शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

गडचिरोली जिल्ह्यात वीज समस्येविरोधात गावकरी उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 13:23 IST

कोरचीपासून ३७ कि.मी.अंतरावर अतिसंवेदनशील नक्षल भागातील कोटगुल येथे सतत सुरू असलेल्या वीज पुरवठ्याच्या समस्येने त्रस्त नागरिकांनी शनिवारी सकाळपासून चक्काजाम आंदोलन सुरू केले.

ठळक मुद्देकोटगुल येथे चक्काजाम मंजूर वीज उपकेंद्र सहा वर्षानंतर झालेच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली :  कोरचीपासून ३७ कि.मी.अंतरावर अतिसंवेदनशील नक्षल भागातील कोटगुल येथे सतत सुरू असलेल्या वीज पुरवठ्याच्या समस्येने त्रस्त नागरिकांनी शनिवारी सकाळपासून चक्काजाम आंदोलन सुरू केले. भल्या पहाटे सुरू झालेल्या या आंदोलनात गावातील महिला-पुरूषांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यही सहभागी झाले आहेत.कोटगुल येथे २०१२ मध्ये ३३ केव्ही वीज उपकेंद्र मंजूर झाले. मात्र आता सहा वर्षानंतरही ते सुरू न झाल्याने कोटगुलला वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. त्यामुळे कोटगुलमधील नागरिकांनी शनिवारी सकाळपासून कोटगुल-मुरूमगाव, कोटगुल-कोरची मार्गावर चक्काजाम आंदोलन सुरु केले. या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य सुमित्रा लोहम्बरे, कोरची पंचायत समितीचे उपसभापती श्रावण मातलाम, कोटगुलचे सरपंच राजेश नैताम, सोनपूरचे सरपंच नरपतसिंग नैताम, माजी पंचायत समिती सदस्य रामदास हारामी आणि परिसरातील बहुसंख्य युवक, महिला सहभागी झाले.अतिसंवेदन नक्षलग्रस्त कोटगुल परिसरात दोन पोलीस मदत केंद्र तर एक प्राथमिक आरोग्य केंद्र, दोन शासकीय आश्रमशाळा, ३१ जिल्हा परिषद शाळा आहेत, ७ ग्राम पंचायत असून ४० गावे आहेत. या परिसरात वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. या परिसरात महिन्यातून केवळ एक-दोन दिवस पुरवठा अखंडितपणे सुरू असतो, बाकीचे सर्व दिवस कधीही वीज पुरवठा खंडित होतो. याला कंटाळून या भागातील लोकांनी शनिवारी सकाळी सकाळपासूनच आंदोलनाचा पवित्रा घेतला.या आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून त्यांची समस्या मार्गी लावण्यासाठी दुपारपर्यंत कोणीही अधिकारी आले नव्हते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यास या परिसरातील सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याची तयारी सुरू केली आहे.

टॅग्स :electricityवीज