्यक्ष निर्मला मडके, जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, निवासी उपजिल्हाधिकारी राम जोशी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रमोद दशमुखे, ओमप्रकाश संग्रामे, महेश पडोळे यांनी केले तर आभार निवासी उपजिल्हाधिकारी राम जोशी यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)पंतप्रधान पुरस्काराने गौरवजिल्हा कौशल्य विकास कार्यक्रमासाठी पंतप्रधान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले ही जिल्हावासियासाठी अभिमानाची बाब आहे, असेही पालकमंत्री आत्राम यावेळी म्हणाले. अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कारयाप्रसंगी पोलीस विभागाच्या १७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह तसेच महसूल विभागात क्षेत्रीय स्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या तहसीलदार अजय चरडे, डी.एस. नैताम, मंडल अधिकारी एम. एच. राऊत व एका तलाठ्याना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच स्काऊट गाईडच्या राष्ट्रपती पदक प्राप्त ८ विद्यार्थिनींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.